शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

ठेकेदार, कार्यकारी अभियंत्याविरुद्ध तक्रार; गुन्हाच दाखल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:16 IST

सांगली : महापालिकेच्या कोल्हापूर रस्त्यावरील मलनिस्सारण केंद्रात सफाईचे काम करताना अभियंत्यासह दोघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने ठाण्यातील मे. एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीचे श्रीकांत शंकर बुटालासह महाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पण, या घटनेला २४ तास होऊन गेले तरी पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल ...

सांगली : महापालिकेच्या कोल्हापूर रस्त्यावरील मलनिस्सारण केंद्रात सफाईचे काम करताना अभियंत्यासह दोघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने ठाण्यातील मे. एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीचे श्रीकांत शंकर बुटालासह महाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पण, या घटनेला २४ तास होऊन गेले तरी पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही.कोल्हापूर रस्त्यावरील जोतिरामदादा कुस्ती आखाड्याजवळ पालिकेच्या ड्रेनेज योजनेंतर्गत मलनिस्सारण केंद्र आहे. शनिवारी दुपारी या योजनेच्या प्रकल्पातील पंचवीस ते तीस फूट इंटकवेलची (विहिरीची) स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी विठ्ठल शेरेकर यांनी झाकण उघडले, त्यावेळी आतून विषारी वायू बाहेर पडल्याने शेरेकर बेशुद्ध होऊन विहिरीत पडले. हा प्रकार पाहून उमाकांत देशपांडे त्यांना वाचविण्यासाठी विहिरीत उतरले. पण एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही गुदमरुन मृत्यू झाला, तर दोन कर्मचाऱ्यांना वाचविण्यात यश आले होते. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी, याप्रकरणी चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार पालिका प्रशासनातर्फे पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी रविवारी शहर पोलिसांत ठाण्याच्या एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे ठेकेदार श्रीकांत बुटालासह महाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध तक्रार दिली आहे.तक्रारीत म्हटले आहे की, महापालिका क्षेत्रात सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत भुयारी गटारीसह अन्य कामे करण्याचा ठेका एसएमसी कंपनीला दिला आहे. यासंदर्भात पालिकेने या कंपनीशी करारही केला आहे. त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी तांत्रिक सेवा सल्लागार म्हणून महाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती केली आहे. मलनिस्सारण केंद्रात कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्याकडून कामावर देखरेख न झाल्याने उमाकांत देशपांडे व विठ्ठल शेरेकर यांचा बळी गेला आहे. त्यामुळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करावा.गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ !मलनिस्सारण केंद्रात दोघांचा बळी गेला. पालिकेने फिर्याद देऊनही शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रविवारी दिवसभरात पूर्ण केली नाही. पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता ठाणे अंमलदारांनी, अजून गुन्हा दाखल नाही, असे सांगितले. तसेच अधिकाºयांनी कोणते कलम लावायचे, हे पाहून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले.