शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची वाताहत

By admin | Updated: January 23, 2016 01:14 IST

वाळवा-शिराळ्यातील चित्र : खमक्या नेतृत्वाची पक्षाला आवश्यकता

अशोक पाटील -- इस्लामपूर वाळवा-शिराळा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. शिराळ्यात माजी सभापती शिवाजीराव देशमुख, सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस जिवंत ठेवली आहे, तर वाळवा तालुक्यात सत्तेसाठी काँग्रेस, अन्यथा आम्ही त्या पक्षाचेच नाही, असा पवित्रा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची वाताहत होत चालली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. मात्र आगामी निवडणुका आघाडी करून लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा प्रत्ययही नुकत्याच कोल्हापुरात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीवेळी आला.शिराळा मतदारसंघात माजी सभापती शिवाजीराव देशमुख, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक एकत्र असताना राष्ट्रवादीची डाळ शिजली नाही. परंतु यांच्यामध्ये फूट पडल्याने २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत मानसिंगराव नाईक आमदार झाले, तर नंतरच्या निवडणुकीत भाजपमध्ये गेलेले शिवाजीराव नाईक आमदार झाले. यामुळे दहा वर्षापासून शिराळ्यात काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. आता सत्यजित देशमुख यांनी मानसिंगराव नाईक यांच्याशी मिळते-जुळते घेतले आहे.वाळवा तालुक्यात काँग्रेसचे नेतृत्व करणारे नानासाहेब महाडिक यांची भूमिका नेहमीच संदिग्ध राहिली आहे. त्यामुळे काही काँग्रेस नेते त्यांच्यापासून लांब राहणे पसंत करतात. तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्याकडून पक्षवाढीसाठी निर्णय घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते दुरावले आहेत. बोरगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य व कृष्णा कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील यांनी परिसरापुरती काँग्रेस जिवंत ठेवली आहे. परंतु ही ताकद तालुक्यात चालत नाही. दादासाहेब पाटील, प्रतापराव मोरे, आर. आर. पाटील, नजीर वलांडकर, जयकर कदम नावालाच पक्षात आहेत.इस्लामपूरचे माजी नगरसेवक वैभव पवार, त्यांचे बंधू विजय पवार काँग्रेसमध्ये असले तरी, अस्तित्व टिकवण्यासाठी ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याशी संधान साधून आहेत. कामेरीचे सी. बी. पाटील शांत असून, त्यांचे चिरंजीव जयराज पाटील युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, सत्यजित देशमुख यांचे नेतृत्व मानून युवा काँग्रेसची धुरा सांभाळत आहेत.वाळवा तालुक्यात काँग्रेस पक्ष एक असला तरी, नेते मात्र अनेक झाले आहेत. त्यामुळे पक्षाची वाताहत होत चालली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन वाळवा तालुक्यातील काँग्रेसमध्ये पडलेले गट एकत्रित करण्याचा प्रयत्न करू. कार्यकारिणी बदलाबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. आगामी काळात युवकांना संधी देऊ.- बाळासाहेब पाटील, वाळवा तालुकाध्यक्ष, काँग्रेस.