शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
3
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
4
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
5
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
6
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
7
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
8
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
9
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
10
Pankaj Dhir: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
11
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
12
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
13
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
14
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
15
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
16
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
17
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
18
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
19
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
20
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली

काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून सगळ्यांचा पाठिंबा घेणार

By admin | Updated: March 6, 2017 23:55 IST

पृथ्वीराज देशमुख : शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र; जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता येणार

  सांगली : जिल्हा परिषदेत भाजपला सर्वाधिक २५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून अन्य सर्व संघटना व पक्षांना बरोबर घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रच असून ते आमच्याबरोबर असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी, शिवसेना पक्षाला वगळून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यासाठी आमच्याकडे ३४ संख्याबळ असल्याचे जाहीर केले होते. यावरून शिवसेनेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन, जिल्हा परिषदेत सध्या शिवसेनेला धरून अथवा वगळून सत्ता स्थापण्यासंदर्भात आम्ही कोणतेही विधान केले नसताना, भाजप नेत्यांनी शिवसेनेशिवाय सत्तेचा केलेला दावा आश्चर्यकारक आणि व्यथित करणारा असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर देशमुख बोलत होते. ते म्हणाले की, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला आहे. शिवसेना हा भाजपचा नैसर्गिक मित्र आहे. त्यामुळे ते आमच्याबरोबर आहेतच. याशिवाय, रयत विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अपक्षांसह भाजपकडे जिल्हा परिषदेत ३४ सदस्यसंख्या असल्याचे मी सांगितले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आमचे विरोधक आहेत. या दोन पक्षांना जनता कंटाळल्यामुळेच मतदारांनी भाजपला स्वीकारले आहेत. भाजपकडे सर्वाधिक २५ सदस्यसंख्या असल्यामुळे सत्ता आम्हीच स्थापन करणार आहोत. मित्रपक्षही आमच्याबरोबर असणारच आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेत भाजपचे कमळ फुलणार आहे. (प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ‘रयत’चा पाठिंबा रयत विकास आघाडीचे चार जि. प. सदस्य आहेत. यापैकी दोन नानासाहेब महाडिक गटाचे, तर कामेरीची जागा काँग्रेसचे नेते सी. बी. पाटील गटाची असल्याचे बोलले जात आहे. वाळवा गटातील डॉ. सुषमा नायकवडी क्रांती आघाडीच्या आहेत. महाडिक गट १४ रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यानंतरच कुणाला पाठिंबा द्यायचा, हे त्यांचे निश्चित होणार आहे. कामेरी आणि वाळवा गटातील सदस्यांच्या पाठिंब्याचा घोळ कायम असून, योग्यवेळी तो जाहीर करू, असे वैभव नायकवडी यांनी स्पष्ट केले.