शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मिरज तालुक्यात काँग्रेसला भाजपचे कडवे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मिरज पूर्व भागात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मोठे यश मिळविणाºया भाजप विरूध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरूध्द काँग्रेस व स्वाभिमानी आघाडी अशी लढत होणार आहे. मतदार सरपंचांची थेट निवड करणार असल्याने अनेक ...

ठळक मुद्दे राजकीय मोर्चेबांधणी सुरू : ३८ ग्रामपंचायतींसाठी आॅक्टोबरमध्ये निवडणूकसरपंच पदासाठी चाचपणी सुरू झाली आहे. भाजपचा सामना करण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मिरज पूर्व भागात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मोठे यश मिळविणाºया भाजप विरूध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरूध्द काँग्रेस व स्वाभिमानी आघाडी अशी लढत होणार आहे. मतदार सरपंचांची थेट निवड करणार असल्याने अनेक गावांतील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने निवडणूक आचारसंहिता जाहीर झाली आहे. मिरज पूर्व भागातील बेडग, गुंडेवाडी, बोलवाड, खटाव, कदमवाडी, खंडेराजुरी, बेळंकी, सावळी, टाकळी, सलगरे, वड्डी, संतोषवाडी, पाटगाव, सिध्देवाडी, पायापाचीवाडी, सोनी, करोली-एम, मिरज पश्चिम भागातील दुधगाव, हरिपूर, जानराववाडी, कसबे डिग्रज, कनडवाडी, खरकटवाडी, काकडवाडी, बुधगाव, बिसूर, माधवनगर, मौजे डिग्रज, माळवाडी, मानमोडी, नरवाड, नांद्रे, सावळवाडी, समडोळी, पद्माळे, रसूलवाडी, सांबरवाडी, बामणोली या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी यापूर्वीच विविध राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

मिरज पूर्व भागात काँग्रेसच्या मदन पाटील गटाचे वर्चस्व होते. मात्र पूर्व भागात पंचायत समितीच्या दहा व जिल्हा परिषदेच्या चार जागा जिंकून भाजपने येथे वर्चस्व निर्माण केले आहे. काँग्रेस व राष्टÑवादीच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी खा. संजय पाटील व आ. सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केल्याने, पूर्व भागातील काही ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आहे. यावेळी ग्रामपंचायतीसाठी भाजप विरूध्द काँग्रेस अशी लढत होणार आहे. काही गावात अस्तित्व असलेली अजितराव घोरपडे यांची विकास आघाडी कोणाला साथ देणार, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.मदन पाटील यांच्या पश्चात काँग्रेस गट नेतृत्वहीन झाला आहे. काँग्रेसच्या विशाल पाटील गटाचे घोरपडे यांच्या विकास आघाडीशी सख्य आहे. अशा परिस्थितीत भाजपचा सामना करण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.राष्टÑवादीचे वर्चस्वमिरज पश्चिम भागात राष्टÑवादीचे वर्चस्व आहे. येथे काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येऊन राष्टÑवादीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस राष्टÑवादीच्या तुलनेत भाजपची ताकद अपुरी आहे. सरपंचांची थेट मतदारातून निवड होणार असल्याने, अनेक गावांतील समीकरणे बदलली आहेत. सरपंच पदासाठी चाचपणी सुरू झाली आहे.