शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

अपहाराकडे अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

By admin | Updated: December 5, 2015 00:44 IST

जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप : सुरेश मोहिते करणार पीआरसी समितीकडे लेखी तक्रार--घोटाळे करा बिनधास्त राहा-४

सांगली : जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींमध्ये कर्मचाऱ्यांकडून पंचवीस वर्षात चार कोटींचा अपहार झाला असून, त्याची जबाबदारीही निश्चित झाली आहे. तरीही अधिकाऱ्यांकडून अपहाराची रक्कम वसूल केलेली नसल्याबद्दल ‘लोकमत’मधून मालिका प्रसिध्द झाली. त्यानंतर प्रशासनाच्या भूमिकेबद्दल जिल्हा परिषद सदस्यांनी संताप व्यक्त केला. वसुलीकडे अधिकारी जाणीवपूर्वकच दुर्लक्ष करीत असल्याचा सदस्यांनी आरोप केला. काँग्रेसचे पक्षप्रतोद सुरेश मोहिते यांनी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल पीआरसी समितीकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले. (समाप्त)ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याचे सिध्द झाले आहे. त्या अपहाराची रक्कमही निश्चित झाली असताना, संबंधित अधिकाऱ्यांना ती रक्कम वसूल करण्यात अडचणच नाही. परंतु, जाणीवपूर्वक वसुलीकडे दुर्लक्ष करून अधिकारी तीन वर्षाचा कार्यकाल संपवून बदली करवून घेऊन निघून जात आहेत. अधिकाऱ्यांनी असे न करता अपहार करणाऱ्यांच्या पगार आणि मालमत्तेवर बोजा चढवून रक्कम वसूल करण्याची गरज आहे. पीआरसी समितीकडे तक्रार करणार आहे. - सुरेश माहिते, पक्षप्रतोद, जिल्हा परिषद.शासनाकडून ग्रामपंचायतींना कोट्यवधीचा निधी दिला जात आहे. या निधीचा योग्यप्रकारे खर्च होतो की नाही, हे लेखापरीक्षण झाल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे शासनाने वर्षाला सक्तीने ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण करण्याची गरज आहे. लेखापरीक्षणाचा अहवाल जिल्हा परिषदेला मिळाला पाहिजे. दरवर्षीचा अहवाल मिळाल्यास अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर, पुढील निधी रोखण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला दिला पाहिजे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे.- छायाताई खरमाटे, सदस्या, जिल्हा परिषद ‘लोकमत’ने ‘घोटाळे करा बिनधास्त राहा’ या मालिकेच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर प्रकाशझोत टाकून जनतेला सज्ञान केले आहे. योजनांची माहिती जनतेला कळू दिली जात नाही. सर्वप्रथम समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत माहिती कळविल्यास त्याच्या अंमलबजावणीबाबत लोक दक्ष राहतील. कर्मचारी व अधिकाऱ्यांवर वचक ठेवला पाहिजे. भ्रष्टाचार सिध्द झाल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.- सुरेंद्र वाळवेकर, सरपंच, भिलवडी.येत्या आठ दिवसात अपहार झालेल्या गावातील सर्व ग्रामसेवकांची बैठक घेऊन दोषींवर रक्कम निश्चित करण्यात येणार आहे. याचा अहवाल तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहे. दोषींवर फौजदारी कारवाई सुध्दा होईल. सेवेत असणाऱ्यांच्या पगारातून अपहाराची रक्कम वसुली करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यास प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवून अपहाराची रक्कम वसूल करणार आहे.- रविकांत आडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.