शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

आटपाडीत पाणी वितरणावरून संभ्रमावस्था

By admin | Updated: June 23, 2016 01:41 IST

टेंभूचे पाणी : कडेगाव, सांगोला तालुक्यांनाच फायदा अधिक, दुसरीकडे जाणारे पाणी बघत बसण्याची वेळ :: लोकमत विशेष

अविनाश बाड -- आटपाडी -बहुचर्चित टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी परिस्थितीत आटपाडी तालुक्याला मिळाले खरे, पण ते किती मिळाले, याबाबत आमदार अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणेच नेते आकडेवारी सांगत आहेत. त्यामुळे आटपाडीकरांच्या जिवाशी कोण खेळत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टेंभू योजनेच्या पाण्याचा लाभ कडेगाव आणि सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा मोठ्या प्रमाणात झाला. या दोन्ही तालुक्यात पाटबंधारे विभागाने या योजनेचे तलावांमध्ये आलेले पाणी उपसा करण्यासाठी अधिकृत परवाने दिले आहेत. पण ज्या आटपाडीत ही योजना होण्यासाठी कर्जरोखे विक्रीचा कार्यक्रम झाला आणि ज्या आटपाडीत गेली २४ वर्षे पाणी संघर्ष परिषद आयोजित केली जाते, त्याच आटपाडीतील शेतकऱ्यांना सांगोल्याकडे जाणारे पाणी बघत बसण्याची वेळ आली आहे. पाटबंधारे विभाग परवाने देत नाही, हे समजणे कठीण आहे. परवाने नसल्यामुळे अधिच अडचणीत सापडलेले शेतकरी ३३ हजार रुपये द. ल. घ. फूट एवढ्या महागड्या दराने पाणीपट्टी कशी भरणार, कुठून भरणार अािण का भरणार, हे प्रश्न ना टेंभूच्या अभियंत्यांना पडले ना नेत्यांना!त्यात आता आमदार अनिल बाबर आणि राजेंद्रअण्णा देशमुख यांनी पाटबंधारे विभागाच्या माहितीप्रमाणेच आपण आकडेवारी सांगत असल्याचा दावा करून लोकांना संभ्रमात टाकले आहे. आटपाडीचे पाटबंधारे कार्यालय आटपाडीपासून सुमारे तीन किलोमीटरवर आहे. त्याचे प्रमुख अभियंते आर. एस. पवार यांच्याकडे अनेक ठिकाणचा पदभार असल्याने ते कार्यालयात भेटणे दुर्मिळ ठरत आहे. त्यातूनही त्यांनी शेतकऱ्यांकडून तलावातून पाणी उचलण्यासाठी पैसे भरून घेतले, पण परवाने मात्र दिले नाहीत. गरज केवळ पाण्याच्या नियोजनाचीआटपाडी तालुक्याची नैसर्गिक रचनाच पश्चिमेकडून पूर्वेकडे उतरती आहे. त्यामुळे दिघंची-राजेवाडी परिसर वगळता सर्व तलाव सध्या टेंभूच्या पाण्याने भरता येऊ शकतात. तसे नियोजन केले, तर या तलावातून वैयक्तिक आणि सामूहिक ठिबक सिंचन शेती करून हजारो हेक्टर शेती बारमाही बागायती होणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. खात्रीने पाणी मिळाले तर शेतकरी नक्की आधी पैसे भरण्यास तयारही आहेत. गरज आहे ती फक्त पाटबंधारे विभागाने नियोजन करण्याची.राजेंद्रआण्णाचे खरे, की अनिलभाऊंचे?पाटबंधारे विभागाने दिलेली माहितीच जाहीर करत असल्याचा दावा करणाऱ्या आमदार अनिल बाबर अािण माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख या दोन नेत्यांच्या माहितीत प्रचंड तफावत आहे. राजेंद्रअण्णा आटपाडी तालुक्यावर अन्याय झाल्याचे सांगत आहेत, तर आ. बाबर टेंभूचे जादा पाणी दिल्याचे सांगत आहेत. या दोन नेत्यांतील खरी माहिती कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सांगोला तालुक्याने पहिल्यांदा १ कोटी २७ लाख रुपये आणि पुन्हा ७५ लाख रुपये टेंभूच्या पाण्यासाठी भरले. आटपाडी तालुक्यात ६३ लाख १४ हजार भरले. जेवढे पैसे भरले त्यापेक्षा अधिक पाणी आटपाडी तालुक्याला दिले आहे. २५१ द. ल. घ. फूट पाणी दिले आहे. पाणी बंद झाल्यावर हे जागे कसे झाले? त्यावेळी माझ्याशी संपर्क साधला असता तर व्यवस्था केली असती.- अनिल बाबर, आमदारसांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी १ कोटी ६ लाख रुपये टेंभूच्या पाण्यासाठी भरले. १२० दिवस या योजनेचे पाणी तिकडे सोडण्यात आले. आटपाडी तालुक्याने ५७ लाख ५७ हजार भरले. २० दिवस पाणी दिले गेले. फक्त १३० द. ल. घ. फूट पाणी देऊन आटपाडी तालुक्यावर अन्याय केला आहे. किती पाणी तालुक्याला दिले, याचे पाटबंधारे विभागाचे आपल्याकडे पत्र आहे.- राजेंद्रअण्णा देशमुख, माजी आमदार१९७२ मध्ये बाबासाहेब देशमुखांनी तालुक्यात सर्वत्र तलाव, पाझर तलाव बांधले. हे फक्त टेंभूच्या पाण्याने भरले तरी शेतकरी पाणी उचलून १२ ते १५ हजार हेक्टरपर्यंत बागायत करतील. पण कडेगाव आणि सांगोला तालुक्यात जसे टेंभूच्या पाण्याचे उचलपरवाने शेतकऱ्यांना दिले जातात, तसे परवाने आटपाडी तालुक्यात दिले जात नाहीत. यामागे राजकारण आहे. विरोधक आडकाठी घालत आहेत.- अमरसिंह देशमुख, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, सांगली