शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

ठेकेदारांचा कारभार रामभरोसे!

By admin | Updated: October 3, 2016 00:25 IST

सदाभाऊंकडून पोलखोल : टक्केवारीवरच विकासकामांची रेलचेल

 अशोक पाटील ल्ल इस्लामपूर आघाडी शासनात सांगली जिल्ह्यातील तीन मातब्बर मंत्री दीर्घकाल कार्यरत होते. या मंत्र्यांनी स्वत:चे हितसंबंध जपण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राजकीय, आर्थिक, उद्योग, शैक्षणिक क्षेत्रात ताकद दिली. यामध्ये काही ठेकेदारांचाही समावेश आहे. बहुतांशी ठेकेदारांनी प्रशासनातील शिपाई ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच हाताशी धरुन टक्केवारीचा बाजार मांडला आहे. यातून झालेल्या विकास कामांचा दर्जा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी चव्हाट्यावर आणला आहे. परंतु त्याचा शेवट निर्णायक होणार का? यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात अव्वल दर्जाची मंत्रीपदे मिळविण्यात सांगली जिल्हा नेहमीच आघाडीवर राहिला आहे. यामध्ये प्रामुख्याने लोकनेते वसंतदादा पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील, आर. आर. पाटील, मदन पाटील यांच्यासह प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, पतंगराव कदम, शिवाजीराव नाईक, जयंत पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. या मंत्र्यांच्याच बगलबच्चांनी विकास कामांची ठेकेदारी आपल्या पदरात पाडून घेऊन टक्केवारीचा बाजार मांडला आहे. यातूनच निकृष्ट दर्जाची विकासकामे झाली आहेत. यातील काही साखरसम्राटांचे नेते आहेत. याच साखरसम्राटांनी अजून शेतकऱ्यांना गत हंगामातील उसापोटी एक रुपयाही दिलेला नाही. यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्याच तालुक्यात झालेल्या आढावा बैठकीत शब्दही काढला नाही. याउलट त्यांनी इस्लामपूर ते सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामावरच जोर दिला. वास्तविक पाहता, सांगली-इस्लामपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम वेळेत झाले नाही. जे काम पूर्ण झाले आहे, त्याचा दर्जा पहिल्या पावसातच जनतेसमोर आला आहे. त्यामुळे आलिशान गाड्यांमधून इस्लामपूर-सांगली असा प्रवास करताना मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींना कंबरदुखीचा त्रास होऊ लागला आहे. तसेच एसटी महामंडळाच्या व खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांची अवस्था काय होत असेल, याचा विचार कोण करणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्था दयनीय झाली आहे. आर्थिक बाजू कमकुवत झाल्याने काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारालाच हात घातला आहे. बाजार समितीच्या आवारात ज्यांनी व्यवसायासाठी प्लॉट घेतले आहेत, तेथे टोलेजंग इमारती बांधून तेथेच त्यांनी वास्तव्य सुरु केले आहे. त्यामुळे या परिसरातील बाजारपेठाही ओस पडल्या आहेत. इस्लामपूर येथील बाजार समितीचीही अशीच अवस्था झाली असून, सदाभाऊ खोत यांनी येथील प्रश्न तरी तातडीने मिटवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. वारणा-कृष्णा खोऱ्यातील शेतकरी सुशिक्षित आणि सधन झाला आहे. त्यांना अत्याधुनिक शेतीच्या प्रशिक्षणाची गरज आहे. परंतु तालुक्याच्या ठिकाणी असलेले सर्वच कृषी विभाग कोमात आहेत. वाघवाडी येथे असलेल्या कृषी खात्याच्या जमिनीमध्ये कोणतेही नवनवीन प्रयोग केले जात नाहीत. येथे असलेल्या कृषी कार्यालयात अधिकाऱ्यांचीच उपस्थिती नसते. या कृषी खात्याच्या अंतर्गत असलेल्या जमिनीवर डल्ला मारण्याचे षड्यंत्र काही नेते करत आहेत. यामध्ये कृषी राज्यमंत्र्यांनी लक्ष घालून, शेतीविषयक सल्ला व मार्गदर्शन करणारे अत्याधुनिक केंद्र उभे करावे, अशीही मागणी होत आहे. ‘वसंतदादा’प्रश्नी मोैन : शेतकऱ्यांत नाराजी दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी गळीत हंगामाची तयारी सुरु केली आहे. परंतु सांगली येथील वसंतदादा सह. साखर कारखान्याने गत गळीत हंगामात सांगली व सातारा जिल्ह्यातून आणलेल्या उसाला एफ. आर. पी. तर सोडाच, १ रुपयाही अदा केलेला नाही. यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मौन पाळले आहे. तसेच जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेण्याच्या तयारीला लागलेले स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनीही ‘वसंतदादा’प्रश्नी काहीही तोडगा न काढल्याने ऊस उत्पादकांतून नाराजी आहे.