शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

सदाभाऊंच्या भाषणांवर येणार मर्यादा

By admin | Updated: July 27, 2016 00:39 IST

मंत्रीपदामुळे होणार अडचण : शासनावर टीका करणे होणार कठीण

प्रताप बडेकर -- कासेगाव--आक्रमक, रांगड्या व अस्सल गावरान भाषणाने सदाभाऊ खोत हे सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. भाजपने त्यांना घटकपक्षाच्या माध्यमातून मंत्री केल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडली आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर आता मर्यादा पडणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ‘मुलुखमैदानी तोफ’ म्हणून उभ्या महाराष्ट्रात सदाभाऊ खोत प्रसिध्द आहेत. खा. राजू शेट्टी व सदाभाऊ या जोडीने पश्चिम महाराष्ट्रात ऊस दरासाठी मोठमोठी आंदोलने केली आहेत. गेल्या १५ वर्षांत त्यांनी साखरसम्राटांना सळो की पळो करुन सोडले आहे. त्यांच्यामुळेच उसाला चांगला दर मिळाला, हे वास्तव आहे. या ऊसदर आंदोलनाच्या माध्यमातून सदाभाऊंचा सर्वसामान्य व शेतकऱ्यांशी ऋणानुबंध निर्माण झाला. आक्रमक, रांगड्या भाषणशैलीमुळे त्यांनी भल्या-भल्यांना जेरीस आणले. पाठीमागे कोणतीही मोठी शक्ती नसताना, केवळ भाषणचातुर्यावरच त्यांनी राष्ट्रवादीचे मोठे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांना खासदारकीच्या निवडणुकीत झुंजविले होते. अगदी अल्पमतात सदाभाऊ पराभूत झाले होते. या लढतीची चर्चा राज्यभर झाली.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, आमदार अजित पवार, आमदार जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, आ. हसन मुश्रीफ आदी राजकीय नेत्यांवरील टीकेमुळे सदाभाऊ खोत यांना प्रसिध्दी मिळाली. मात्र आता सदाभाऊ राज्यात मंत्री झाल्याने त्यांच्या भाषणातून बोलण्यावर निर्बंध येणार आहेत. ऊसदराबाबत ते कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.ऊस दराच्या भूमिकेकडे लक्षराष्ट्रवादीचे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील व सदाभाऊ खोत यांच्यामध्ये ऊस दरासाठी संघर्ष झाला आहे. एफआरपी, ऊस दरासाठी जयंत पाटील यांच्याविरोधात अनेक आंदोलने सदाभाऊंनी केली आहेत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. सदाभाऊ कृषिमंत्री झाले आहेत. त्यामुळे येथून पुढे ऊसदराच्या प्रश्नासाठी सदाभाऊ कोणती भूमिका घेणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे.