शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

दहावीच्या टक्केवारीच्या महापुरात अकरावी प्रवेशाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अकरावी प्रवेशासाठी सीईटी रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अकरावी प्रवेशासाठी सीईटी रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता महाविद्यालयांनी व्यक्त केली आहे. दहावीचा निकाल उच्चांकी लागल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागणार आहेत. या स्थितीत अनेक विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.

दहावी निकालाची टक्केवारी वाढल्याने अकरावीसाठी प्रवेशेच्छुकांचा महापूर येणार आहे. आयटीआय, डिप्लोमासह अन्य काही विद्या शाखा उपलब्ध असल्या तरी अकरावीनंतर पदवीकडे वळणाऱ्यांची संख्या खूपच आहे. दहावीत ९० ते ९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनीही अकरावीकडेच मोर्चा वळवला आहे. त्यामुळे कमी गुणांचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत तळाला राहणार आहेत. नाईलाजाने त्यांना अन्य शिक्षणक्रमांकडे वळावे लागेल. या स्थितीत अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया घ्यावी, असा सूर पालकांतून व्यक्त होत आहे. सीईटी रद्द केल्याने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

पॉईंटर्स

१ दहावी उत्तीर्ण विद्यार्थी - ४०,८३५

- अकरावीची प्रवेश क्षमता - ४३,७४०

२ कोणत्या शाखेत किती जागा

- कला १६,६००, वाणिज्य ७,२६०, विज्ञान १७,३८०

बॉक्स

महाविद्यालयांचा कट ऑफ वाढणार

सर्रास विद्यार्थ्यांना दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी या गुणवंतांमुळेच भरणार आहे. साहजिकच महाविद्यालयांचा कट ऑफ वाढण्याची चिन्हे आहेत. एरवी डिप्लोमाचा कट ऑफ ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत असायचा. यंदा अकरावीसाठी तो दिसला तर आश्चर्य नसावे.

कोट

दहावीत चांगले गुण मिळाल्याचा आनंद होता, पण आता अकरावीसाठी गर्दी होणार असल्याने चिंता लागून राहिली आहे. ९३ टक्के गुण असूनही अकरावी मिळेल की नाही याची शंका आहे.

- प्राजक्ता चिंचकर, विद्यार्थिनी, सांगली.

अकरावीसाठी सीईटीची तयारी सुरू केली होती. चांगल्या गुणांसह अकरावी सायन्सला प्रवेश घ्यायचा होता. आता सीईटीअभावी दहावीच्या गुणांवर चांगले महाविद्यालय मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- सुजय खैरमोडे, विद्यार्थी, मिरज.

कोट

कमी गुणवंतांवर आर्थिक बोजा पडण्याची शक्यता

दहावीला गुणांची टक्केवारी अधिक राहिल्याने गुणवत्ता यादी वाढणार आहे. गुणवंत विद्यार्थी अनुदानित तुकड्यांत सामावले जातील. कमी गुणवंतांना विनाअनुदानित तुकड्यांत प्रवेश घ्यावा लागेल. परिणामी त्यांना प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क भरावे लागेल. यामध्ये शासनाने योग्य तोडगा काढावा. सर्व विद्यार्थ्यांना पैशांशिवाय अकरावीला प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी योजना तयार करावी. प्रवेश शुल्काविषयी आराखडा तयार करावा. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत, मार्गदर्शन येताच त्यानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल.

- डॉ. भास्कर ताम्हणकर, प्राचार्य, विलिंग्डन महाविद्यालय, सांगली.