शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसवाल्यांनो, सावध ऐका पुढल्या हाका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:28 IST

श्रीनिवास नागे जयंत पाटील यांचे हिकमती नेतृत्व, रचलेल्या सावध चाली, सत्तेभोवती घिरट्या घालणारी दुसरी-तिसरी फळी, घरवापसीसाठी आसुसलेले नेते यामुळे ...

श्रीनिवास नागे

जयंत पाटील यांचे हिकमती नेतृत्व, रचलेल्या सावध चाली, सत्तेभोवती घिरट्या घालणारी दुसरी-तिसरी फळी, घरवापसीसाठी आसुसलेले नेते यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी मजबूत होत आहे. भाजपचे बहुतांश नेते पुन्हा जयंतरावांच्या ओंजळीने पाणी पिऊ लागले आहेत. शिवसेनेची अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे. आता काँग्रेस पंखाखाली आली की, जिल्ह्यावर मांड पक्की, हे माहीत असल्याने जयंतरावांचे डावपेच सुरू झाले आहेत. मात्र ‘सावध ऐका पुढल्या हाका’ हे हाकारे काँग्रेसच्या सगळ्या गट आणि उपगटांपर्यंत अजून पोहोचलेले नाहीत.

नुकतेच ‘मिशन महापालिका’ पार पडले. आता जिल्हा परिषदेतील उलथापालथ आहे. पाठोपाठ जिल्हा बँक, बाजार समितीच्या निवडणुका होतील. तेथे काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी आणि आपला गटच ‘पॉवरफुल’ ठरला पाहिजे, यासाठी जयंतराव पावले टाकत आहेत. काँग्रेसमधील काहींना ते आपल्याकडे वळवतीलच, शिवाय कदम-दादा गटात आणि उपगटांतही बत्ती लावून देतील, अशी कुजबूज सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी जयंतरावांनी मिरज पूर्वभागातील मदन पाटील गट राष्ट्रवादीत आणला. मदनभाऊंच्या निधनानंतर हा गट सैरभैर झाला होता. या गटाने लोकसभेला दोनदा भाजपच्या संजयकाका पाटलांना मदत केली. आता सत्तेच्या जोरावर जयंतरावांनी तो राष्ट्रवादीत आणला. हे करताना मिरज पूर्वभागातील सभापतींसह बाजार समितीच्या संचालकांना मुदतवाढ देऊन एका दगडात दोन पक्षी मारले. एकीकडे या भागात आपला गट वाढवत काँग्रेसला ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ दिला. सत्तेच्या जोरावर कार्यकर्ते फोडणाऱ्या भाजपचे उट्टे काढले आणि दुसरीकडे बाजार समितीसह पुढच्या सगळ्या निवडणुकांसाठी पेरणी केली.

खानापूर-आटपाडीत राष्ट्रवादी संपण्याच्या वाटेवर असताना काँग्रेसवर नाराज झालेल्या माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाला. तेथे काँग्रेसच्या कदम गटाने नेहमीच अनिल बाबर गटाला मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे सदाशिवराव पाटील यांनी काँग्रेस सोडली होती. त्यांच्या माध्यमातून विटा शहरासह खानापूर-आटपाडीत राष्ट्रवादीला तगडा शिलेदार मिळाला आहे. आता तेथे प्रतीक्षा आहे आणखी एका मातब्बर गटाची..! (उत्तरार्ध)

चौकट

तासगाव-कवठेमहांकाळची नवी समीकरणे

तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीचा आर. आर. पाटील गट भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या गटासोबत सख्ख्या भावासारखा राहत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंतरावांना हे खटकत नाही, कारण त्यांचा आणि संजयकाकांचाही दोस्ताना वाढला आहे. कवठेमहांकाळच्या सगरे गटाकडील महांकाली साखर कारखाना बंद पडला आहे. तो चालवण्यास घेण्यासाठी जयंतरावांच्या हालचाली सुरू आहेत. त्यावर राजारामबापू कारखान्याच्या पाचव्या युनिटची मोहोर उमटली, तर जतपाठोपाठ कवठेमहांकाळचे सहकार क्षेत्रही जयंतरावांच्या कब्जात येईल. तेथे नवी समीकरणे उदयास येऊन आर. आर. गट निष्प्रभ होण्याची भीती व्यक्त होत आहे.

नेतृत्व-कर्तृत्व आणि निष्क्रियता

गेल्या काही वर्षांत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदापासून पक्षातील महत्त्वाची पदे कदम गटाकडेच आहेत. या गटाचे नेतृत्व आणि कर्तृत्व, पक्षकार्यातील मेहनतीला मिळालेले हे झुकते माप आहे. त्याचवेळी धरसोड वृत्ती आणि निष्क्रियतेमुळे दादा गट मागे पडल्याचे दिसून येते. अलीकडे विशाल पाटील गतीने सक्रिय झाले आहेत. पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात, बैठकीत ते पुढे असतात, पण त्यांच्याकडे काँग्रेसचे कोणतेच पद नाही. दोन्ही गटातील विसंवादामुळे विशाल पाटील यांना लोकसभेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवावी लागली होती. बेरक्या जयंतरावांनी तर जाहीर कार्यक्रमात ‘स्वाभिमानीचे विशाल पाटील’ असा खवचट उल्लेख करण्याची संधीही सोडलेली नाही.

जत तालुक्यात लावली कळ

जतची आमदारकी काँग्रेसच्या विक्रम सावंत यांच्याकडे आहे. ते विश्वजित कदम यांचे मावसभाऊ. जतच्या पूर्वभागाला कर्नाटकातून पाणी देण्यासाठी ते झगडत आहेत. पण त्यांचे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत. कर्नाटकाऐवजी महाराष्ट्रातूनच पाणी देण्याची खर्चिक योजना जयंतरावांनी पुढे आणली आहे. त्यासाठी सावंत यांचे विरोधक, भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांना राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण दिले आहे, तर दुसरे विरोधक प्रकाश जमदाडे यांना भाजपमधून राष्ट्रवादीत घेतलेही आहे. या हालचाली सावंत यांना दाबण्यासाठीच नव्हेत काय?