शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

कॉँगे्रसचे घर तरी दुरुस्त करायलाच हवे

By admin | Updated: December 3, 2015 00:49 IST

पतंगराव कदम : जिल्ह्यात पक्षाला पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करणार

सांगली : राज्य पातळीवर राष्ट्रवादी या मित्रपक्षासोबत काम करण्याचा विचार आता सुरू झाला आहे. त्या निर्णयावर जिल्ह्यातील वाटचालही अवलंबून आहे. आघाडी झाली तर ठीक, नाही तर कॉँग्रेसचे घर तरी दुरुस्त करावेच लागेल, असे मत माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, हा जिल्हा वसंतदादा व राजारामबापूंचा आहे. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या काळात हा जिल्हा एकसंध ठेवला होता. पुन्हा तशीच ताकद या जिल्ह्यात निर्माण करायची आहे. वरिष्ठ पातळीवर आता विरोधक म्हणून काम करताना राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. निर्णय झालाच तर, त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातही केली जाईल. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याशी यासंदर्भात चर्चासुद्धा झाली आहे. स्वतंत्रपणे काम करायचा निर्णय झाला तर, जिल्ह्यात कॉँग्रेसचे संघटन पुन्हा पूर्वीसारखे करण्यासाठी प्रयत्न केले जातील. निवडणुकांपूर्वी पक्षाचे जिल्ह्यातील घर तरी दुरुस्त करावेच लागेल. जिल्ह्यात आगामी काळात तासगाव, आष्टा, इस्लामपूर आणि विटा या नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. मित्रपक्षासोबत जाण्याचा निर्णय झाला तर, तशापद्धतीने निवडणुका लढविल्या जातील, अन्यथा स्वतंत्रपणे आम्ही या निवडणुका लढू. जिल्ह्यापासून राष्ट्रापर्यंत सर्वत्र पक्षाचे एकच सूत्र असले पाहिजे. मित्रपक्षासोबत काम केल्यास जोमाने संघटन वाढविता येईल. हिवाळी अधिवेशनानंतर महापालिकेतील कॉँग्रेस नगरसेवकांची बैठक घेतली जाईल. त्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. दुष्काळी प्रश्नाबाबत ते म्हणाले की, राज्यातून दुष्काळप्रश्नी एकही आदेश अद्याप जिल्हापातळीवर आला नाही. शासनाकडे कोणताही अ‍ॅक्शन प्लॅन नाही. सर्वप्रकारचे बजेट बाजूला करून दुष्काळग्रस्तांना मदत करणे आवश्यक आहे. सांडगेवाडी, पलूस येथील औद्योगिक वसाहतीत फळप्रक्रिया आणि उत्पादनाला चालना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)