शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

कॉँगे्रसचे घर तरी दुरुस्त करायलाच हवे

By admin | Updated: December 3, 2015 00:49 IST

पतंगराव कदम : जिल्ह्यात पक्षाला पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करणार

सांगली : राज्य पातळीवर राष्ट्रवादी या मित्रपक्षासोबत काम करण्याचा विचार आता सुरू झाला आहे. त्या निर्णयावर जिल्ह्यातील वाटचालही अवलंबून आहे. आघाडी झाली तर ठीक, नाही तर कॉँग्रेसचे घर तरी दुरुस्त करावेच लागेल, असे मत माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, हा जिल्हा वसंतदादा व राजारामबापूंचा आहे. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या काळात हा जिल्हा एकसंध ठेवला होता. पुन्हा तशीच ताकद या जिल्ह्यात निर्माण करायची आहे. वरिष्ठ पातळीवर आता विरोधक म्हणून काम करताना राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. निर्णय झालाच तर, त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातही केली जाईल. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याशी यासंदर्भात चर्चासुद्धा झाली आहे. स्वतंत्रपणे काम करायचा निर्णय झाला तर, जिल्ह्यात कॉँग्रेसचे संघटन पुन्हा पूर्वीसारखे करण्यासाठी प्रयत्न केले जातील. निवडणुकांपूर्वी पक्षाचे जिल्ह्यातील घर तरी दुरुस्त करावेच लागेल. जिल्ह्यात आगामी काळात तासगाव, आष्टा, इस्लामपूर आणि विटा या नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. मित्रपक्षासोबत जाण्याचा निर्णय झाला तर, तशापद्धतीने निवडणुका लढविल्या जातील, अन्यथा स्वतंत्रपणे आम्ही या निवडणुका लढू. जिल्ह्यापासून राष्ट्रापर्यंत सर्वत्र पक्षाचे एकच सूत्र असले पाहिजे. मित्रपक्षासोबत काम केल्यास जोमाने संघटन वाढविता येईल. हिवाळी अधिवेशनानंतर महापालिकेतील कॉँग्रेस नगरसेवकांची बैठक घेतली जाईल. त्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. दुष्काळी प्रश्नाबाबत ते म्हणाले की, राज्यातून दुष्काळप्रश्नी एकही आदेश अद्याप जिल्हापातळीवर आला नाही. शासनाकडे कोणताही अ‍ॅक्शन प्लॅन नाही. सर्वप्रकारचे बजेट बाजूला करून दुष्काळग्रस्तांना मदत करणे आवश्यक आहे. सांडगेवाडी, पलूस येथील औद्योगिक वसाहतीत फळप्रक्रिया आणि उत्पादनाला चालना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)