शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

जत तालुक्यातील काँग्रेस ‘रिचार्ज’

By admin | Updated: September 3, 2016 01:06 IST

नगरपरिषद पोटनिवडणूक : तालुक्याच्या राजकारणावर निकालाचे दूरगामी परिणाम

जयवंत आदाटे -- जत नगरपालिका प्रभाग क्रमांक पाचमधील एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर जत शहरासह तालुक्यातील कॉँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. अत्यंत चुरशीने लढविल्या गेलेल्या या निवडणुकीच्या निकालाचे तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. हणमंत कोळी यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरविल्यानंतर तेथे रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. परंतु या पोटनिवडणुकीला सार्वत्रिक निवडणुकीचे स्वरूप प्राप्त झाले होते. आमदार विलासराव जगताप, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक विक्रम सावंत, माजी सभापती सुरेश शिंदे यांनी या निवडणुकीत भाग घेतला होता. त्यामुळे उमेदवारापेक्षा हे नेतेच एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत, असे चित्र प्रभागात निर्माण झाले होते. त्यामुळे ही निवडणूक नेतेमंडळींनी प्रतिष्ठेची केली होती. यामुळे निवडणूक निकालाकडे जत तालुक्यासह जिल्ह्यातील नेत्यांचे लक्ष लागून राहिले होते. कॉँग्रेस पक्षाची उमेदवारी नबीसाहेब ऊर्फ मुन्ना पखाली यांना मिळाली होती. जिल्हा बॅँकेचे संचालक विक्रम सावंत, तालुका कॉँग्रेस कमिटी अध्यक्ष पी. एम. पाटील व त्यांचे समर्थक नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून प्रचार यंत्रणा राबविली. त्यामुळे त्यांना यश मिळाले आहे.भारतीय जनता पक्षाची उमेदवारी रमजान ऊर्फ बंटी नदाफ यांना मिळाली होती. आमदार विलासराव जगताप यांनी स्वत: वैयक्तिक लक्ष घालून प्रचार केला होता. परंतु दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी प्रभावी प्रचार केला नाही. सुरूवातीस त्यांनी प्रचारात आघाडी घेऊन हवा निर्माण केली होती. परंतु प्रत्यक्ष मतदानात मात्र ते पिछाडीवर राहिले. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. शरणाप्पा आक्की यांनी कॉँग्रेसअंतर्गत बंडखोरी करून निवडणूक लढविली होती. माजी सभापती सुरेश शिंदे व मन्सूर खतिब आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी चुरशीने प्रचार केला. प्रत्येक मतदारापर्यंत ते पोहोचले होते. मागील चार वर्षात जत शहरात कोणतेही ठोस काम झाले नाही. त्यामुळे मतदार सुरेश शिंदे समर्थक नगरसेवकांवर नाराज आहेत. पालिकेत त्यांची सत्ता असूनही त्यांना ते शक्य झाले नाही. त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसला आहे. याची क बुलीही त्यांनी जाहीर सभेत दिली होती. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची उमेदवारी शफीक ऊर्फ मोहोद्दीन इनामदार यांना मिळाली. नेतेमंडळींचा अभाव व प्रभावी प्रचारयंत्रणा नसल्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. महाआघाडीच्यावतीने अशोक कोळी यांनी निवडणूक लढविली. गौतम ऐवळे व अजित पाटील यांनी प्रचार सभा घेऊन वातावरण तापवले होते. परंतु मतदारांची सहानुभूती त्यांना मिळाली नाही. कॉँग्रेस पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले पखाली एकमेव नगरसेवक पालिकेत आहेत. यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉँगे्रसअंतर्गत वादामुळे निवडणूक चिन्ह मिळाले नव्हते. सध्या पालिकेत सुरेश शिंदे व विक्रम सावंत गटाची एकत्रित सत्ता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यातील फरक जत शहरातील नागरिकांना कळेनासा झाला आहे. आगामी निवडणुकीला सामोरे जाताना यापुढील काळात सत्ताधाऱ्यांना ठोस कार्यक्रम घेऊन जनतेसमोर जावे लागणार आहे. याची तयारी त्यांना यापुढील एका वर्षभरात करावी लागणार आहे. वर्षाची संधी : तरीही लाखो खर्चजत नगरपरिषदेची आगामी निवडणूक केवळ एक वर्षावर येऊन ठेपली आहे. यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवारास केवळ एकच वर्षाची संधी मिळणार, हे स्पष्ट होते. असे असतानाही निवडणुकीत मोठी चुरस निर्माण केली गेली. निवडणूक प्रचारात नेतेमंडळी व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप केले. प्रचारात शहराच्या विकासात भर घालणारा कोणताही प्रमुख मुद्दा नव्हता. शहरातील वाहतूक व्यवस्था, भाजी मंडई, खराब रस्ते, सार्वजनिक कचऱ्याची विल्हेवाट आदी प्रमुख प्रश्न असूनही त्यावर कोणतीच चर्चा झाली नाही. एक वर्षासाठी ही निवडणूक झाली. त्यानंतर सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तरीही उमेदवारांनी प्रचारासाठी लाखो रूपयांचा खर्च केला आहे. कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे आव्हानआगामी वर्षभरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. या निवडणूक निकालामुळे कॉँग्रेस कार्यकर्ते एकत्र आले आहेत. त्याचा फायदा त्यांना पुढील निवडणुकीत होणार आहे. परंतु नेतेमंडळींनी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची मोट बांधून त्यांना एकत्र आणणे आवश्यक आहे.