शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

सत्तेची खात्री, पण ‘चमत्कारा’ची भीती

By admin | Updated: August 4, 2015 23:36 IST

जयंत पाटील : सांगली बाजार समितीच्या निवडणुकीबाबत मत

सांगली : सांगलीच्या बाजार समितीमध्ये आमच्याच पॅनेलची सत्ता येणार, याची खात्री असली तरी, त्यांच्या ‘चमत्कारा’ची भीतीही वाटते, असे मत आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील आर्थिक चमत्काराचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी काही ठिकाणी विशेष चमत्कार घडविले होते. तसे चमत्कार बाजार समितीच्या निवडणुकीत होतील की काय, अशी शंका वाटते. शेवटच्या दोन दिवसातच ते असे चमत्कार करीत असतात. त्यामुळे त्या गोष्टीकडे आमचे लक्ष राहील. सहकारी संस्थांच्या बरखास्तीचा जो निर्णय झाला, तो मंत्रिमंडळाशी संबंधित नाही. संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी तो निर्णय घेतला होता. त्यामुळे जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय मागे घेण्यास ते तयारच नव्हते. यासंदर्भात आर. आर. पाटील व आपण दोघांनी तक्रार केली होती. शेवटी त्यांनी जो निर्णय घेतला होता, तो पुढे रेटला. त्यामुळे संस्था बरखास्तीवेळी आम्ही गप्प बसलो होतो, हे विरोधकांचे विधान चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.कवठेमहांकाळ येथील पदाधिकाऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत विश्वासात घेतले नाही, म्हणून त्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांच्या या भावनेची आम्ही दखल घेतली आहे. त्यासंदर्भात नाराज कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चासुध्दा केली आहे. त्यांची नाराजी दूर होईल. नाराज लोक कोणत्याही दुसऱ्या पक्षाकडे जाणार नाहीत. तासगाव-कवठेमहांकाळमधील कार्यकर्त्यांच्या भावनांचा योग्य विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पक्षीय बळाचे गणित मांडले जात आहे. वास्तविक ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर कधीच लढविल्या जात नाहीत. त्यामुळे या निकालावरून आमच्या पक्षाची ताकद कमी झाल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)भावा-भावात भांडणे होतीआर. आर. पाटील यांना छोटा भाऊ मानणाऱ्या पतंगरावांनी छोट्या भावाचे कार्यकर्ते मोठ्या भावाकडेच येणार असल्याचे मत काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. त्यावर जयंतराव म्हणाले की, ते त्यांना भाऊ मानत असले तरी, भावा-भावात भांडणे होती म्हणून तर दोघे वेगवेगळ्या पक्षात राहिले. त्यामुळे या छोट्या भावाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे जातील, अशी कोणतीही चिन्हे नाहीत. आम्ही इतके दुबळे नाही...जिल्हास्तरीय संस्थांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित यायला हवे, असे मत काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आ. पतंगराव कदम यांनी व्यक्त केले होते. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करून लढण्याची गरज वाटत नाही. जिल्हास्तरीय निवडणुका त्यांना घेऊन लढविण्याइतपत आम्ही दुबळे नाही.