शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

तडजोडीच्या बळामुळे टवाळखोर निर्ढावले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 00:41 IST

बोरगावचा आत्मकेंद्रीपणा : मसुचीवाडीतील दुफळी चिंताजनक

इस्लामपूर : शालेय मुलींच्या छेडछाडीवरून सुरू झालेला मसुचीवाडी आणि बोरगाव या वाळवा तालुक्यातील लगतच्या गावातील वाद आता पोलिसांच्या दारात पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक पातळीवरील नेत्यांसमोर तडजोडीचे प्रयत्न होऊन अशा घटनांवर पांघरूण घातले जायचे. त्यामुळे या तडजोडीचे बळ टवाळखोरांना मिळाले आणि खुलेआम छेडछाडीला सुरुवात झाली. शेवटी त्रासलेल्या मसुचीवाडीकरांनी टोळक्याची धुलाई केली. त्यावर निर्ढावलेल्या टोळक्याने मसुचीवाडीतील एकास बेदम चोप देऊन पुन्हा आव्हान दिले. शेवटी ग्रामसभा घेऊन हा वादाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला.बोरगाव आणि त्याखालील पाच वाड्या असा या परिसराचा पसारा. मसुचीवाडी, गौंडवाडी, साटपेवाडी, बनेवाडी आणि फार्णेवाडी अशा या छोट्या-छोट्या वाड्या आणि या सर्व वाड्यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय पितृत्व करणारे बोरगाव हे गाव. ही सगळी गावे कृष्णा नदीकाठी असल्याने ओघाने सुबत्ता आलीच. ५० वर्षांपूर्वी हिंदमाता शिक्षण मंडळाच्या रूपाने शिक्षणाची व्यवस्था सुरू झाली. सध्या या शिक्षण मंडळाचे अध्यक्षपद हे मसुचीवाडीचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते दत्तूआप्पा खोत यांच्याकडे आहे.बोरगावात एक महाविद्यालय आणि दोन माध्यमिक विद्यालये असल्याने आजूबाजूच्या वाड्यांमधील मुले-मुली शिक्षणासाठी बोरगावमध्ये येतात. काळाच्या ओघात परिस्थितीही बदलत गेली. शहरी जीवनशैलीकडे ओढा वाढला आणि त्यातूनच मग या टपोरेगिरीचा धागाही परिसरात आपसुकच विणला गेला. मुडदे पाडण्यापर्यंतची गुंडगिरी बोरगावला नवी नाही. मात्र ग्रामीण ढाच्याच्या पारंपरिक जीवनशैलीत छेडछाडीला अथवा महिला, मुलींविषयक आगळीकीला मात्र स्थान नव्हते. अलीकडे छोट्या-मोठ्या टोळ्क्यांचा स्वैराचार वाढला. घरातूनच पाठबळ मिळत असल्याने भान हरवलेली ही टोळकी वासनांध बनली. ज्या-ज्यावेळी छेडछाडीबाबत मुलींच्या तक्रारी आल्या, त्यावेळी बोरगावातील स्थानिक नेतेमंडळी संबंधित युवकाला ताकीद द्यायचे आणि या प्रकाराला पांघरूण घातले जायचे. त्यामुळे पोलिसांपर्यंत तक्रार कधी गेलीच नाही. त्यानंतर आठ-पंधरा दिवसांनी पुन्हा तोच प्रकार सुरू राहिल्याने अशा तडजोडीचे बळ या टवाळखोरांना मिळत गेले. या परिस्थितीला मसुचीवाडीमधील अंतर्गत राजकीय दुफळीची किनारही आहे. (वार्ताहर)ग्रामस्थांचा पुढाकार : प्रश्न ऐरणीवरपंधरा दिवसांपूर्वी मसुचीवाडीतील एका मुलीची बोरगाव बसस्थानक परिसरात छेड काढल्यावर या टोळक्यातील काहीजण हनुमान यात्रेनिमित्त तमाशा बघायला मसुचीवाडीत गेले. तेथेही या बोरगावच्या टोळक्याकडून कुरापती सुरू राहिल्याने मसुचीवाडी ग्रामस्थांनी या टोळक्याला बदडून काढले. त्यानंतर या मारहाणीचा वचपा बोरगावकरांनी लगेच मसुचीवाडीतील एका युवकास चोप दिला. त्यानंतर हा प्रकार छेडछाडीच्या स्वरूपात पोलिसांसमोर आला. मसुचीवाडी ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा घेत मुलींच्या छेडछाडीचा प्रश्न ऐरणीवर आणला. त्यानुसार आता पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे.भूमाता ब्रिगेड मसुचीवाडीमध्ये धडकणारशनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, कोल्हापूरची महालक्ष्मी अशा मंदिरांमध्ये महिलांच्या प्रवेशासाठी झगडून यश मिळवणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यासुद्धा मसुचीवाडीत भेट देऊन मुलींवरील अन्यायाविरुद्धच्या लढाईत उतरणार असल्याची चर्चा आहे. 

बोरगाव हे चांगले गाव आहे. त्यामुळे अशा टवाळखोरांना गावाचा पाठिंबा असू शकत नाही. मुलींची छेड काढली जाते, हे कायदा व सुव्यवस्थेला शोभणारे नाही. मुलींना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच ते बोरगावातील गावगुंडांचा बंदोबस्त करतील.- जयंत पाटील, आमदार 

मसुचीवाडीतील मुली गेल्या दोन वर्षापासून हा त्रास सोसत आहेत. टवाळखोरांना अटकाव करण्यात बोरगावच्या पदाधिकाऱ्यांना यश आले नाही. हा त्रास वाढतच राहिल्याने आम्ही मुलींना तेथील शाळा, महाविद्यालयातून काढण्याचा तसेच सर्व निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी याप्रकरणी ठोस कारवाई करून या छेडछाडीला कायमस्वरुपी आळा घालावा.- सुहास कदम, सरपंच, मसुचीवाडीबोरगावला सामाजिक, सांस्कृतिक ओळख आहे. एका-दोघांमुळे गावाची बदनामी करणे हे योग्य नाही. परिसरातील पाचही वाड्यांना टोकाची भूमिका घेण्यापेक्षा सामोपचाराने चर्चा करून मुलींना त्रास होणार नाही, यावर मार्ग काढता येईल.-विकास पाटील, उपसरपंच, बोरगाव