शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

ठेकेदार म्हणजे सरकारचे जावई नाहीत!

By admin | Updated: October 2, 2016 01:03 IST

सदाभाऊ खोत : विकासकामांच्या दर्जाबाबत तडजोड नको, इस्लामपुरात विकास आढावा बैठक

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील विकास कामांबाबत अधिकाऱ्यांनी तडजोड करू नये. पुन्हा दुरुस्ती करावी लागणार नाही, अशी दर्जेदार कामे करून घ्या. जे ठेकेदार वेळेत काम पूर्ण करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करा. हे ठेकेदार सरकारचे जावई नाहीत, अशा शब्दात कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना सुनावले. तालुक्यातील विकासकामांची गती वाढती ठेवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव द्यावेत. त्यासाठीचा निधी आणण्याबाबत पाठपुरावा करू, असेही खोत म्हणाले. येथील पंचायत समितीत राज्यमंत्री खोत यांनी सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत कामांचा आढावा घेतला. रस्ते, पाणी योजना याविषयी त्यांनी विशेष कारवाईच्या सूचना प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांना केल्या. इस्लामपूर-आष्टा रस्त्याच्या कामाबाबत खोत यांनी नापसंती व्यक्त केली. ही कामे दर्जेदार नाहीत. प्रवास करण्याचीसुद्धा इच्छा होत नाही, असे सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे कामाबाबत विचारणा केली. त्यांनी अहवाल दिल्यावर दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा. असेही त्यांनी सुनावले. पेठनाका ते इस्लामपूर रस्त्यासाठी तयार केलेली भूसंपादनाची फाईल गहाळ झाल्याकडे प्रांत जाधव यांनी लक्ष वेधल्यावर अभियंता पाटील यांनी नव्या नियमानुसार हा प्रस्ताव करावा लागेल. त्यासाठी ७० कोटींचा निधी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तालुक्यातील भारत निर्माण पाणी योजना, पेयजल योजनांच्या आढाव्यावेळी खोत यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पैसे देऊनही योजना अपूर्ण का, प्रत्येक महिन्याला प्रस्तावित रकमेत वाढ का होते, असे प्रश्न करीत, ज्या पाणी योजनांची कामे अपूर्ण आहेत, त्या ठेकेदारांवर कारवाई करा आणि तातडीने कारवाईचा अहवाल द्या, असे फर्मान सोडले. महावितरणच्या चर्चेवेळी कार्यकारी अभियंता यु. एम. शेख यांनी वाळवा-शिराळा तालुक्यात १२८१ कृषी पंपांची कनेक्शन जोडणी प्रलंबित असल्याचे सांगितले. आॅक्टोबरपर्यंत त्यातील ३६४ जोडण्या पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आॅक्टोबरनंतर योजना बंद होणार असल्याने अडचण येणार असल्याचे शेख यांनी सांगितले. खोत यांनी मंत्री पातळीवर चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू, असे सांगितले. तहसीलदार सविता लष्करे यांनी महसूलचा आढावा दिल्यावर खोत यांनी वाळू उपशाच्या विषयाला हात घातला. बेकायदा उपशावर धडक कारवाई करा. कोणाचाही मुलाहिजा ठेवू नका, अशा स्पष्ट शब्दात सूचना दिल्या. ऊस पिकाला शासनाकडून नाबार्डमार्फत १०० टक्के कर्ज पुरवठा करण्याची योजना आहे. राज्याला तीन लाख हेक्टर क्षेत्रावर हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवणार आहोत. निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व विभागांनी प्रस्ताव द्यावेत. शासनाकडून निधी आणू, असे खोत यांनी स्पष्ट केले. यावेळी पं. स. सदस्य नंदकुमार पाटील, प्रकाश पाटील, नजीर वलांडकर, पोलिस उपअधीक्षक वैशाली शिंदे, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, भूमी अभिलेखच्या सुवर्णा मसने, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, सहायक निबंधक अमोल डफळे उपस्थित होते. (वार्ताहर) बाजार समितीवर करडी नजर! आढावा बैठकीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर बाजार समितीवर करडी नजर असल्याचे दाखवून दिले. सहायक निबंधक डफळे यांना त्यांनी बाजार आवारात किती व्यापारी शेतकऱ्यांचे गाळे आहेत, रहिवासी बांधकामे किती आहेत, मोठ्या जागेची कशी विल्वेवाट लावली आहे, शेतकऱ्यांना तेथे व्यवसाय करता येतो का, याबाबतचा सविस्तर अहवाल देण्याचे आदेश दिले.