शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

कॉँग्रेस-राष्ट्रवादी समर्थकांत हाणामारी

By admin | Updated: April 18, 2016 00:35 IST

म्हैसाळ कालवा फोडल्यावरून वाद : माजी सभापतींच्या पुत्राचे अपहरण करून मारहाणीची तक्रार

मिरज : मिरज पूर्व भागात जानराववाडी व बेळंकी या गावात म्हैसाळचा कालवा फोडल्यावरून कॉँग्रेस व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. बाजार समितीचे माजी सभापती भारत कुंडले यांचा मुलगा प्रवीणकुमार कुंडले याचे अपहरण करून कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. प्रकरण मिटविण्यासाठी दोन्ही गटांच्या बैठका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.जानराववाडी गावातील शेतकऱ्यांनी म्हैसाळच्या पाण्यासाठी पाच लाख रुपये भरले आहेत. दि. ८ एप्रिलला सलगरे कालव्यातून जानराववाडीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, सलगरे व बेळंकी येथील कालवा अडवून पाणी पळवित असल्याने जानराववाडीत पाणी पोहोचत नसल्याची तक्रार आहे. या कारणावरून जानराववाडीतील राष्ट्रवादी समर्थकांनी बेळंकीतील शहाजी गायकवाड यांच्या पुतण्यास जानराववाडीचे पाणी न अडविण्याबाबत शिवीगाळ, दमदाटी केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर शनिवारी सलगरे व जानराववाडी दरम्यान म्हैसाळचा कालवा फोडून पाणी वळविण्याचा प्रकार घडला. त्यानंतर प्रवीणकुमार कुंडले यास कॉँग्रेस समर्थकांनी उचलून बेळंकीत नेऊन मारहाण केल्याची तक्रार आहे. याबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजू मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले. याप्रकरणी भारत कुंडले यांनी शहाजी गायकवाड व त्यांच्या आठ ते दहा साथीदारांनी मुलगा प्रवीणकुमार कुंडले याचे अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार केली आहे. बेळंकीतील कॉँग्रेस नेते वसंत गायकवाड यांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटविण्यासाठी दोन्ही गटाच्या बैठका सुरू होत्या. (वार्ताहर)वाद मिटल्यानंतर पुन्हा मारामारीपाचव्या टप्प्यातील सलगरे शाखा कालव्यातून सलगरे, जानराववाडी, खटाव परिसरात पाणी सोडले आहे. मात्र, शुक्रवारी रात्री अज्ञातांनी सलगरे ते जानराववाडी दरम्यान कालवा फोडून पाणी वळविले. यामुळे जानराववाडीतील शेतकरी आक्रमक झाले. खंडेराव जगताप, वसंत गायकवाड, भारत कुंडले, रावसाहेब बेडगे यांनी मध्यस्थी करून सलगरे, खटाव व जानराववाडीस प्रत्येकी दोन दिवस पाणी देण्याचा तोडगा काढला होता. परंतु पाण्याचा वाद मिटल्यानंतर मारामारीचा प्रकार घडल्याची माहिती मिळाली.