शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

पावसात दूषित पाणी ठरेल जीवघेणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे रोगराई बळावत आहे. त्यामुळे पाणी उकळून पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे रोगराई बळावत आहे. त्यामुळे पाणी उकळून पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मेडिक्लोअरसारख्या अैाषधांच्या वापराद्वारेही पाण्याचे शुद्धीकरण करता येईल.

पावसाळ्यात पाण्याचे स्रोत दूषित होतात. शुद्धीकरण प्रकल्पात पाण्याचे शंभर टक्के निर्जंतुकीकरण होत नाही. गटारे ओव्हरफ्लो झाल्याने सांडपाणी थेट नदीत मिसळते. सांगली शहराचा विचार करता, शेरीनाला पावसाळ्यात नेहमीच कृष्णेत मिसळत असतो. या स्थितीत पाण्याची जोखीम वाढते. दूषित पाण्याने विविध पोटविकारांना आमंत्रण मिळते. गॅस्ट्रोसारख्या साथी फैलावतात.

बॉक्स

गॅस्ट्रो, डायरीया आणि विषमज्वर

- दूषित पाणी पिण्याने प्रामुख्याने पोटविकार बळावतात.

- हगवण, गॅस्ट्रो, कॉलरा, विषमज्वर हे पावसाळ्यात उदभवणारे सार्वत्रिक आजार आहेत.

- वाताच्या विकारासोबतच सर्दी, पडसे, खोकला हेदेखील आजार सुरू होतात.

- सध्याच्या कोरोना साथीच्या काळात तर सर्दी-पडसे फारच जोखमीचे ठरते.

- दूषित पाणी पोटात जाण्याने काविळीची बाधा होते, लेप्टोस्पायरोसीसही फैलावतो.

बॉक्स

आजाराची लक्षणे

- जुलाब, उलट्या, ताप ही दूषित पाण्याच्या बाधेची काही लक्षणे आहेत.

- पोटात मळमळून सतत स्वच्छतागृहात धाव घ्यावी लागते.

- उलटी व जुलाबाने शरीर कोरडे पडते, म्हणजेच गॅस्ट्रो उदभवतो.

- दिवसभरात अनेकदा पातळ, पाण्यासारखे शौचाला होते.

- जीभ व तोंड कोरडे पडते, डोळे खोल जातात. लघवीचा रंग बदलतो.

बॉक्स

हे करा उपाय

पावसाळ्यात उकळून थंड केलेले पाणी प्या, दहा लिटर पाण्यात एक थेंब मेडिक्लोअरचा वापर करा, पाणी जास्त दिवस साठवून वापरू नका, बाहेरचे पाणी टाळा.

बॉक्स

सांगलीकरांच्या नशिबी बारमाही शेरीनाला

शुध्द पाण्यासाठी धडपडणाऱ्या सांगलीकरांच्या नशिबी शेरीनाला बारमाहीच आहे. पावसाळ्यात तर कृष्णेची गटारगंगाच होते. महापालिकेची शुद्धीकरण यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत असली, तरी पावसाळ्यात नळाला गढूळ पाणी येते. त्यामुळे नागरिकांनी घरोघरी प्युरिफायर बसवले आहेत. यामुळे शहरात फिल्टर प्लॅन्टसची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कॅनद्वारे पाणी पुरविण्याचा धंदाही फोफावला आहे, पण त्याच्या शुद्धतेवरही कोणाचेच नियंत्रण नाही.