शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा सांगलीत हल्लाबोल

By admin | Updated: July 9, 2015 23:37 IST

मोर्चा, सभांमधून शासनाचा निषेध : तालुकानिहाय जनजागृतीचा निर्धार

सांगली : शासनाच्या अनेक धोरणांचा निषेध करीत कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी सांगलीत मोर्चा काढला. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत कॉँग्रेस नेत्यांनी शासनाच्या निर्णयांवर हल्लाबोल केला. सरकारविरोधात तालुकानिहाय जनजागृती करण्याचा निर्धार यावेळी सभेत करण्यात आला. माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. कॉँग्रेस भवनपासून दुपारी साडेबारा वाजता मोर्चास सुरुवात झाली. आझाद चौक, स्टेशन चौक, राजवाडा चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आला. याठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख म्हणाले की, या सरकारला वेळीच रोखले नाही, तर महाराष्ट्रातील शेतकरी व कष्टकरी संकटात सापडतील. त्यामुळे आपल्या शेतकरी व कष्टकरी बांधवांना कॉँग्रेसनेच आधार दिला पाहिजे. जातीच्या नावावर केलेल्या विषारी प्रचाराला सध्याची तरुणाई भुलली होती. त्यांनी याच प्रचाराला बळी पडून भाजपला मतदान केले होते. आता या तरुणाईलाही सत्य पटवून देऊन पुन्हा कॉँग्रेसकडे घेतले पाहिजे. अनेकांचा रस्ता चुकला आहे. त्यांना योग्य मार्गावर आणण्याचे काम कॉँग्रेसने करावे. पतंगराव कदम म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी राज्यात आणि देशात नरेंद्र मोदी यांची हवा होती. त्यांच्याच निर्णयामुळे आता त्यांची गोची झालेली आहे. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कॉँग्रेसने बाजी मारल्यामुळे राज्यातच नव्हे, तर आता देशातच कॉँग्रेसची हवा सुरू झालेली आहे. राज्यात सर्वत्र भाजपच्या घोटाळ्यांची चर्चा सुरू आहे. बोगस डिग्रीवाले शिक्षणमंत्री, व्यापमं घोटाळा अशा अनेक गोष्टींमुळे ही सरकारे कशापद्धतीने काम करताहेत, हे दिसत आहे. आता सुरुवात झाली आहे, अजून अनंत गोष्टी बाहेर येणार आहेत. हे सरकार दिशाहीन झाल्याने नागरिकांच्या पदरी काहीही पडलेले नाही. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील, सत्यजित देशमुख, किशोर जामदार, माजी आमदार हाफिज धत्तुरे, आनंदराव मोहिते, नामदेवराव मोहिते, मालन मोहिते यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)भाजपचे खोटे आंदोलन!यावेळी प्रतीक पाटील म्हणाले की, जतच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना, भाजपच्या नेत्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. खोट्या आंदोलनाने कोणतेही प्रश्न कधी सुटत नाहीत. त्यामुळे अशा नेत्यांवर कितपत विश्वास ठेवायचा, याचा विचार जतच्या लोकांनीच आता केला पाहिजे. ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या तिन्ही योजनांना किती पैसे हे नेते आणतात, हे दिसेलच.कार्यकर्त्यांना चिमटा काढताना पतंगराव म्हणाले की, आता गावा-गावातील आपसांतील भांडणे सोडून द्या. तुमच्या गावाचे बजेट बुंडुकल्याएवढेही नसते. त्यामुळे तेवढ्या चिरीमिरीसाठी भांडण्यापेक्षा केंद्र व राज्याकडून निधी आणून गावाचा विकास करण्यावर भर द्या. या वाक्यावर उपस्थितांत हशा पिकला.