शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून सगळ्यांचा पाठिंबा घेणार

By admin | Updated: March 6, 2017 23:55 IST

पृथ्वीराज देशमुख : शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र; जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता येणार

  सांगली : जिल्हा परिषदेत भाजपला सर्वाधिक २५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून अन्य सर्व संघटना व पक्षांना बरोबर घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रच असून ते आमच्याबरोबर असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी, शिवसेना पक्षाला वगळून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यासाठी आमच्याकडे ३४ संख्याबळ असल्याचे जाहीर केले होते. यावरून शिवसेनेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन, जिल्हा परिषदेत सध्या शिवसेनेला धरून अथवा वगळून सत्ता स्थापण्यासंदर्भात आम्ही कोणतेही विधान केले नसताना, भाजप नेत्यांनी शिवसेनेशिवाय सत्तेचा केलेला दावा आश्चर्यकारक आणि व्यथित करणारा असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर देशमुख बोलत होते. ते म्हणाले की, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला आहे. शिवसेना हा भाजपचा नैसर्गिक मित्र आहे. त्यामुळे ते आमच्याबरोबर आहेतच. याशिवाय, रयत विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अपक्षांसह भाजपकडे जिल्हा परिषदेत ३४ सदस्यसंख्या असल्याचे मी सांगितले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आमचे विरोधक आहेत. या दोन पक्षांना जनता कंटाळल्यामुळेच मतदारांनी भाजपला स्वीकारले आहेत. भाजपकडे सर्वाधिक २५ सदस्यसंख्या असल्यामुळे सत्ता आम्हीच स्थापन करणार आहोत. मित्रपक्षही आमच्याबरोबर असणारच आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेत भाजपचे कमळ फुलणार आहे. (प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ‘रयत’चा पाठिंबा रयत विकास आघाडीचे चार जि. प. सदस्य आहेत. यापैकी दोन नानासाहेब महाडिक गटाचे, तर कामेरीची जागा काँग्रेसचे नेते सी. बी. पाटील गटाची असल्याचे बोलले जात आहे. वाळवा गटातील डॉ. सुषमा नायकवडी क्रांती आघाडीच्या आहेत. महाडिक गट १४ रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यानंतरच कुणाला पाठिंबा द्यायचा, हे त्यांचे निश्चित होणार आहे. कामेरी आणि वाळवा गटातील सदस्यांच्या पाठिंब्याचा घोळ कायम असून, योग्यवेळी तो जाहीर करू, असे वैभव नायकवडी यांनी स्पष्ट केले.