शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

महाजनादेश यात्रेकरिता महावितरणचे ग्राहक वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:04 IST

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महाजनादेश यात्रा राज्यभर सुरू असून, तिचे आगमन सोमवारी सांगलीत झाले. वाहनांच्या ...

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महाजनादेश यात्रा राज्यभर सुरू असून, तिचे आगमन सोमवारी सांगलीत झाले. वाहनांच्या ताफ्यातील रथाच्या उंचीमुळे अडथळा नको म्हणून महावितरण कंपनीने रस्त्यावरील विद्युत तारा तोडल्यामुळे पलूस तालुक्यातील बांबवडे, येळावीतील नागरिकांना अंधारात रहावे लागले. सांगली शहरातही काही भागात सोमवारी रात्री नऊपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. लोकांना वेठीस धरल्याने संतप्त प्रतिक्रिया आहेत. अनेक झाडांची कत्तलही करण्यात आली.सांगलीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यात्रेतील वाहनाला अडथळा नको म्हणून सुरक्षेसाठी विजेच्या तारा तोडल्याने त्याचा बोजा ग्राहकांवर बसणार आहे. मात्र वीज जोडणीचा फारसा खर्च नसल्याचा दावा महावितरणचे अधिकारी करीत आहेत. प्रत्यक्षात पलूस ते पाचवा मैल या रस्त्यावरील बारा ते तेरा ठिकाणच्या तारा तोडल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे अनेक कुटुंबांना अंधारातच स्वागत करावे लागले. उंच वाहनांना अडथळा नको म्हणून अनेक ठिकाणच्या विद्युत तारा तोडून त्याचा लाखो रुपयांचा खर्च ग्राहकांवर का?, असा सवाल उपस्थित होत आहे.पलूस तालुक्यातील बांबवडे आणि तासगाव तालुक्यातील येळावी गावातील अनेक कुटुंबीयांच्या घरात दोन दिवस अंधार होता. राज्य सरकारने रॉकेल देणेही बंद केल्यामुळे तेथील कुटुंबीयांचे प्रचंड हाल झाले. याला जबाबदार कोण, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण भागाबरोबरच मिरज ते सांगली, आंबेडकर रस्ता ते कोल्हापूर रस्त्यावरील अनेक ठिकाणच्या विद्युत तारा तोडाव्या लागल्या आहेत. महाजनादेश यात्रा गेल्यानंतरही अनेक ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला.महाजनादेश यात्रेमुळे जनता अंधारात : संतोष पाटीलमुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी सांगली-मिरजेतील वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्याचबरोबर यात्रेच्या मार्गावरील विद्युतपुरवठाही खंडित करण्यात आला. यात्रा संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत कॉलेज कॉर्नर, उत्तर शिवाजीनगर, काँग्रेस कमिटी, पुष्पराज चौक, कोल्हापूर रोड परिसर अंधारात होता. महाजनादेश यात्रेमुळे जनतेत आनंदाचे वातावरण अपेक्षित होते. पण या यात्रेने सांगलीकरांना अंधारात ढकलल्याची टीका मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक संतोष पाटील यांनी केली.