शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा सांगलीत हल्लाबोल

By admin | Updated: July 9, 2015 23:34 IST

मोर्चा, सभांमधून शासनाचा निषेध : तालुकानिहाय जनजागृतीचा निर्धार

सांगली : शासनाच्या अनेक धोरणांचा निषेध करीत कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी सांगलीत मोर्चा काढला. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत कॉँग्रेस नेत्यांनी शासनाच्या निर्णयांवर हल्लाबोल केला. सरकारविरोधात तालुकानिहाय जनजागृती करण्याचा निर्धार यावेळी सभेत करण्यात आला. माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. कॉँग्रेस भवनपासून दुपारी साडेबारा वाजता मोर्चास सुरुवात झाली. आझाद चौक, स्टेशन चौक, राजवाडा चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आला. याठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख म्हणाले की, या सरकारला वेळीच रोखले नाही, तर महाराष्ट्रातील शेतकरी व कष्टकरी संकटात सापडतील. त्यामुळे आपल्या शेतकरी व कष्टकरी बांधवांना कॉँग्रेसनेच आधार दिला पाहिजे. जातीच्या नावावर केलेल्या विषारी प्रचाराला सध्याची तरुणाई भुलली होती. त्यांनी याच प्रचाराला बळी पडून भाजपला मतदान केले होते. आता या तरुणाईलाही सत्य पटवून देऊन पुन्हा कॉँग्रेसकडे घेतले पाहिजे. अनेकांचा रस्ता चुकला आहे. त्यांना योग्य मार्गावर आणण्याचे काम कॉँग्रेसने करावे. पतंगराव कदम म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी राज्यात आणि देशात नरेंद्र मोदी यांची हवा होती. त्यांच्याच निर्णयामुळे आता त्यांची गोची झालेली आहे. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कॉँग्रेसने बाजी मारल्यामुळे राज्यातच नव्हे, तर आता देशातच कॉँग्रेसची हवा सुरू झालेली आहे. राज्यात सर्वत्र भाजपच्या घोटाळ्यांची चर्चा सुरू आहे. बोगस डिग्रीवाले शिक्षणमंत्री, व्यापमं घोटाळा अशा अनेक गोष्टींमुळे ही सरकारे कशापद्धतीने काम करताहेत, हे दिसत आहे. आता सुरुवात झाली आहे, अजून अनंत गोष्टी बाहेर येणार आहेत. हे सरकार दिशाहीन झाल्याने नागरिकांच्या पदरी काहीही पडलेले नाही. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील, सत्यजित देशमुख, किशोर जामदार, माजी आमदार हाफिज धत्तुरे, आनंदराव मोहिते, नामदेवराव मोहिते, मालन मोहिते यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)भाजपचे खोटे आंदोलन!यावेळी प्रतीक पाटील म्हणाले की, जतच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना, भाजपच्या नेत्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. खोट्या आंदोलनाने कोणतेही प्रश्न कधी सुटत नाहीत. त्यामुळे अशा नेत्यांवर कितपत विश्वास ठेवायचा, याचा विचार जतच्या लोकांनीच आता केला पाहिजे. ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या तिन्ही योजनांना किती पैसे हे नेते आणतात, हे दिसेलच.कार्यकर्त्यांना चिमटा काढताना पतंगराव म्हणाले की, आता गावा-गावातील आपसांतील भांडणे सोडून द्या. तुमच्या गावाचे बजेट बुंडुकल्याएवढेही नसते. त्यामुळे तेवढ्या चिरीमिरीसाठी भांडण्यापेक्षा केंद्र व राज्याकडून निधी आणून गावाचा विकास करण्यावर भर द्या. या वाक्यावर उपस्थितांत हशा पिकला.