शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून सगळ्यांचा पाठिंबा घेणार

By admin | Updated: March 6, 2017 23:55 IST

पृथ्वीराज देशमुख : शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र; जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता येणार

  सांगली : जिल्हा परिषदेत भाजपला सर्वाधिक २५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून अन्य सर्व संघटना व पक्षांना बरोबर घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रच असून ते आमच्याबरोबर असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी, शिवसेना पक्षाला वगळून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यासाठी आमच्याकडे ३४ संख्याबळ असल्याचे जाहीर केले होते. यावरून शिवसेनेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन, जिल्हा परिषदेत सध्या शिवसेनेला धरून अथवा वगळून सत्ता स्थापण्यासंदर्भात आम्ही कोणतेही विधान केले नसताना, भाजप नेत्यांनी शिवसेनेशिवाय सत्तेचा केलेला दावा आश्चर्यकारक आणि व्यथित करणारा असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर देशमुख बोलत होते. ते म्हणाले की, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला आहे. शिवसेना हा भाजपचा नैसर्गिक मित्र आहे. त्यामुळे ते आमच्याबरोबर आहेतच. याशिवाय, रयत विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अपक्षांसह भाजपकडे जिल्हा परिषदेत ३४ सदस्यसंख्या असल्याचे मी सांगितले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आमचे विरोधक आहेत. या दोन पक्षांना जनता कंटाळल्यामुळेच मतदारांनी भाजपला स्वीकारले आहेत. भाजपकडे सर्वाधिक २५ सदस्यसंख्या असल्यामुळे सत्ता आम्हीच स्थापन करणार आहोत. मित्रपक्षही आमच्याबरोबर असणारच आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेत भाजपचे कमळ फुलणार आहे. (प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ‘रयत’चा पाठिंबा रयत विकास आघाडीचे चार जि. प. सदस्य आहेत. यापैकी दोन नानासाहेब महाडिक गटाचे, तर कामेरीची जागा काँग्रेसचे नेते सी. बी. पाटील गटाची असल्याचे बोलले जात आहे. वाळवा गटातील डॉ. सुषमा नायकवडी क्रांती आघाडीच्या आहेत. महाडिक गट १४ रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यानंतरच कुणाला पाठिंबा द्यायचा, हे त्यांचे निश्चित होणार आहे. कामेरी आणि वाळवा गटातील सदस्यांच्या पाठिंब्याचा घोळ कायम असून, योग्यवेळी तो जाहीर करू, असे वैभव नायकवडी यांनी स्पष्ट केले.