शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आटपाडीत पाणी वितरणावरून संभ्रमावस्था

By admin | Updated: June 23, 2016 01:41 IST

टेंभूचे पाणी : कडेगाव, सांगोला तालुक्यांनाच फायदा अधिक, दुसरीकडे जाणारे पाणी बघत बसण्याची वेळ :: लोकमत विशेष

अविनाश बाड -- आटपाडी -बहुचर्चित टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी परिस्थितीत आटपाडी तालुक्याला मिळाले खरे, पण ते किती मिळाले, याबाबत आमदार अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणेच नेते आकडेवारी सांगत आहेत. त्यामुळे आटपाडीकरांच्या जिवाशी कोण खेळत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टेंभू योजनेच्या पाण्याचा लाभ कडेगाव आणि सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा मोठ्या प्रमाणात झाला. या दोन्ही तालुक्यात पाटबंधारे विभागाने या योजनेचे तलावांमध्ये आलेले पाणी उपसा करण्यासाठी अधिकृत परवाने दिले आहेत. पण ज्या आटपाडीत ही योजना होण्यासाठी कर्जरोखे विक्रीचा कार्यक्रम झाला आणि ज्या आटपाडीत गेली २४ वर्षे पाणी संघर्ष परिषद आयोजित केली जाते, त्याच आटपाडीतील शेतकऱ्यांना सांगोल्याकडे जाणारे पाणी बघत बसण्याची वेळ आली आहे. पाटबंधारे विभाग परवाने देत नाही, हे समजणे कठीण आहे. परवाने नसल्यामुळे अधिच अडचणीत सापडलेले शेतकरी ३३ हजार रुपये द. ल. घ. फूट एवढ्या महागड्या दराने पाणीपट्टी कशी भरणार, कुठून भरणार अािण का भरणार, हे प्रश्न ना टेंभूच्या अभियंत्यांना पडले ना नेत्यांना!त्यात आता आमदार अनिल बाबर आणि राजेंद्रअण्णा देशमुख यांनी पाटबंधारे विभागाच्या माहितीप्रमाणेच आपण आकडेवारी सांगत असल्याचा दावा करून लोकांना संभ्रमात टाकले आहे. आटपाडीचे पाटबंधारे कार्यालय आटपाडीपासून सुमारे तीन किलोमीटरवर आहे. त्याचे प्रमुख अभियंते आर. एस. पवार यांच्याकडे अनेक ठिकाणचा पदभार असल्याने ते कार्यालयात भेटणे दुर्मिळ ठरत आहे. त्यातूनही त्यांनी शेतकऱ्यांकडून तलावातून पाणी उचलण्यासाठी पैसे भरून घेतले, पण परवाने मात्र दिले नाहीत. गरज केवळ पाण्याच्या नियोजनाचीआटपाडी तालुक्याची नैसर्गिक रचनाच पश्चिमेकडून पूर्वेकडे उतरती आहे. त्यामुळे दिघंची-राजेवाडी परिसर वगळता सर्व तलाव सध्या टेंभूच्या पाण्याने भरता येऊ शकतात. तसे नियोजन केले, तर या तलावातून वैयक्तिक आणि सामूहिक ठिबक सिंचन शेती करून हजारो हेक्टर शेती बारमाही बागायती होणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. खात्रीने पाणी मिळाले तर शेतकरी नक्की आधी पैसे भरण्यास तयारही आहेत. गरज आहे ती फक्त पाटबंधारे विभागाने नियोजन करण्याची.राजेंद्रआण्णाचे खरे, की अनिलभाऊंचे?पाटबंधारे विभागाने दिलेली माहितीच जाहीर करत असल्याचा दावा करणाऱ्या आमदार अनिल बाबर अािण माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख या दोन नेत्यांच्या माहितीत प्रचंड तफावत आहे. राजेंद्रअण्णा आटपाडी तालुक्यावर अन्याय झाल्याचे सांगत आहेत, तर आ. बाबर टेंभूचे जादा पाणी दिल्याचे सांगत आहेत. या दोन नेत्यांतील खरी माहिती कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सांगोला तालुक्याने पहिल्यांदा १ कोटी २७ लाख रुपये आणि पुन्हा ७५ लाख रुपये टेंभूच्या पाण्यासाठी भरले. आटपाडी तालुक्यात ६३ लाख १४ हजार भरले. जेवढे पैसे भरले त्यापेक्षा अधिक पाणी आटपाडी तालुक्याला दिले आहे. २५१ द. ल. घ. फूट पाणी दिले आहे. पाणी बंद झाल्यावर हे जागे कसे झाले? त्यावेळी माझ्याशी संपर्क साधला असता तर व्यवस्था केली असती.- अनिल बाबर, आमदारसांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी १ कोटी ६ लाख रुपये टेंभूच्या पाण्यासाठी भरले. १२० दिवस या योजनेचे पाणी तिकडे सोडण्यात आले. आटपाडी तालुक्याने ५७ लाख ५७ हजार भरले. २० दिवस पाणी दिले गेले. फक्त १३० द. ल. घ. फूट पाणी देऊन आटपाडी तालुक्यावर अन्याय केला आहे. किती पाणी तालुक्याला दिले, याचे पाटबंधारे विभागाचे आपल्याकडे पत्र आहे.- राजेंद्रअण्णा देशमुख, माजी आमदार१९७२ मध्ये बाबासाहेब देशमुखांनी तालुक्यात सर्वत्र तलाव, पाझर तलाव बांधले. हे फक्त टेंभूच्या पाण्याने भरले तरी शेतकरी पाणी उचलून १२ ते १५ हजार हेक्टरपर्यंत बागायत करतील. पण कडेगाव आणि सांगोला तालुक्यात जसे टेंभूच्या पाण्याचे उचलपरवाने शेतकऱ्यांना दिले जातात, तसे परवाने आटपाडी तालुक्यात दिले जात नाहीत. यामागे राजकारण आहे. विरोधक आडकाठी घालत आहेत.- अमरसिंह देशमुख, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, सांगली