शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
6
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
7
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
8
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
9
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
10
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
11
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
12
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
13
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
14
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
15
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
16
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
17
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
18
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
19
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
20
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
Daily Top 2Weekly Top 5

पलूसमध्ये काँग्रेसला जबरदस्त धक्का

By admin | Updated: February 23, 2017 23:02 IST

भाजप-राष्ट्रवादीला यश : कॉँग्रेसला गटबाजीचा फटका

किरण सावंत--पलूस तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कॉँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे. येथे भाजप-राष्ट्रवादी युतीने मोठे यश मिळविले आहे. या पराभवामुळे कॉँग्रेसवर मात्र आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.पलूस तालुका हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पाचही जागांवर कॉँग्रेसने विजय मिळविला होता, तर पंचायत समितीवरही सत्ता काबीज केली होती. मात्र या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या चारही जागा कॉँग्रेसने गमावल्या आहेत. तालुक्यात भाजप व राष्ट्रवादीने योग्यवेळी युती करुन कॉँग्रेसला शह दिल्याने, भाजपने तीन, तर राष्ट्रवादीने एक जागा जिंकली.माजी आ. पृथ्वीराज देशमुख भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अरुण लाड यांच्यामध्ये दरी निर्माण झाली होती. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दोघांनी युती करण्याचा निर्णय घेतला. आमदार डॉ. पतंगराव कदम यांना शह देण्यासाठी योग्य रणनीती आखली व त्यामध्ये ते यशस्वी ठरले.पलूस तालुका कॉँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र जिल्हा परिषद व समितीतील अनपेक्षित अपयशामुळे आमदार डॉ. पतंगराव कदम यांना मोठा धक्का बसला आहे. प्रत्येक गावात कॉँग्रेसमध्ये असणाऱ्या अंतर्गत गटबाजीमुळेच पराभव झाल्याचे मानले जात आहे. कॉँग्रेसचा पराभव कॉँग्रेसच करु शकते, हे पुन्हा सिध्द झाले असून, या जबरदस्त पराभवानंतर आता आमदार डॉ. कदम गावोगावी असणाऱ्या गटबाजीवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पराभवाने कॉँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांवर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. डॉ. कदम यांनी केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नेते व कार्यकर्ते कमी पडल्याचेच या पराभवाने सिध्द झाले आहे. मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कुंडल जिल्हा परिषद गटातही आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड विजयी झाले आहेत. दुधोंडी, भिलवडी व अंकलखोप जि. प. गटातही भाजपने मुसंडी मारली. केवळ पंचायत समितीच्या आमणापूर व वसगडे गणातच कॉँग्रेसला यश आले. सत्तेला सुरुंग पंचायत समितीमध्ये आठपैकी चार जागा भाजपने, तर दोन जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. कॉँगे्रसला दोन जागा मिळाल्या. कॉँग्रेसच्या पंचायत समितीतील दहा वर्षाच्या सत्तेला भाजप-राष्ट्रवादीने सुरुंग लावला आहे.