शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेची खात्री, पण ‘चमत्कारा’ची भीती

By admin | Updated: August 4, 2015 23:36 IST

जयंत पाटील : सांगली बाजार समितीच्या निवडणुकीबाबत मत

सांगली : सांगलीच्या बाजार समितीमध्ये आमच्याच पॅनेलची सत्ता येणार, याची खात्री असली तरी, त्यांच्या ‘चमत्कारा’ची भीतीही वाटते, असे मत आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील आर्थिक चमत्काराचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी काही ठिकाणी विशेष चमत्कार घडविले होते. तसे चमत्कार बाजार समितीच्या निवडणुकीत होतील की काय, अशी शंका वाटते. शेवटच्या दोन दिवसातच ते असे चमत्कार करीत असतात. त्यामुळे त्या गोष्टीकडे आमचे लक्ष राहील. सहकारी संस्थांच्या बरखास्तीचा जो निर्णय झाला, तो मंत्रिमंडळाशी संबंधित नाही. संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी तो निर्णय घेतला होता. त्यामुळे जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय मागे घेण्यास ते तयारच नव्हते. यासंदर्भात आर. आर. पाटील व आपण दोघांनी तक्रार केली होती. शेवटी त्यांनी जो निर्णय घेतला होता, तो पुढे रेटला. त्यामुळे संस्था बरखास्तीवेळी आम्ही गप्प बसलो होतो, हे विरोधकांचे विधान चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.कवठेमहांकाळ येथील पदाधिकाऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत विश्वासात घेतले नाही, म्हणून त्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांच्या या भावनेची आम्ही दखल घेतली आहे. त्यासंदर्भात नाराज कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चासुध्दा केली आहे. त्यांची नाराजी दूर होईल. नाराज लोक कोणत्याही दुसऱ्या पक्षाकडे जाणार नाहीत. तासगाव-कवठेमहांकाळमधील कार्यकर्त्यांच्या भावनांचा योग्य विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पक्षीय बळाचे गणित मांडले जात आहे. वास्तविक ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर कधीच लढविल्या जात नाहीत. त्यामुळे या निकालावरून आमच्या पक्षाची ताकद कमी झाल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)भावा-भावात भांडणे होतीआर. आर. पाटील यांना छोटा भाऊ मानणाऱ्या पतंगरावांनी छोट्या भावाचे कार्यकर्ते मोठ्या भावाकडेच येणार असल्याचे मत काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. त्यावर जयंतराव म्हणाले की, ते त्यांना भाऊ मानत असले तरी, भावा-भावात भांडणे होती म्हणून तर दोघे वेगवेगळ्या पक्षात राहिले. त्यामुळे या छोट्या भावाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे जातील, अशी कोणतीही चिन्हे नाहीत. आम्ही इतके दुबळे नाही...जिल्हास्तरीय संस्थांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित यायला हवे, असे मत काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आ. पतंगराव कदम यांनी व्यक्त केले होते. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करून लढण्याची गरज वाटत नाही. जिल्हास्तरीय निवडणुका त्यांना घेऊन लढविण्याइतपत आम्ही दुबळे नाही.