शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

अपहाराकडे अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

By admin | Updated: December 5, 2015 00:44 IST

जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप : सुरेश मोहिते करणार पीआरसी समितीकडे लेखी तक्रार--घोटाळे करा बिनधास्त राहा-४

सांगली : जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींमध्ये कर्मचाऱ्यांकडून पंचवीस वर्षात चार कोटींचा अपहार झाला असून, त्याची जबाबदारीही निश्चित झाली आहे. तरीही अधिकाऱ्यांकडून अपहाराची रक्कम वसूल केलेली नसल्याबद्दल ‘लोकमत’मधून मालिका प्रसिध्द झाली. त्यानंतर प्रशासनाच्या भूमिकेबद्दल जिल्हा परिषद सदस्यांनी संताप व्यक्त केला. वसुलीकडे अधिकारी जाणीवपूर्वकच दुर्लक्ष करीत असल्याचा सदस्यांनी आरोप केला. काँग्रेसचे पक्षप्रतोद सुरेश मोहिते यांनी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल पीआरसी समितीकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले. (समाप्त)ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याचे सिध्द झाले आहे. त्या अपहाराची रक्कमही निश्चित झाली असताना, संबंधित अधिकाऱ्यांना ती रक्कम वसूल करण्यात अडचणच नाही. परंतु, जाणीवपूर्वक वसुलीकडे दुर्लक्ष करून अधिकारी तीन वर्षाचा कार्यकाल संपवून बदली करवून घेऊन निघून जात आहेत. अधिकाऱ्यांनी असे न करता अपहार करणाऱ्यांच्या पगार आणि मालमत्तेवर बोजा चढवून रक्कम वसूल करण्याची गरज आहे. पीआरसी समितीकडे तक्रार करणार आहे. - सुरेश माहिते, पक्षप्रतोद, जिल्हा परिषद.शासनाकडून ग्रामपंचायतींना कोट्यवधीचा निधी दिला जात आहे. या निधीचा योग्यप्रकारे खर्च होतो की नाही, हे लेखापरीक्षण झाल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे शासनाने वर्षाला सक्तीने ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण करण्याची गरज आहे. लेखापरीक्षणाचा अहवाल जिल्हा परिषदेला मिळाला पाहिजे. दरवर्षीचा अहवाल मिळाल्यास अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर, पुढील निधी रोखण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला दिला पाहिजे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे.- छायाताई खरमाटे, सदस्या, जिल्हा परिषद ‘लोकमत’ने ‘घोटाळे करा बिनधास्त राहा’ या मालिकेच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर प्रकाशझोत टाकून जनतेला सज्ञान केले आहे. योजनांची माहिती जनतेला कळू दिली जात नाही. सर्वप्रथम समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत माहिती कळविल्यास त्याच्या अंमलबजावणीबाबत लोक दक्ष राहतील. कर्मचारी व अधिकाऱ्यांवर वचक ठेवला पाहिजे. भ्रष्टाचार सिध्द झाल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.- सुरेंद्र वाळवेकर, सरपंच, भिलवडी.येत्या आठ दिवसात अपहार झालेल्या गावातील सर्व ग्रामसेवकांची बैठक घेऊन दोषींवर रक्कम निश्चित करण्यात येणार आहे. याचा अहवाल तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहे. दोषींवर फौजदारी कारवाई सुध्दा होईल. सेवेत असणाऱ्यांच्या पगारातून अपहाराची रक्कम वसुली करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यास प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवून अपहाराची रक्कम वसूल करणार आहे.- रविकांत आडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.