शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा काँगे्रससमोर सक्षम नेतृत्वाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:39 IST

सांगली : पतंगराव कदम यांच्या निधनानंतर सांगली जिल्हा काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून, प्रमुख पदाधिकाºयांमधून आता सक्षम नेतृत्वाची चिंता व्यक्त केली जात आहे. गत महापालिका निवडणुकीत पतंगरावांमुळे काँग्रेसच्या पदरात मोठे यश पडले होते. सध्या महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू असतानाच, पतंगरावांच्या निधनामुळे पक्षाला हादरा बसला आहे.महापालिकेच्या २0१३ च्या निवडणुकीत पतंगराव कदम प्रथमच ...

सांगली : पतंगराव कदम यांच्या निधनानंतर सांगली जिल्हा काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून, प्रमुख पदाधिकाºयांमधून आता सक्षम नेतृत्वाची चिंता व्यक्त केली जात आहे. गत महापालिका निवडणुकीत पतंगरावांमुळे काँग्रेसच्या पदरात मोठे यश पडले होते. सध्या महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू असतानाच, पतंगरावांच्या निधनामुळे पक्षाला हादरा बसला आहे.महापालिकेच्या २0१३ च्या निवडणुकीत पतंगराव कदम प्रथमच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या बहुतांश प्रभागात फिरले होते. उमेदवार असलेल्या आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांनासुद्धा त्यांनी पाठबळ दिले होते. तिन्ही शहरातील नागरिकांनी पतंगरावांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसला एकहाती सत्ता सोपविली. तिकीट वाटपाची जबाबदारी मदन पाटील यांच्यावर सोपविली होती, तरी प्रचाराची संपूर्ण धुरा पतंगरावांनी सांभाळली होती. महापालिकेतील यशानंतर विधानसभेतही त्यांचे अभिनंदन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्षांपासून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांचे कौतुक केले होते.महापालिकेची यंदाची निवडणूक जुलै महिन्यात होणार आहे. त्याची तयारी आता सुरू झाली आहे. ही निवडणूकसुद्धा पतंगरावांच्या नेतृत्वाखालीच लढविण्याचा निर्धार पदाधिकारी व नेत्यांनी केला होता. आघाडी करायची की स्वतंत्र लढायचे, याचे अधिकारही पतंगरावांनाच दिले होते. अनेक इच्छुकांचीही सारी मदार पतंगरावांवर होती. एकीकडे काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली असतानाच पतंगरावांचे निधन झाले. ही घटना काँग्रेससाठी हादरा देणारी ठरली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांमध्ये याच गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे. मदन पाटील यांच्यानंतर केवळ पतंगरावच महापालिका क्षेत्रातील काँग्रेसला ताकद देऊ शकले असते. आता मदन पाटील यांच्यापाठोपाठ पतंगरावांचेही निधन झाल्याने नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पक्षाच्या नियोजनातही विस्कळीतपणा येण्याची दाट शक्यता आहे. विरोधी पक्षांकडे ताकदीचे नेते असल्यामुळे सक्षम नेतृत्वाअभावी काँग्रेसचे काय होणार, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.पक्षात दुसºया फळीतील नेत्यांकडे अनुभवाची कमतरता आहे. दुसºया फळीतील नेत्यांचीही मदार पतंगरावांवरच अधिक होती. त्यामुळे दुसºया फळीतील नेत्यांमध्येही हीच अस्वस्थता दिसून येत आहे. महापालिकेच्या इतिहासात, आजवर निवडणुकांचा काळ आला की पक्षांतर्गत मतभेद, रुसवा-फुगवीचा खेळ नेहमीच होतो. अशावेळी कार्यकर्त्यांना शांत करून खंबीरपणे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणारे नेतृत्व कामी येत राहिले. आता तशी भूमिका बजावणारे नेतृत्व नाही. जे नेते आहेत, त्यांच्याकडे महापालिका निवडणुकीचा अनुभव फारसा नाही.गटबाजीचे आव्हानमहापालिकेच्या राजकारणात काँग्रेसला नेहमीच गटबाजीची चिंता सतावत राहिली. कडेगावला एका बैठकीत सर्व नगरसेवकांची पतंगरावांनी याच गटबाजीबद्दल कानउघाडणी केली होती. त्यानंतर महापालिकेतील चित्र काही काळ बदलले होते. पतंगरावांचा आदेश दोन्ही गटातील नगरसेवक मानत होते. आता हा समन्वय साधणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.