शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

भाजीपाला दरवाढ कायम राहिल्याने ग्राहकांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:39 IST

सांगली : बदलते वातावरण, पावसाने लावलेली हजेरी यामुळे भाजीपाला आवकेवर त्याचा परिणाम झाला आहे. भाजीपाला दरातील वाढ अद्यापही ...

सांगली : बदलते वातावरण, पावसाने लावलेली हजेरी यामुळे भाजीपाला आवकेवर त्याचा परिणाम झाला आहे. भाजीपाला दरातील वाढ अद्यापही कायम आहे. स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या असलेल्या कांदा, लसूण आणि बटाट्याचे दर अद्यापही कायम असून, सर्व भाज्यांमध्ये सरासरी २० रुपयांनी वाढल्याने ग्राहकांची गैरसोय झाली आहे.

प्रतिकिलो ४० ते ६० रुपये प्रतिकिलोवर असणाऱ्या भाज्या ६० ते १०० रुपयांवर पोहोचले आहेत. गवार, वांग्याचे दर वाढले आहेत, तर पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे.

चौकट

किराणामालाचे दर स्थिर असल्याने काहीसा दिलासा असलातरी धान्यातील दरवाढ कायम आहे. चांगल्या प्रतीचा गहू प्रतिक्विंटल ३२०० ते ३४०० वर पोहोचला आहे, तर ज्वारीच्या दरातही वाढ झाली आहे. बार्शी शाळूला ग्राहकांची चांगली पसंती आहे. त्याचा दर ४३०० ते ४६०० पर्यंत आहे.

चौकट

फळांच्या दरात वाढ

सफरचंदाची आवक चांगली असतानाही दरात मात्र वाढ झाली आहे. पंधरवड्यापूर्वी ८० रुपयांपर्यंत असणारा दर आता ११० ते १२० प्रतिकिलोवर जाऊन पोहोचला आहे.

चौकट

बार्शी शाळूला मागणी

सध्या धान्याची चांगली विक्री होत असल्याचे धान्य व्यापाऱ्यांनी सांगितले. येत्या महिन्यात अजून विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातही चांगल्या प्रतीचा बार्शी शाळूची आवक बाजारात वाढली आहे. ग्राहकही त्यांची खरेदी करत आहेत.

चौकट

गवारी, दोडका दर वाढले

या आठवड्यात गवारीचे प्रतिकिलो दर वाढताना ते ८० ते १०० रुपयांवर पोहोचले आहेत. लसूण दरात पुन्हा वाढ होताना १०० ते १२० रुपयांवर दर गेला आहे. आता बाजारपेठेला उन्हाळ्याची चाहूल लागणार असल्याने दरवाढ कायमच राहील, असा अंदाज आहे.

कोट

आठवडी बाजारात अद्यापही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, म्हणावी तशी भाज्यांची आवक होताना दिसत नाही. अजून आवक कमी होणार आहे. त्यामुळे दरवाढ अटळ वाटते आहे.

मीरासाब नदाफ, व्यापारी

कोट

पेट्रोल दरवाढीबरोबरच एकाचवेळी भाजीपाला, किराणा दरातही वाढ होत आहे. मध्यमवर्गीयांना ही अडचण येत आहेत. आता पुन्हा दरवाढ होऊ नये अशीच अपेक्षा आहे.

सुलोचना आंबेे, गृहिणी

कोट

महिनाभरापासूून ग्राहकांकडून धान्य, कडधान्यांना चांगली मागणी आहे. आवकही समाधानकारक असलीतरी आवक वाढली म्हणून दर कमी झालेले नाहीत आणि एकूणच आढावा घेतला तर दर कमी हाेण्याची शक्यता खूपच कमी आहे.

अजित पाटील, व्यापारी