शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

लोकसभा, विधानसभेसाठी आघाडीत तडजोडीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:25 IST

सांगली : लोकसभा, विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीमार्फत लढविण्याची चिन्हे दिसत असतानाच, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जागाबदलाच्या चर्चांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली लोकसभा मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यांतर्गत विधानसभेच्या जागांची अदलाबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेवेळी सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या लोकसभेच्या जागेची मागणी व्यक्त केली होती. दुसरीकडे जत विधानसभा मतदारसंघाची ...

सांगली : लोकसभा, विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीमार्फत लढविण्याची चिन्हे दिसत असतानाच, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जागाबदलाच्या चर्चांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली लोकसभा मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यांतर्गत विधानसभेच्या जागांची अदलाबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेवेळी सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या लोकसभेच्या जागेची मागणी व्यक्त केली होती. दुसरीकडे जत विधानसभा मतदारसंघाची जागाही काँग्रेस नेत्यांनी आपल्याकडे राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितल्यामुळे, दोन्ही निवडणुकांसाठी जागांची अदलाबदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सतेज पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार राष्टÑवादीकडील कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाली, तर काँग्रेसकडील सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा राष्टÑवादी मागू शकते. मात्र, काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून अशा प्रकारच्या मागणीला तीव्र विरोध होऊ शकतो. त्याचप्रकारच्या विरोधाचा सामना कोल्हापुरातही करावा लागणार आहे. त्यामुळे मागण्या व चर्चांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मतदारसंघातील इच्छुक उमेदवार व पक्षाचे प्रमुख नेते सावध झाले आहेत.जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी थेट काँग्रेस पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले. त्यामुळे या जागेवरील काँग्रेसची दावेदारी आक्रमकपणे होताना दिसत आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांनी जतच्या जागेच्या बदल्यात मिरज विधानसभेची जागा राष्टÑवादीला देण्याचा प्रस्ताव मांडल्याचे समजते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील काँगे्रस व राष्टÑवादीचे इच्छुक, पदाधिकारी व कार्यकर्ते सतर्क झाले आहेत. पक्षीय नेत्यांचा निर्णय अंतिम राहणार असला तरी, विरोध व संघर्षाची चिन्हे यानिमित्ताने दिसत आहेत. जागांची अदलाबदल केवळ या चार मतदारसंघांपुरतीच राहणार नसून, अन्य मतदारसंघातही अशाचप्रकारच्या चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत. निवडणुका लांब असल्या तरी, आतापासूनच आघाडीतील नेत्यांनी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जयंत पाटील : सामंजस्याने निर्णय घेणारसांगलीत जयंत पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षात राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे ज्याठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल, त्याठिकाणची जागा मित्रपक्षाला सोडण्याबाबत विचार होईल. याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. तरीही भविष्यात याबाबत सामंजस्याने, निवडून येण्याची क्षमता व परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतले जातील.आघाडी गृहीत धरून सूचना!काँग्रेस व राष्टÑवादी या दोन्ही प्रमुख पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी लोकसभा, विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना, निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी, त्यांनी आघाडी होणार असल्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे आघाडीबाबत आग्रही असलेल्या या दोन्ही नेत्यांकडून ऐनवेळी जागांची अदलाबदल करून आघाडीच्या चर्चा यशस्वी केल्या जाऊ शकतात.