शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरच्या काँग्रेस नेत्यांना आली जाग

By admin | Updated: June 21, 2016 01:21 IST

शनिवारी बैठक : आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी; गटबाजी संपणार का?

अशोक पाटील --इस्लामपूर --आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर मतदारसंघातील नेत्यांना जाग आली आहे. जिल्ह्यातील नेत्यांनी निवडणुका स्वबळावर लढविण्याची भाषा सुरू केल्यानंतर येथील काँग्रेस नेते खडबडून जागे झाले आहेत. साखराळे येथील वाड्यात बसून तालुक्याची काँग्रेस चालविणारे बाळासाहेब पाटील यांनी बैठकीचे फर्मान काढले आहे. ही बैठक शनिवारी, २५ रोजी इस्लामपूर येथे होत आहे.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी वर्षानुवर्षे अध्यक्षपद स्वत:कडेच ठेवले आहे. त्यांनी तालुक्यातील काँग्रेसची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला, परंतु अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना यश आले नाही. बोरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील जितेंद्र पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसची ताकद दाखवून दिली आहे. त्यांनी आता स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी, तालुक्यात काम करताना काँग्रेस आणि कृष्णा कारखान्यावर संचालकपद भूषविताना भोसले गटाच्या नेतृत्वाखाली भाजपशी संधान साधले आहे.इस्लामपूर शहरात वैभव पवार आणि विजय पवार हे दोन बंधू काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. वैभव पवार काँग्रेसमध्ये असले तरी, त्यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे, तर विजय पवार यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे. परंतु काँग्रेसमध्ये एकी नसल्याने काँग्रेसच्या विरोधाला राष्ट्रवादी जुमानत नाही.वाळवा तालुक्यातील काँग्रेसमध्ये पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक यांच्या नावाचा दबदबा होता. परंत पाच वर्षांपासून महाडिक यांनी काँग्रेसशी काडीमोड घेऊन जिल्हा परिषद निवडणुकीत शिवाजीराव नाईक यांच्या विकास आघाडीचा आधार घेतला होता. आता त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी मिळतेजुळते घेतले आहे. सध्या तालुक्यातील काही काँग्रेस नेते त्यांच्या संपर्कात आहेत. महाडिक यांचे कट्टर समर्थक व वाळव्याचे नजीर वलांडकर यांच्यावर महाडिक गटाचा शिक्का असला तरी, सध्या ते युवा नेते, सरपंच गौरव नायकवडी यांच्यासमवेत आहेत.कामेरीचे सी. बी. पाटील, त्यांचे सुपुत्र जयराज पाटीले आमदार शिवाजीराव नाईक यांचे नेतृत्व मानणारे होते. परंतु आ. नाईक यांनी विकास आघाडीनंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून पाटील पित्रा-पुत्र त्यांच्यापासून दुरावले आहेत. त्यांनी आता माजी मंत्री, आमदार पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख यांचे नेतृत्व मान्य करुन काँग्रेसमध्ये काम सुरू ठेवले आहे.तालुक्यातील अनेक चेहरे काँग्रेसमध्ये आहेत. परंतु त्यांच्याकडून कोणतेही उठावदार कार्य दिसून आलेले नाही. त्यांचा पक्षालाही काहीही फायदा झालेला नाही. असे चेहरे काय कामाचे, असाही सवाल उपस्थित होतो. आता अशा सर्वांची बैठक शनिवार, दि. २५ रोजी वाळवा तालुका काँग्रेस कमिटीत होणार असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. या बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, सत्यजित देशमुख, श्रीमती शैलजा पाटील, पृथ्वीराज पाटील मार्गदर्शन करणार आहेत. यांच्या मार्गदर्शनाचा तालुक्यातील कोमात गेलेल्या काँग्रेसला कितपत फायदा होणार, हे लवकरच दिसून येणार आहे.युवकांच्या प्रश्नांकडे : युवा नेत्यांचे दुर्लक्षकाँग्रेस पक्षामध्ये युवा नेत्यांची मोठी फौज आहे. प्रत्येकाकडे काही संस्थांची पदेही आहेत. परंतु, या युवा नेत्यांचे सूर जुळत नाहीत. यामुळे महाविद्यालयीन युवक, युवा नोकरदारांवर झालेल्या अन्यायाच्या प्रश्नावर काँग्रेसची युवा फौज रस्त्यावर उतरताना दिसत नाही. युवा नेत्यांना युवकांचे प्रश्न कधी कळणार, असा सवालही युवकांमधूनच उपस्थित होत आहे.शेतकऱ्यांसमोर वीज प्रश्न, उपसा बंदी आदीचे प्रश्न आहेत. महागाईची समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. तरीही या प्रश्नावर केंद्रात आणि महाराष्ट्रात विरोधात असतानाही काँग्रेसच्या युवा नेत्यांनी आंदोलनाचा आवाज उठविला नाही.