शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या टक्केवारीच्या महापुरात अकरावी प्रवेशाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अकरावी प्रवेशासाठी सीईटी रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अकरावी प्रवेशासाठी सीईटी रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता महाविद्यालयांनी व्यक्त केली आहे. दहावीचा निकाल उच्चांकी लागल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागणार आहेत. या स्थितीत अनेक विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.

दहावी निकालाची टक्केवारी वाढल्याने अकरावीसाठी प्रवेशेच्छुकांचा महापूर येणार आहे. आयटीआय, डिप्लोमासह अन्य काही विद्या शाखा उपलब्ध असल्या तरी अकरावीनंतर पदवीकडे वळणाऱ्यांची संख्या खूपच आहे. दहावीत ९० ते ९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनीही अकरावीकडेच मोर्चा वळवला आहे. त्यामुळे कमी गुणांचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत तळाला राहणार आहेत. नाईलाजाने त्यांना अन्य शिक्षणक्रमांकडे वळावे लागेल. या स्थितीत अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया घ्यावी, असा सूर पालकांतून व्यक्त होत आहे. सीईटी रद्द केल्याने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

पॉईंटर्स

१ दहावी उत्तीर्ण विद्यार्थी - ४०,८३५

- अकरावीची प्रवेश क्षमता - ४३,७४०

२ कोणत्या शाखेत किती जागा

- कला १६,६००, वाणिज्य ७,२६०, विज्ञान १७,३८०

बॉक्स

महाविद्यालयांचा कट ऑफ वाढणार

सर्रास विद्यार्थ्यांना दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी या गुणवंतांमुळेच भरणार आहे. साहजिकच महाविद्यालयांचा कट ऑफ वाढण्याची चिन्हे आहेत. एरवी डिप्लोमाचा कट ऑफ ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत असायचा. यंदा अकरावीसाठी तो दिसला तर आश्चर्य नसावे.

कोट

दहावीत चांगले गुण मिळाल्याचा आनंद होता, पण आता अकरावीसाठी गर्दी होणार असल्याने चिंता लागून राहिली आहे. ९३ टक्के गुण असूनही अकरावी मिळेल की नाही याची शंका आहे.

- प्राजक्ता चिंचकर, विद्यार्थिनी, सांगली.

अकरावीसाठी सीईटीची तयारी सुरू केली होती. चांगल्या गुणांसह अकरावी सायन्सला प्रवेश घ्यायचा होता. आता सीईटीअभावी दहावीच्या गुणांवर चांगले महाविद्यालय मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- सुजय खैरमोडे, विद्यार्थी, मिरज.

कोट

कमी गुणवंतांवर आर्थिक बोजा पडण्याची शक्यता

दहावीला गुणांची टक्केवारी अधिक राहिल्याने गुणवत्ता यादी वाढणार आहे. गुणवंत विद्यार्थी अनुदानित तुकड्यांत सामावले जातील. कमी गुणवंतांना विनाअनुदानित तुकड्यांत प्रवेश घ्यावा लागेल. परिणामी त्यांना प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क भरावे लागेल. यामध्ये शासनाने योग्य तोडगा काढावा. सर्व विद्यार्थ्यांना पैशांशिवाय अकरावीला प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी योजना तयार करावी. प्रवेश शुल्काविषयी आराखडा तयार करावा. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत, मार्गदर्शन येताच त्यानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल.

- डॉ. भास्कर ताम्हणकर, प्राचार्य, विलिंग्डन महाविद्यालय, सांगली.