शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘राजारामबापू’च्या कारंदवाडी युनिटमध्ये गाळप हंगामाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:25 IST

फोटो ओळ - कारंदवाडी (ता. वाळवा) येथील राजारामबापू साखर काखान्याच्या युनिटमध्ये गाळप हंगाम सांगता समारंभात ऊसतोडणी मुकादम, वाहतूक कंत्राटदार ...

फोटो ओळ - कारंदवाडी (ता. वाळवा) येथील राजारामबापू साखर काखान्याच्या युनिटमध्ये गाळप हंगाम सांगता समारंभात ऊसतोडणी मुकादम, वाहतूक कंत्राटदार व अधिकाऱ्यांचा एल. बी. माळी यांनी सत्कार केला. यावेळी विजयबापू पाटील, विराज शिंदे, श्रेणीक कबाडे, प्रदीपकुमार पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : कोरोना संकटामुळे इतर क्षेत्राप्रमाणे साखर उद्योगही संकटांचा सामना करीत आहे. तरीही राजारामबापू कारखाना कारंदवाडी युनिटमध्ये तीन लाख ८३ हजार टन उसाचे गाळप केले आहे. हे सांघिक कष्टाचे फळ आहे, असा विश्वास ज्येष्ठ संचालक, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी एल. बी. माळी यांनी व्यक्त केला.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिटच्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, संचालक विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, माणिक शेळके, प्रदीपकुमार पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, जनरल मॅनेजर एस. डी. कोरडे उपस्थित होते.

एल. बी. माळी म्हणाले, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आपण कारंदवाडी युनिटमध्ये १३४ दिवसांत ३ लाख ८३ हजार ६५३ टन उसाचे गाळप केले. यात ४ लाख ८८ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले. सरासरी साखर उतारा १२.७० टक्के इतका मिळाला आहे.

विजयबापू पाटील म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात काही शेतकऱ्यांनी आपला ऊस इतरत्र दिला आहे. अन्यथा आपल्या या युनिटचे गाळप निश्चितच वाढले असते.

संचालक श्रेणिक कबाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक विराज शिंदे यांनी आभार मानले.

नगरसेवक विजय मोरे, दीपक मेथे, विजय मोरे, प्रशांत पाटील, व्ही. बी. पाटील, रणजित पाटील, उमेश पाटील, संग्राम पाटील, श्रीधर चव्हाण, बाबासाहेब चौगुले, सुशील भंडारे, सुधाकर पाटील, प्रताप गुरव उपस्थित होते.