शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

घड्याळाच्या मदतीला काँग्रेसचा हात!

By admin | Updated: February 28, 2017 00:49 IST

जिल्हा परिषदेचे सत्ताकारण : मोहनराव कदम यांचा प्रस्ताव; राष्ट्रवादीने पुढाकार घेण्याचे आवाहन

सांगली : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रवादीला मदतीचा हात देण्याचे सोमवारी स्पष्ट केले. यामुळे सत्तेसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या नेत्यांनीही सावध पवित्रा घेत रयत विकास आघाडी, शिवसेना, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाशी बोलणी सुरू ठेवली आहेत.जिल्हा परिषदेत सर्वाधिक मोठा पक्ष भाजप असून त्यांच्याकडे २५ सदस्य आहेत. राष्ट्रवादी १४, काँग्रेस १०, रयत विकास आघाडी चार, शिवसेना तीन, माजी मंत्री अजितराव घोरपडे गट दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. बहुमत सिध्द करण्यासाठी ३१ सदस्य संख्येची गरज आहे. भाजपला इतरांची मदत घेतल्याशिवाय बहुमत सिध्द करता येणार नाही, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही सत्तेसाठी शिवसेना, रयत विकास आघाडी, अजितराव घोरपडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यात पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम म्हणाले की, जिल्हा परिषदेत भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाची सदस्यसंख्या राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी सत्ता स्थापण्यासाठी प्रयत्न करावेत. मी आणि माझा पक्ष त्यांना सत्ता मिळवून देण्यासाठी मदत करू. अजितराव घोरपडे, रयत विकास आघाडी, शिवसेना यांच्याशी चर्चा केल्यास ते निश्चित आमच्याबरोबर येतील. जिल्ह्याच्या विकासासाठी या आघाडीचीच गरज आहे. मोहनराव कदम यांनी मदतीचा हात पुढे केला आहे, परंतु या प्रस्तावाचा जयंत पाटील किती गांभीर्याने विचार करतात, यावर सारे अवलंबून आहे. जयंत पाटील यांनी निवडणुकीत काँग्रेसकडे आघाडीचा प्रस्ताव दिला होता, पण तो मोहनराव कदम यांनी फेटाळला होता. यावरूनही पाटील आणि कदम यांच्यामध्ये दरी निर्माण झाली होती. शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे मोहनराव कदम आणि जयंत पाटील यांच्याशी चांगले संबंध आहेत. कदम हे बाबर यांच्याशी रोजच दूरध्वनीवरून संपर्क करून राजकीय घडामोडीची चर्चा करतात. कदम यांच्याबरोबरच भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचाही बाबर यांच्याशी चांगला संपर्क आहे. त्यामुळे बाबर घड्याळ आणि हाताला जवळ आणण्यासाठी प्रयत्न करणार, की भाजपला पाठिंबा देऊन देशमुखांची मैत्री संभाळणार, हे येत्या आठ दिवसात निश्चित होणार आहे. दि. २१ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड होणार असल्यामुळे सध्या सर्वच पक्षांची चर्चा संथगतीने चालू आहेत. (प्रतिनिधी)अद्याप कोणाशीही चर्चा नाही : बाबरजिल्हा परिषदेत त्रिशंकू परिस्थिती असून, यामध्ये कोणालाही बहुमत नाही. सत्ता स्थापन करण्याचा पेच निर्माण झाला आहे, पण याबाबत माझ्याशी आतापर्यंत कोणत्याही पक्षाने चर्चा केलेली नाही. ज्यावेळी प्रस्ताव येईल, त्यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केले. बहुमत नसल्यामुळे कुठल्याही पक्षाला ‘ब्लॅकमेल’ करणार नाही, असेही बाबर यांनी स्पष्ट केले.रयत आघाडीची दोन दिवसांत बैठक : शेट्टीजिल्हा परिषदेत रयत विकास आघाडीचे चार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक असे आमचे पाच सदस्य आहेत. या सदस्यांसह मंत्री सदाभाऊ खोत व रयत विकास आघाडीच्या अन्य नेत्यांची येत्या दोन दिवसात बैठक घेऊन, कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय घेऊ. सदाभाऊ खोत आमच्या बरोबरच आहेत, असे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.