शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

महाजनादेश यात्रेकरिता महावितरणचे ग्राहक वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:04 IST

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महाजनादेश यात्रा राज्यभर सुरू असून, तिचे आगमन सोमवारी सांगलीत झाले. वाहनांच्या ...

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महाजनादेश यात्रा राज्यभर सुरू असून, तिचे आगमन सोमवारी सांगलीत झाले. वाहनांच्या ताफ्यातील रथाच्या उंचीमुळे अडथळा नको म्हणून महावितरण कंपनीने रस्त्यावरील विद्युत तारा तोडल्यामुळे पलूस तालुक्यातील बांबवडे, येळावीतील नागरिकांना अंधारात रहावे लागले. सांगली शहरातही काही भागात सोमवारी रात्री नऊपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. लोकांना वेठीस धरल्याने संतप्त प्रतिक्रिया आहेत. अनेक झाडांची कत्तलही करण्यात आली.सांगलीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यात्रेतील वाहनाला अडथळा नको म्हणून सुरक्षेसाठी विजेच्या तारा तोडल्याने त्याचा बोजा ग्राहकांवर बसणार आहे. मात्र वीज जोडणीचा फारसा खर्च नसल्याचा दावा महावितरणचे अधिकारी करीत आहेत. प्रत्यक्षात पलूस ते पाचवा मैल या रस्त्यावरील बारा ते तेरा ठिकाणच्या तारा तोडल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे अनेक कुटुंबांना अंधारातच स्वागत करावे लागले. उंच वाहनांना अडथळा नको म्हणून अनेक ठिकाणच्या विद्युत तारा तोडून त्याचा लाखो रुपयांचा खर्च ग्राहकांवर का?, असा सवाल उपस्थित होत आहे.पलूस तालुक्यातील बांबवडे आणि तासगाव तालुक्यातील येळावी गावातील अनेक कुटुंबीयांच्या घरात दोन दिवस अंधार होता. राज्य सरकारने रॉकेल देणेही बंद केल्यामुळे तेथील कुटुंबीयांचे प्रचंड हाल झाले. याला जबाबदार कोण, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण भागाबरोबरच मिरज ते सांगली, आंबेडकर रस्ता ते कोल्हापूर रस्त्यावरील अनेक ठिकाणच्या विद्युत तारा तोडाव्या लागल्या आहेत. महाजनादेश यात्रा गेल्यानंतरही अनेक ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला.महाजनादेश यात्रेमुळे जनता अंधारात : संतोष पाटीलमुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी सांगली-मिरजेतील वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्याचबरोबर यात्रेच्या मार्गावरील विद्युतपुरवठाही खंडित करण्यात आला. यात्रा संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत कॉलेज कॉर्नर, उत्तर शिवाजीनगर, काँग्रेस कमिटी, पुष्पराज चौक, कोल्हापूर रोड परिसर अंधारात होता. महाजनादेश यात्रेमुळे जनतेत आनंदाचे वातावरण अपेक्षित होते. पण या यात्रेने सांगलीकरांना अंधारात ढकलल्याची टीका मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक संतोष पाटील यांनी केली.