शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

जिल्हा परिषदेवर कॉँग्रेसची सत्ता आणणार

By admin | Updated: September 6, 2016 23:47 IST

मोहनराव कदम : खरसुंडी येथे कॉँग्रेस कार्यकर्ता मेळावा, प्रचारसभांची सुरूवात

खरसुंडी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कॉँग्रेस पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर स्वतंत्र निवडणूक लढवून एकहाती सत्ता प्रस्थापित करेल, असा विश्वास कॉँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मोहनराव कदम यांनी व्यक्त केला. खरसुंडी (ता. आटपाडी) येथे नाथनगरीच्या राम कृष्ण गुरव शाळेच्या सभागृहात कॉँग्रेसचा आटपाडी तालुका कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना कदम बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेची सुरुवात करण्यात आली. यावेळी कॉँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील, कॉँग्रेस युवक नेते जयदीप भोसले, जिल्हा बॅँकेचे शशिकांत देठे, मार्केट कमिटी संचालक विजय पुजारी, कॉँग्रेसचे आटपाडी तालुकाध्यक्ष वसंतराव गायकवाड, युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल गायकवाड, कॉँग्रेसचे जिल्हा नेते सतेज पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना कदम म्हणाले, कॉँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणारा पक्ष आहे. कॉँग्रेस पक्षाने देशात व राज्यात सत्ता असताना अनेक योजना सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, कामगार वर्गासाठी राबविल्या आहेत. सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडणारा, परंपरा असलेला हा पक्ष आहे. त्यामुळे दुसऱ्यावर टीका न करता कार्यकर्त्यांनी सामान्यांपर्यंत पोहोचून युती शासनाने जाहिरातबाजी करून, फसवी आश्वासने देऊन जनतेची कशी फसवणूक केली आहे, याची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रामाणिकपणे काम करावे. आजवर गटबाजीमुळे कॉंग्रेसचे नुकसान झाले आहे. यापुढे आपापसातील गटबाजीला थारा न देता एकसंध होऊन काम करावे. आतापासूनच युवक कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावातील प्रभागात लक्ष घालून येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामाला सुरूवात करावी, असेही ते म्हणाले. यावेळी खरसुंडी विकास सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जयराम पुजारी यांचा सत्कार मोहनराव कदम यांच्याहस्ते करण्यात आला. कॉँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष जयदीप भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहन काका भोसले यांच्या विचारांचा वारसा चालवत सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कॉँग्रेसचे नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मदतीने आटपाडी तालुक्याचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर आहे. नेलकरंजी (खरसुंडी) जिल्हा परिषद गटात चालू असलेली कामे ही मोहनराव कदम यांनीच सुचविलेली असून, तीच कामे चालू आहेत. तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असून, ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कॉँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मोहनकाका भोसले यांना मानणाऱ्या सर्वांना एकत्र आणून पुढील निवडणुकीत कॉँग्रेसची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आहे.यावेळी प्रदीप पाटील, विलास पाटील, अ‍ॅड. विलास देशमुख, मोहन खरात, प्रकाश जाधव, शिवाजी पाटील, रामहरी इंगवले, बाळासाहेब निचळ, नानाभाऊ पुजारी, पांडुरंग भिसे, स्वप्नील जाधव, अनिल जरंडकर, सदाभाऊ ढगे, योगेश पुजारी यांच्यासह कॉँग्रेसचे कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)टार्गेट ठरवा : एकत्र आल्यास विजय पक्कायावेळी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील म्हणाले, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीत कॉँग्रेसची सत्ता आणण्यासाठी निवडणुकीत आपला शत्रू कोण? आपले टार्गेट काय? याचा विचार करून एकत्र लढा दिला पाहिजे. खरसुंडी गावाच्या राजकारणाचे उदाहरण ताजे असल्याचे त्यांनी सांगितले. खरसुंडी विकास सोसायटी निवडणुकीत शिवसेना विरुध्द सर्व गट एकत्र येऊन १३ विरुध्द ० असे यश संपादन केले. शिवाय गावच्या सरपंचाने स्वत:चे टार्गेट फिक्स क रून पक्षांतर केले. असे असताना कॉँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापसातील जिरवाजिरवीचे राजकारण न करता एकसंध होऊ न येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपल्या पक्षाच्या शत्रू विरुध्दच निवडणूक लढवण्यास जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये आपली सत्ता येण्यास काहीच अडचण राहणार नसल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.