शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राष्ट्रवादी नेत्यांमध्येच भूमिकेचा गोंधळनामा

By admin | Updated: July 8, 2014 00:45 IST

मतभिन्नता : आर. आर. आक्रमक, तर जयंतरावांचा संयम

अविनाश कोळी ल्ल सांगलीपक्षप्रेम ओसरलेल्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पक्षबैठकीला शेवटची हजेरी लावण्याची औपचारिकता पार पाडली. कुंपणावर थांबलेल्या अशा नेत्यांना ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी प्रेमाची साद दिली, तर गृहमंत्र्यांनी पोलिसी खाक्याप्रमाणे आक्रमक भूमिका घेत ‘चालते व्हा’चे आदेश दिले. राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांमधील वेगवेगळ््या भूमिकेमुळे संभ्रमात असलेले कार्यकर्ते अधिकच गोंधळात पडले आहेत. पक्ष आणि नेते कुठे चुकत आहेत, याबाबतची मनातील खदखद व्यक्त करून कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीतच नेत्यांना पक्ष सोडण्याचा इशारा दिला. या बैठकीस दुष्काळी फोरमचे एकमेव नेते, पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते. विलासराव जगतापांना राष्ट्रवादीने एकतर्फी सोडचिठ्ठी दिली असून, अजितराव घोरपडेंबद्दल पक्ष संभ्रमात आहे. आता आर. आर. पाटील यांच्याविरोधात लढण्याची घोषणाच घोरपडेंनी केल्यामुळे त्यांचा पक्षाशी आता संबंध राहिलेला नाही, असे सांगितले जात आहे. कुंपणावरील नेत्यांचे काय करायचे, यावर राष्ट्रवादीतच दोन मतप्रवाह आहेत. दिग्गज नेत्यांना हटविण्यापेक्षा त्यांना सोबत घेतल्यास विधानसभेला पक्षाचे बळ अधिक वाढेल, असे मत व्यक्त करणारा एक प्रवाह, तर दिग्गज नेत्यांच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही, अशा मताचा एक प्रवाह राष्ट्रवादीत आहे. हीच मतभिन्नता नेत्यांमध्येही दिसत आहे. आर. आर. पाटील यांना कुंपणावरील नेत्यांबद्दल किती राग आहे, याचा प्रत्यय राष्ट्रवादीच्या रविवारी झालेल्या बैठकीत आला. त्यांनी अशा सर्व नेत्यांना फटकारले. अशा लोकांच्या जाण्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही. त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. बैठक संपल्यानंतर जयंत पाटील यांनी नेमकी आर. आर. पाटील यांच्याविरोधी भूमिका घेतली. संयमाने, शांतपणे व सोशिकतेने साऱ्या गोष्टी स्वीकारण्याची वेळ आता आमच्यावर आली आहे, असे मत व्यक्त करीत सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका जयंतरावांनी व्यक्त केली. जगतापांबद्दलचा आदरभावही त्यांनी व्यक्त केला. या दोन्ही नेत्यांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे बैठकीला उपस्थित राहिलेल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा गोंधळ उडाला. विधानसभेसाठी आता नेमके काय करायचे, याबाबत संभ्रम आहे.