शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

काश्मीरमधील मराठी बांधवांचा संपर्क तुटला

By admin | Updated: September 9, 2014 23:46 IST

नातेवाईक हवालदिल : जम्मू-काश्मीरला पुराचा तडाखा

विटा : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाल्याने हजारो लोक अडकून पडले असतानाच सोने-चांदी गलई व्यवसायानिमित्त जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक झालेल्या सांगली, सातारा जिल्ह्यातीलही शेकडो मराठी बांधवांचा नातेवाईकांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले असून, आज मंगळवारी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी जम्मू-काश्मीरमधील मराठी बांधव व त्यांचे जिल्ह्यातील नातेवाईक यांच्यासाठी संपर्क केंद्र सुरू केले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यात अनेक नागरिक अडकले आहेत. सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, तासगाव व कडेगाव आणि सातारा जिल्ह्यातील खटाव, माण यासह अन्य तालुक्यातील शेकडो लोक सोने-चांदी गलई व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक आहेत. त्यामुळे या मराठी बांधवांनाही पुराचा फटका बसला आहे.जम्मू-काश्मीरमधील आपल्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न गावाकडील नातेवाईकांनी केला असता, कोणताही संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. याबाबत माजी आ. अनिल बाबर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना याबाबतची माहिती देऊन मराठी बांधवांच्या मदतीसाठी विनंती केली. त्यावेळी खा. राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी संपर्क साधून मदतीसाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. त्यानंतर बाबर यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना लेखी पत्र देऊन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क केंद्र सुरू करण्याची मागणी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी कुशवाह यांनी, संपर्क केंद्र सुरू केले असून, मदतीसाठी नातेवाईकांनी ०२३३/२३७३०६३ या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. (वार्ताहर)जिल्हाधिकारी कुशवाह यांनी संपर्क केंद्र सुरू केले असून, मदतीसाठी नातेवाईकांनी ०२३३/२३७३०६३ या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन कुशवाह यांनी केले आहे. सांगली, सातारा जिल्ह्यातीलही शेकडो मराठी बांधवांचा नातेवाईकांशी संपर्क तुटल्यामुळे नातेवाईक हवालदिल.