शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
2
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
3
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
4
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
5
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
6
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
7
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
8
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
9
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
10
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
11
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
12
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
13
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
14
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
15
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
16
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
17
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
18
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
19
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
20
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
Daily Top 2Weekly Top 5

अपहाराकडे अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

By admin | Updated: December 5, 2015 00:44 IST

जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप : सुरेश मोहिते करणार पीआरसी समितीकडे लेखी तक्रार--घोटाळे करा बिनधास्त राहा-४

सांगली : जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींमध्ये कर्मचाऱ्यांकडून पंचवीस वर्षात चार कोटींचा अपहार झाला असून, त्याची जबाबदारीही निश्चित झाली आहे. तरीही अधिकाऱ्यांकडून अपहाराची रक्कम वसूल केलेली नसल्याबद्दल ‘लोकमत’मधून मालिका प्रसिध्द झाली. त्यानंतर प्रशासनाच्या भूमिकेबद्दल जिल्हा परिषद सदस्यांनी संताप व्यक्त केला. वसुलीकडे अधिकारी जाणीवपूर्वकच दुर्लक्ष करीत असल्याचा सदस्यांनी आरोप केला. काँग्रेसचे पक्षप्रतोद सुरेश मोहिते यांनी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल पीआरसी समितीकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले. (समाप्त)ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याचे सिध्द झाले आहे. त्या अपहाराची रक्कमही निश्चित झाली असताना, संबंधित अधिकाऱ्यांना ती रक्कम वसूल करण्यात अडचणच नाही. परंतु, जाणीवपूर्वक वसुलीकडे दुर्लक्ष करून अधिकारी तीन वर्षाचा कार्यकाल संपवून बदली करवून घेऊन निघून जात आहेत. अधिकाऱ्यांनी असे न करता अपहार करणाऱ्यांच्या पगार आणि मालमत्तेवर बोजा चढवून रक्कम वसूल करण्याची गरज आहे. पीआरसी समितीकडे तक्रार करणार आहे. - सुरेश माहिते, पक्षप्रतोद, जिल्हा परिषद.शासनाकडून ग्रामपंचायतींना कोट्यवधीचा निधी दिला जात आहे. या निधीचा योग्यप्रकारे खर्च होतो की नाही, हे लेखापरीक्षण झाल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे शासनाने वर्षाला सक्तीने ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण करण्याची गरज आहे. लेखापरीक्षणाचा अहवाल जिल्हा परिषदेला मिळाला पाहिजे. दरवर्षीचा अहवाल मिळाल्यास अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर, पुढील निधी रोखण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला दिला पाहिजे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे.- छायाताई खरमाटे, सदस्या, जिल्हा परिषद ‘लोकमत’ने ‘घोटाळे करा बिनधास्त राहा’ या मालिकेच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर प्रकाशझोत टाकून जनतेला सज्ञान केले आहे. योजनांची माहिती जनतेला कळू दिली जात नाही. सर्वप्रथम समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत माहिती कळविल्यास त्याच्या अंमलबजावणीबाबत लोक दक्ष राहतील. कर्मचारी व अधिकाऱ्यांवर वचक ठेवला पाहिजे. भ्रष्टाचार सिध्द झाल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.- सुरेंद्र वाळवेकर, सरपंच, भिलवडी.येत्या आठ दिवसात अपहार झालेल्या गावातील सर्व ग्रामसेवकांची बैठक घेऊन दोषींवर रक्कम निश्चित करण्यात येणार आहे. याचा अहवाल तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहे. दोषींवर फौजदारी कारवाई सुध्दा होईल. सेवेत असणाऱ्यांच्या पगारातून अपहाराची रक्कम वसुली करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यास प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवून अपहाराची रक्कम वसूल करणार आहे.- रविकांत आडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.