शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत पाणी वितरणावरून संभ्रमावस्था

By admin | Updated: June 23, 2016 01:41 IST

टेंभूचे पाणी : कडेगाव, सांगोला तालुक्यांनाच फायदा अधिक, दुसरीकडे जाणारे पाणी बघत बसण्याची वेळ :: लोकमत विशेष

अविनाश बाड -- आटपाडी -बहुचर्चित टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी परिस्थितीत आटपाडी तालुक्याला मिळाले खरे, पण ते किती मिळाले, याबाबत आमदार अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणेच नेते आकडेवारी सांगत आहेत. त्यामुळे आटपाडीकरांच्या जिवाशी कोण खेळत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टेंभू योजनेच्या पाण्याचा लाभ कडेगाव आणि सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा मोठ्या प्रमाणात झाला. या दोन्ही तालुक्यात पाटबंधारे विभागाने या योजनेचे तलावांमध्ये आलेले पाणी उपसा करण्यासाठी अधिकृत परवाने दिले आहेत. पण ज्या आटपाडीत ही योजना होण्यासाठी कर्जरोखे विक्रीचा कार्यक्रम झाला आणि ज्या आटपाडीत गेली २४ वर्षे पाणी संघर्ष परिषद आयोजित केली जाते, त्याच आटपाडीतील शेतकऱ्यांना सांगोल्याकडे जाणारे पाणी बघत बसण्याची वेळ आली आहे. पाटबंधारे विभाग परवाने देत नाही, हे समजणे कठीण आहे. परवाने नसल्यामुळे अधिच अडचणीत सापडलेले शेतकरी ३३ हजार रुपये द. ल. घ. फूट एवढ्या महागड्या दराने पाणीपट्टी कशी भरणार, कुठून भरणार अािण का भरणार, हे प्रश्न ना टेंभूच्या अभियंत्यांना पडले ना नेत्यांना!त्यात आता आमदार अनिल बाबर आणि राजेंद्रअण्णा देशमुख यांनी पाटबंधारे विभागाच्या माहितीप्रमाणेच आपण आकडेवारी सांगत असल्याचा दावा करून लोकांना संभ्रमात टाकले आहे. आटपाडीचे पाटबंधारे कार्यालय आटपाडीपासून सुमारे तीन किलोमीटरवर आहे. त्याचे प्रमुख अभियंते आर. एस. पवार यांच्याकडे अनेक ठिकाणचा पदभार असल्याने ते कार्यालयात भेटणे दुर्मिळ ठरत आहे. त्यातूनही त्यांनी शेतकऱ्यांकडून तलावातून पाणी उचलण्यासाठी पैसे भरून घेतले, पण परवाने मात्र दिले नाहीत. गरज केवळ पाण्याच्या नियोजनाचीआटपाडी तालुक्याची नैसर्गिक रचनाच पश्चिमेकडून पूर्वेकडे उतरती आहे. त्यामुळे दिघंची-राजेवाडी परिसर वगळता सर्व तलाव सध्या टेंभूच्या पाण्याने भरता येऊ शकतात. तसे नियोजन केले, तर या तलावातून वैयक्तिक आणि सामूहिक ठिबक सिंचन शेती करून हजारो हेक्टर शेती बारमाही बागायती होणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. खात्रीने पाणी मिळाले तर शेतकरी नक्की आधी पैसे भरण्यास तयारही आहेत. गरज आहे ती फक्त पाटबंधारे विभागाने नियोजन करण्याची.राजेंद्रआण्णाचे खरे, की अनिलभाऊंचे?पाटबंधारे विभागाने दिलेली माहितीच जाहीर करत असल्याचा दावा करणाऱ्या आमदार अनिल बाबर अािण माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख या दोन नेत्यांच्या माहितीत प्रचंड तफावत आहे. राजेंद्रअण्णा आटपाडी तालुक्यावर अन्याय झाल्याचे सांगत आहेत, तर आ. बाबर टेंभूचे जादा पाणी दिल्याचे सांगत आहेत. या दोन नेत्यांतील खरी माहिती कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सांगोला तालुक्याने पहिल्यांदा १ कोटी २७ लाख रुपये आणि पुन्हा ७५ लाख रुपये टेंभूच्या पाण्यासाठी भरले. आटपाडी तालुक्यात ६३ लाख १४ हजार भरले. जेवढे पैसे भरले त्यापेक्षा अधिक पाणी आटपाडी तालुक्याला दिले आहे. २५१ द. ल. घ. फूट पाणी दिले आहे. पाणी बंद झाल्यावर हे जागे कसे झाले? त्यावेळी माझ्याशी संपर्क साधला असता तर व्यवस्था केली असती.- अनिल बाबर, आमदारसांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी १ कोटी ६ लाख रुपये टेंभूच्या पाण्यासाठी भरले. १२० दिवस या योजनेचे पाणी तिकडे सोडण्यात आले. आटपाडी तालुक्याने ५७ लाख ५७ हजार भरले. २० दिवस पाणी दिले गेले. फक्त १३० द. ल. घ. फूट पाणी देऊन आटपाडी तालुक्यावर अन्याय केला आहे. किती पाणी तालुक्याला दिले, याचे पाटबंधारे विभागाचे आपल्याकडे पत्र आहे.- राजेंद्रअण्णा देशमुख, माजी आमदार१९७२ मध्ये बाबासाहेब देशमुखांनी तालुक्यात सर्वत्र तलाव, पाझर तलाव बांधले. हे फक्त टेंभूच्या पाण्याने भरले तरी शेतकरी पाणी उचलून १२ ते १५ हजार हेक्टरपर्यंत बागायत करतील. पण कडेगाव आणि सांगोला तालुक्यात जसे टेंभूच्या पाण्याचे उचलपरवाने शेतकऱ्यांना दिले जातात, तसे परवाने आटपाडी तालुक्यात दिले जात नाहीत. यामागे राजकारण आहे. विरोधक आडकाठी घालत आहेत.- अमरसिंह देशमुख, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, सांगली