शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

एलबीटीवरून पुन्हा संघर्षाची ठिणगी

By admin | Updated: April 3, 2016 23:43 IST

इशाऱ्यावर इशारे : महापालिका प्रशासन, व्यापाऱ्यांत वाद पेटण्याची चिन्हे

सांगली : एलबीटीच्या विवरणपत्र तपासणीला राज्य शासनाने एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने महापालिका प्रशासन व पदाधिकारी खुशीत आहेत. व्यापाऱ्यांकडील थकित ५० कोटींची वसुली चालू आर्थिक वर्षात करण्याचा विडा पालिकेने उचलला आहे. पण व्यापारी संघटनेने थकबाकीचा आकडा चुकीचा असल्याचा दावा करीत महापालिकेने कारवाईचा बडगा उगारल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिका विरुद्ध व्यापारी असा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील १२ हजार ८०० व्यापाऱ्यांपैकी ९ हजार लोकांनी एलबीटीतर्गंत नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या व्यापाऱ्यांमध्ये केवळ साडेपाच हजार व्यापाऱ्यांनी विवरणपत्र भरून कर जमा केला आहे. उर्वरित साडेतीन हजार लोकांनी कर भरलेला नाही. याशिवाय ३ हजार ८०० लोकांनी करास पात्र असतानाही अद्याप नोंदणीच केलेली नाही. त्यामुळे अशा चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौर हारुण शिकलगार यांनी शनिवारी दिले. सोमवारपासून कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मोहीम पोलिस बंदोबस्तात हाती घेण्यात येणार आहे. एलबीटीपोटी ५० कोटी रुपये व्यापाऱ्यांकडे थकित असल्याचा दावा महापालिका गेल्या सहा महिन्यांपासून करीत आहे. एलबीटी रद्द झाल्याने व्यापाऱ्यांनीही कर भरण्याकडे पाठ फिरविली होती. आता पालिकेने सीए पॅनेल नियुक्त करून एलबीटीच्या विवरणपत्राची तपासणी हाती घेतली आहे. केवळ आठ व्यापाऱ्यांच्या विवरणपत्रातच घोळ आढळून आला आहे. त्यांच्याकडून दीड कोटीची वसुली करण्याची शिफारस करण्यात आली आहे. साडेपाच हजार व्यापाऱ्यांच्या विवरणपत्राची तपासणी केल्यास कोट्यवधीची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होऊ शकते, असा पालिकेचा व्होरा आहे. पण या प्रक्रियेलाच व्यापाऱ्यांचा विरोध आहे. सुरुवातीला विवरणपत्र तपासणीच्या मुदतवाढीला व्यापारी संघटनेचा विरोध होता. पण शासनाने एक वर्षाची मुदतवाढ दिली. त्यात आता महापौरांकडून इशाऱ्यावर इशारे दिले जात आहेत. त्यामुळे कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांची खऱ्याअर्थाने कोंडी झाली आहे. महापालिकेने निश्चित केलेला थकबाकीचा आकडाच व्यापारी संघटनांना मान्य नाही. पन्नास कोटी रुपये थकित नसून फारच तपासणी झाली, तरी आणखी दीड ते दोन कोटी वसूल होतील, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. पालिकेने जकातीच्या तुलनेत एलबीटीचे उत्पन्न गृहीत धरले आहे. तेच चुकीचे आहे. एलबीटीत अनेक व्यापारी पात्र नाहीत. काहींनी पालिका हद्दीबाहेर व्यापार नेला. एलबीटी रद्दसाठी आम्ही शासनाला झुकविले आहे. त्यात आता महापालिकेचे काय घेऊन बसलात, अशी प्रतिक्रियाही संघटनेतून उमटत आहेत. त्यामुळे आता एलबीटीच्या वसुलीवरून महापालिका व व्यापाऱ्यांत पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी) महापौरांनी तोंड आवरावे : समीर शहा व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा देणाऱ्या महापौर हारुण शिकलगार यांनी तोंड सांभाळून व्यक्तव्ये करावीत. महापालिकेने कारवाईचा बडगा उगारल्यास त्याचे दूरगामी परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील. शिकलगार हे माजी महापौर विवेक कांबळे यांची भाषा बोलत आहेत. आणखी दोन वर्षांनी पालिकेच्या निवडणुका आहेत. तेव्हा आम्ही व्यापाऱ्यांची ताकद दाखवून देऊ. व्यापाऱ्यांकडे कोणतीही थकबाकी नाही. ज्यांनी कर भरला नाही, त्यांच्याकडे वसुली करण्याची महापालिकेची हिंमत नाही. कर चुकविणाऱ्यांकडे पालिकेच्या प्रशासनाने हात काळे केले आहेत. ज्यांनी प्रामाणिक कर भरला आहे, त्यांनाच त्रास देण्याचा पालिकेचा हेतू दिसतो. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा यांनी दिला. सत्ताधारी, विरोधकांकडून व्यापारी बेदखल महापालिकेत सत्ता कुणाचीही असो, नेहमीच व्यापारी, उद्योजकांच्या बाजूने निर्णय होत असे. विशेषत: मदनभाऊ पाटील यांच्या काळात तर कधीच व्यापाऱ्यांवर कारवाईची कटूता आली नाही. अगदी व्यापारपेठेतील अतिक्रमण काढतानाही मदनभाऊंचा हस्तक्षेप होत असे. एलबीटीविरोधात आंदोलनात व्यापाऱ्यांनी मदनभाऊंवर टीका केली. पण त्यांच्या मध्यस्थीने शेवटी तोडगा निघाला होता. पण आता मदन पाटील हयात नाहीत. त्यात विद्यमान लोकप्रतिनिधींनी एलबीटी वसुली हा शासनाचा निर्णय असल्याचे सांगत हात झटकल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता कुणाच्या दारात जायचे, असा प्रश्न व्यापारी व त्यांच्या संघटनेला पडला आहे. एलबीटीविरोधात व्यापाऱ्यांनी एकत्रित मोट बांधली होती. आता मात्र व्यापाऱ्यांच्या एकीला ग्रहण लागले आहे.