शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

आटपाडीत पाणी वितरणावरून संभ्रमावस्था

By admin | Updated: June 23, 2016 01:41 IST

टेंभूचे पाणी : कडेगाव, सांगोला तालुक्यांनाच फायदा अधिक, दुसरीकडे जाणारे पाणी बघत बसण्याची वेळ :: लोकमत विशेष

अविनाश बाड -- आटपाडी -बहुचर्चित टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी परिस्थितीत आटपाडी तालुक्याला मिळाले खरे, पण ते किती मिळाले, याबाबत आमदार अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणेच नेते आकडेवारी सांगत आहेत. त्यामुळे आटपाडीकरांच्या जिवाशी कोण खेळत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टेंभू योजनेच्या पाण्याचा लाभ कडेगाव आणि सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा मोठ्या प्रमाणात झाला. या दोन्ही तालुक्यात पाटबंधारे विभागाने या योजनेचे तलावांमध्ये आलेले पाणी उपसा करण्यासाठी अधिकृत परवाने दिले आहेत. पण ज्या आटपाडीत ही योजना होण्यासाठी कर्जरोखे विक्रीचा कार्यक्रम झाला आणि ज्या आटपाडीत गेली २४ वर्षे पाणी संघर्ष परिषद आयोजित केली जाते, त्याच आटपाडीतील शेतकऱ्यांना सांगोल्याकडे जाणारे पाणी बघत बसण्याची वेळ आली आहे. पाटबंधारे विभाग परवाने देत नाही, हे समजणे कठीण आहे. परवाने नसल्यामुळे अधिच अडचणीत सापडलेले शेतकरी ३३ हजार रुपये द. ल. घ. फूट एवढ्या महागड्या दराने पाणीपट्टी कशी भरणार, कुठून भरणार अािण का भरणार, हे प्रश्न ना टेंभूच्या अभियंत्यांना पडले ना नेत्यांना!त्यात आता आमदार अनिल बाबर आणि राजेंद्रअण्णा देशमुख यांनी पाटबंधारे विभागाच्या माहितीप्रमाणेच आपण आकडेवारी सांगत असल्याचा दावा करून लोकांना संभ्रमात टाकले आहे. आटपाडीचे पाटबंधारे कार्यालय आटपाडीपासून सुमारे तीन किलोमीटरवर आहे. त्याचे प्रमुख अभियंते आर. एस. पवार यांच्याकडे अनेक ठिकाणचा पदभार असल्याने ते कार्यालयात भेटणे दुर्मिळ ठरत आहे. त्यातूनही त्यांनी शेतकऱ्यांकडून तलावातून पाणी उचलण्यासाठी पैसे भरून घेतले, पण परवाने मात्र दिले नाहीत. गरज केवळ पाण्याच्या नियोजनाचीआटपाडी तालुक्याची नैसर्गिक रचनाच पश्चिमेकडून पूर्वेकडे उतरती आहे. त्यामुळे दिघंची-राजेवाडी परिसर वगळता सर्व तलाव सध्या टेंभूच्या पाण्याने भरता येऊ शकतात. तसे नियोजन केले, तर या तलावातून वैयक्तिक आणि सामूहिक ठिबक सिंचन शेती करून हजारो हेक्टर शेती बारमाही बागायती होणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. खात्रीने पाणी मिळाले तर शेतकरी नक्की आधी पैसे भरण्यास तयारही आहेत. गरज आहे ती फक्त पाटबंधारे विभागाने नियोजन करण्याची.राजेंद्रआण्णाचे खरे, की अनिलभाऊंचे?पाटबंधारे विभागाने दिलेली माहितीच जाहीर करत असल्याचा दावा करणाऱ्या आमदार अनिल बाबर अािण माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख या दोन नेत्यांच्या माहितीत प्रचंड तफावत आहे. राजेंद्रअण्णा आटपाडी तालुक्यावर अन्याय झाल्याचे सांगत आहेत, तर आ. बाबर टेंभूचे जादा पाणी दिल्याचे सांगत आहेत. या दोन नेत्यांतील खरी माहिती कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सांगोला तालुक्याने पहिल्यांदा १ कोटी २७ लाख रुपये आणि पुन्हा ७५ लाख रुपये टेंभूच्या पाण्यासाठी भरले. आटपाडी तालुक्यात ६३ लाख १४ हजार भरले. जेवढे पैसे भरले त्यापेक्षा अधिक पाणी आटपाडी तालुक्याला दिले आहे. २५१ द. ल. घ. फूट पाणी दिले आहे. पाणी बंद झाल्यावर हे जागे कसे झाले? त्यावेळी माझ्याशी संपर्क साधला असता तर व्यवस्था केली असती.- अनिल बाबर, आमदारसांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी १ कोटी ६ लाख रुपये टेंभूच्या पाण्यासाठी भरले. १२० दिवस या योजनेचे पाणी तिकडे सोडण्यात आले. आटपाडी तालुक्याने ५७ लाख ५७ हजार भरले. २० दिवस पाणी दिले गेले. फक्त १३० द. ल. घ. फूट पाणी देऊन आटपाडी तालुक्यावर अन्याय केला आहे. किती पाणी तालुक्याला दिले, याचे पाटबंधारे विभागाचे आपल्याकडे पत्र आहे.- राजेंद्रअण्णा देशमुख, माजी आमदार१९७२ मध्ये बाबासाहेब देशमुखांनी तालुक्यात सर्वत्र तलाव, पाझर तलाव बांधले. हे फक्त टेंभूच्या पाण्याने भरले तरी शेतकरी पाणी उचलून १२ ते १५ हजार हेक्टरपर्यंत बागायत करतील. पण कडेगाव आणि सांगोला तालुक्यात जसे टेंभूच्या पाण्याचे उचलपरवाने शेतकऱ्यांना दिले जातात, तसे परवाने आटपाडी तालुक्यात दिले जात नाहीत. यामागे राजकारण आहे. विरोधक आडकाठी घालत आहेत.- अमरसिंह देशमुख, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, सांगली