शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा काँगे्रससमोर सक्षम नेतृत्वाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:39 IST

सांगली : पतंगराव कदम यांच्या निधनानंतर सांगली जिल्हा काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून, प्रमुख पदाधिकाºयांमधून आता सक्षम नेतृत्वाची चिंता व्यक्त केली जात आहे. गत महापालिका निवडणुकीत पतंगरावांमुळे काँग्रेसच्या पदरात मोठे यश पडले होते. सध्या महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू असतानाच, पतंगरावांच्या निधनामुळे पक्षाला हादरा बसला आहे.महापालिकेच्या २0१३ च्या निवडणुकीत पतंगराव कदम प्रथमच ...

सांगली : पतंगराव कदम यांच्या निधनानंतर सांगली जिल्हा काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून, प्रमुख पदाधिकाºयांमधून आता सक्षम नेतृत्वाची चिंता व्यक्त केली जात आहे. गत महापालिका निवडणुकीत पतंगरावांमुळे काँग्रेसच्या पदरात मोठे यश पडले होते. सध्या महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू असतानाच, पतंगरावांच्या निधनामुळे पक्षाला हादरा बसला आहे.महापालिकेच्या २0१३ च्या निवडणुकीत पतंगराव कदम प्रथमच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या बहुतांश प्रभागात फिरले होते. उमेदवार असलेल्या आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांनासुद्धा त्यांनी पाठबळ दिले होते. तिन्ही शहरातील नागरिकांनी पतंगरावांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसला एकहाती सत्ता सोपविली. तिकीट वाटपाची जबाबदारी मदन पाटील यांच्यावर सोपविली होती, तरी प्रचाराची संपूर्ण धुरा पतंगरावांनी सांभाळली होती. महापालिकेतील यशानंतर विधानसभेतही त्यांचे अभिनंदन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्षांपासून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांचे कौतुक केले होते.महापालिकेची यंदाची निवडणूक जुलै महिन्यात होणार आहे. त्याची तयारी आता सुरू झाली आहे. ही निवडणूकसुद्धा पतंगरावांच्या नेतृत्वाखालीच लढविण्याचा निर्धार पदाधिकारी व नेत्यांनी केला होता. आघाडी करायची की स्वतंत्र लढायचे, याचे अधिकारही पतंगरावांनाच दिले होते. अनेक इच्छुकांचीही सारी मदार पतंगरावांवर होती. एकीकडे काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली असतानाच पतंगरावांचे निधन झाले. ही घटना काँग्रेससाठी हादरा देणारी ठरली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांमध्ये याच गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे. मदन पाटील यांच्यानंतर केवळ पतंगरावच महापालिका क्षेत्रातील काँग्रेसला ताकद देऊ शकले असते. आता मदन पाटील यांच्यापाठोपाठ पतंगरावांचेही निधन झाल्याने नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पक्षाच्या नियोजनातही विस्कळीतपणा येण्याची दाट शक्यता आहे. विरोधी पक्षांकडे ताकदीचे नेते असल्यामुळे सक्षम नेतृत्वाअभावी काँग्रेसचे काय होणार, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.पक्षात दुसºया फळीतील नेत्यांकडे अनुभवाची कमतरता आहे. दुसºया फळीतील नेत्यांचीही मदार पतंगरावांवरच अधिक होती. त्यामुळे दुसºया फळीतील नेत्यांमध्येही हीच अस्वस्थता दिसून येत आहे. महापालिकेच्या इतिहासात, आजवर निवडणुकांचा काळ आला की पक्षांतर्गत मतभेद, रुसवा-फुगवीचा खेळ नेहमीच होतो. अशावेळी कार्यकर्त्यांना शांत करून खंबीरपणे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणारे नेतृत्व कामी येत राहिले. आता तशी भूमिका बजावणारे नेतृत्व नाही. जे नेते आहेत, त्यांच्याकडे महापालिका निवडणुकीचा अनुभव फारसा नाही.गटबाजीचे आव्हानमहापालिकेच्या राजकारणात काँग्रेसला नेहमीच गटबाजीची चिंता सतावत राहिली. कडेगावला एका बैठकीत सर्व नगरसेवकांची पतंगरावांनी याच गटबाजीबद्दल कानउघाडणी केली होती. त्यानंतर महापालिकेतील चित्र काही काळ बदलले होते. पतंगरावांचा आदेश दोन्ही गटातील नगरसेवक मानत होते. आता हा समन्वय साधणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.