शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

काँग्रेस-भाजपमध्ये रयत आघाडीसाठी रस्सीखेच

By admin | Updated: March 1, 2017 23:43 IST

काँग्रेसकडूनही आॅफर; पतंगराव कदम-नानासाहेब महाडिक यांच्यात चर्चा

सांगली : रयत विकास आघाडीच्या चार जागा पदरात पाडून सांगली जिल्हा परिषदेत सत्तेच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच स्पर्धा रंगली आहे. भाजपच्या नेत्यांनी मंगळवारी महाडिक गटाला गळ घातल्यानंतर, बुधवारी काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यांना आॅफर दिली. पतंगराव कदम आणि आघाडीचे नेते नानासाहेब महाडिक यांच्यात पेठ येथे प्रदीर्घ चर्चा झाली. सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या खुर्चीचा खेळ चांगलाच रंगला आहे. मंगळवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आ. अमल महाडिक यांच्या माध्यमातून महाडिक गटाला आणि पर्यायाने रयत विकास आघाडीला गळ टाकला होता. रयत विकास आघाडी गळाला लागण्याची आशा भाजपच्या मनात फुलली असतानाच, बुधवारी काँग्रेसने रयत विकास आघाडीला सत्तेसाठी आॅफर दिली. काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी रयत आघाडीचे नेते नानासाहेब महाडिक यांची पेठ येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी काँग्रेससोबत सत्तेत सहभागी होण्याची आॅफर दिली. भाजपच्या नादी न लागता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आल्यास आघाडीला फायदा होऊ शकतो, असे कदम यांनी सांगितले. या बैठकीत सत्तेतील पदांबाबतही चर्चा झाल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत झालेल्या प्रदीर्घ चर्चेतून निर्णय झाला नाही. महाडिक यांनी अन्य नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. पतंगराव कदम यांच्यापाठोपाठ सत्यजित देशमुख यांनीही महाडिक गटातील नेत्यांशी चर्चा केली. सत्तेत रयत विकास आघाडीचा योग्य सन्मान राखला जाईल, असे आश्वासनही काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडीशी चर्चा केल्याचे समजताच, भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनीही राहुल महाडिक यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही, काँग्रेसच्या भूलथापांना आघाडी नेत्यांनी बळी पडू नये, असे आवाहन केले. बुधवारी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये रयत आघाडीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. अर्थात यात अद्याप यश कोणाच्याही पदरात पडलेले नाही. त्यामुळे संघर्षाची ही कहाणी आता राज्यस्तरावरील नेत्यांपर्यंत रंगली आहे.कॉंग्रेसने यापूर्वी राष्ट्रवादीलाही आघाडीसाठी तयार केले आहे. दोन्ही कॉंग्रेसने एकत्र येण्याचे निश्चित केल्यानंतर रयत विकास आघाडीवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. रयत आघाडीला खेचल्यानंतर त्यांचे काम आणखी सोपे होणार आहे. त्यामुळेच पतंगरावांनी पेठ येथे बुधवारी चर्चेसाठी तळ ठोकला होता. (प्रतिनिधी)महाडिक गट परतला...महाडिक गट मंगळवारी मुंबईत दाखल झाला होता. बुधवारी त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे राहुल महाडिक, अमल महाडिक यांच्यासह अन्य कार्यकर्ते बुधवारी सायंकाळी जिल्ह्यात परतले. फडणवीस व महाडिक यांची पुन्हा भेट घालून देण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करीत आहेत. भाजपच्या जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी आघाडीच्या हालचालींवर नजर ठेवली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तेसाठी छुप्या खेळ्या सुरू झाल्याने भाजपचे नेतेही सतर्क झाले आहेत.