शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची वाताहत

By admin | Updated: January 23, 2016 01:14 IST

वाळवा-शिराळ्यातील चित्र : खमक्या नेतृत्वाची पक्षाला आवश्यकता

अशोक पाटील -- इस्लामपूर वाळवा-शिराळा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. शिराळ्यात माजी सभापती शिवाजीराव देशमुख, सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस जिवंत ठेवली आहे, तर वाळवा तालुक्यात सत्तेसाठी काँग्रेस, अन्यथा आम्ही त्या पक्षाचेच नाही, असा पवित्रा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची वाताहत होत चालली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. मात्र आगामी निवडणुका आघाडी करून लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा प्रत्ययही नुकत्याच कोल्हापुरात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीवेळी आला.शिराळा मतदारसंघात माजी सभापती शिवाजीराव देशमुख, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक एकत्र असताना राष्ट्रवादीची डाळ शिजली नाही. परंतु यांच्यामध्ये फूट पडल्याने २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत मानसिंगराव नाईक आमदार झाले, तर नंतरच्या निवडणुकीत भाजपमध्ये गेलेले शिवाजीराव नाईक आमदार झाले. यामुळे दहा वर्षापासून शिराळ्यात काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. आता सत्यजित देशमुख यांनी मानसिंगराव नाईक यांच्याशी मिळते-जुळते घेतले आहे.वाळवा तालुक्यात काँग्रेसचे नेतृत्व करणारे नानासाहेब महाडिक यांची भूमिका नेहमीच संदिग्ध राहिली आहे. त्यामुळे काही काँग्रेस नेते त्यांच्यापासून लांब राहणे पसंत करतात. तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्याकडून पक्षवाढीसाठी निर्णय घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते दुरावले आहेत. बोरगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य व कृष्णा कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील यांनी परिसरापुरती काँग्रेस जिवंत ठेवली आहे. परंतु ही ताकद तालुक्यात चालत नाही. दादासाहेब पाटील, प्रतापराव मोरे, आर. आर. पाटील, नजीर वलांडकर, जयकर कदम नावालाच पक्षात आहेत.इस्लामपूरचे माजी नगरसेवक वैभव पवार, त्यांचे बंधू विजय पवार काँग्रेसमध्ये असले तरी, अस्तित्व टिकवण्यासाठी ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याशी संधान साधून आहेत. कामेरीचे सी. बी. पाटील शांत असून, त्यांचे चिरंजीव जयराज पाटील युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, सत्यजित देशमुख यांचे नेतृत्व मानून युवा काँग्रेसची धुरा सांभाळत आहेत.वाळवा तालुक्यात काँग्रेस पक्ष एक असला तरी, नेते मात्र अनेक झाले आहेत. त्यामुळे पक्षाची वाताहत होत चालली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन वाळवा तालुक्यातील काँग्रेसमध्ये पडलेले गट एकत्रित करण्याचा प्रयत्न करू. कार्यकारिणी बदलाबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. आगामी काळात युवकांना संधी देऊ.- बाळासाहेब पाटील, वाळवा तालुकाध्यक्ष, काँग्रेस.