शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

गटा-तटामुळे काँग्रेसला उतरती कळा

By admin | Updated: March 2, 2017 23:51 IST

पलूसमध्येच अपयश : पतंगराव कदम यांचा बालेकिल्ला; राजकीय चर्चेला उधाण

सुनील तुपे ल्ल किर्लोस्करवाडी :पलूस तालुक्यात भाजपचे कमळ प्रथमच फुलले आहे. जिल्हा परिषदेच्या तीन व पंचायत समितीच्या चार जागा मिळवत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पलूस पंचायत समितीवर भाजपची सत्ता आणली आहे. हा निकाल काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम, डॉ. विश्वजित कदम यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.वीस वर्षे मंत्री असणाऱ्या डॉ. कदम यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी मतदार संघात काम करत आहे. भारती उद्योग समूहाचा सेवकवर्ग काम करत होता. तरीही काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलले आहे. डॉ. कदम यांनी पलूस तालुक्याला कोणत्याच पध्दतीचा निधी कमी पडू दिला नाही. गावा-गावात विकास कामांचा डोंगर उभा केला. मात्र मतदारांनी काँग्रेसला नाकारले, याचे मोठे कारण म्हणजे तालुक्यात असणारे गटा-तटाचे राजकारण. तालुक्यात प्रत्येक गावात कदम यांचे दोन किंवा तीन गट आहेत. प्रत्येक गट स्वत:ला मोठा समजतो. एकमेकाची जिरविण्याच्या नादात काँग्रेसला सर्व जागा घालवाव्या लागल्या आहेत. याउलट भाजपच्या सर्व कार्यक र्त्यांनी एकसंध होऊन काम केले. भाजपने युवक वर्गाला मोहात पाडून युवकवर्ग भाजपकडे आकर्षित केला. नेहमी पाठीशी असणाऱ्या पलूस तालुक्यातील मतदारांना काँग्रेसने गृहित धरले, त्याचा परिणाम भोगावा लागला. मतदार जागरूक झाला आहे, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. गावा-गावातील काँग्रेस नेत्यांची गटबाजी संपुष्टात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील मतदारांनी पंचायत समितीची किल्ली भाजपकडे सोपवली. गटा-तटाच्या राजकारणात काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षापासून दुरावले. नोटाबंदीचा कोणताही परिणाम पलूस तालुक्यात जाणवला नसून पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाने जि. प.च्या तीन व पंचायत समितीच्या चार जागांवर मजल मारली. काँग्रेसकडून पंचायत समितीच्या सत्ताकाळात गावपातळीवर काम केले गेले नाही. नागरिकांसाठी कोणताही ठोस कार्यक्रम आखला गेला नाही. तरूणांसाठी उपक्रम राबविला गेला नाही. नीटपणे शासकीय योजना आणल्या गेल्या नाहीत. नागरिकांच्या कामाचा निपटारासुध्दा झाला नाही. याकडे दुर्लक्ष केल्याने काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे.