शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

घड्याळाच्या मदतीला काँग्रेसचा हात!

By admin | Updated: February 28, 2017 00:49 IST

जिल्हा परिषदेचे सत्ताकारण : मोहनराव कदम यांचा प्रस्ताव; राष्ट्रवादीने पुढाकार घेण्याचे आवाहन

सांगली : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रवादीला मदतीचा हात देण्याचे सोमवारी स्पष्ट केले. यामुळे सत्तेसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या नेत्यांनीही सावध पवित्रा घेत रयत विकास आघाडी, शिवसेना, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाशी बोलणी सुरू ठेवली आहेत.जिल्हा परिषदेत सर्वाधिक मोठा पक्ष भाजप असून त्यांच्याकडे २५ सदस्य आहेत. राष्ट्रवादी १४, काँग्रेस १०, रयत विकास आघाडी चार, शिवसेना तीन, माजी मंत्री अजितराव घोरपडे गट दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. बहुमत सिध्द करण्यासाठी ३१ सदस्य संख्येची गरज आहे. भाजपला इतरांची मदत घेतल्याशिवाय बहुमत सिध्द करता येणार नाही, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही सत्तेसाठी शिवसेना, रयत विकास आघाडी, अजितराव घोरपडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यात पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम म्हणाले की, जिल्हा परिषदेत भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाची सदस्यसंख्या राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी सत्ता स्थापण्यासाठी प्रयत्न करावेत. मी आणि माझा पक्ष त्यांना सत्ता मिळवून देण्यासाठी मदत करू. अजितराव घोरपडे, रयत विकास आघाडी, शिवसेना यांच्याशी चर्चा केल्यास ते निश्चित आमच्याबरोबर येतील. जिल्ह्याच्या विकासासाठी या आघाडीचीच गरज आहे. मोहनराव कदम यांनी मदतीचा हात पुढे केला आहे, परंतु या प्रस्तावाचा जयंत पाटील किती गांभीर्याने विचार करतात, यावर सारे अवलंबून आहे. जयंत पाटील यांनी निवडणुकीत काँग्रेसकडे आघाडीचा प्रस्ताव दिला होता, पण तो मोहनराव कदम यांनी फेटाळला होता. यावरूनही पाटील आणि कदम यांच्यामध्ये दरी निर्माण झाली होती. शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे मोहनराव कदम आणि जयंत पाटील यांच्याशी चांगले संबंध आहेत. कदम हे बाबर यांच्याशी रोजच दूरध्वनीवरून संपर्क करून राजकीय घडामोडीची चर्चा करतात. कदम यांच्याबरोबरच भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचाही बाबर यांच्याशी चांगला संपर्क आहे. त्यामुळे बाबर घड्याळ आणि हाताला जवळ आणण्यासाठी प्रयत्न करणार, की भाजपला पाठिंबा देऊन देशमुखांची मैत्री संभाळणार, हे येत्या आठ दिवसात निश्चित होणार आहे. दि. २१ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड होणार असल्यामुळे सध्या सर्वच पक्षांची चर्चा संथगतीने चालू आहेत. (प्रतिनिधी)अद्याप कोणाशीही चर्चा नाही : बाबरजिल्हा परिषदेत त्रिशंकू परिस्थिती असून, यामध्ये कोणालाही बहुमत नाही. सत्ता स्थापन करण्याचा पेच निर्माण झाला आहे, पण याबाबत माझ्याशी आतापर्यंत कोणत्याही पक्षाने चर्चा केलेली नाही. ज्यावेळी प्रस्ताव येईल, त्यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केले. बहुमत नसल्यामुळे कुठल्याही पक्षाला ‘ब्लॅकमेल’ करणार नाही, असेही बाबर यांनी स्पष्ट केले.रयत आघाडीची दोन दिवसांत बैठक : शेट्टीजिल्हा परिषदेत रयत विकास आघाडीचे चार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक असे आमचे पाच सदस्य आहेत. या सदस्यांसह मंत्री सदाभाऊ खोत व रयत विकास आघाडीच्या अन्य नेत्यांची येत्या दोन दिवसात बैठक घेऊन, कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय घेऊ. सदाभाऊ खोत आमच्या बरोबरच आहेत, असे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.