शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

ठेकेदार, कार्यकारी अभियंत्याविरुद्ध तक्रार; गुन्हाच दाखल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:16 IST

सांगली : महापालिकेच्या कोल्हापूर रस्त्यावरील मलनिस्सारण केंद्रात सफाईचे काम करताना अभियंत्यासह दोघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने ठाण्यातील मे. एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीचे श्रीकांत शंकर बुटालासह महाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पण, या घटनेला २४ तास होऊन गेले तरी पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल ...

सांगली : महापालिकेच्या कोल्हापूर रस्त्यावरील मलनिस्सारण केंद्रात सफाईचे काम करताना अभियंत्यासह दोघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने ठाण्यातील मे. एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीचे श्रीकांत शंकर बुटालासह महाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पण, या घटनेला २४ तास होऊन गेले तरी पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही.कोल्हापूर रस्त्यावरील जोतिरामदादा कुस्ती आखाड्याजवळ पालिकेच्या ड्रेनेज योजनेंतर्गत मलनिस्सारण केंद्र आहे. शनिवारी दुपारी या योजनेच्या प्रकल्पातील पंचवीस ते तीस फूट इंटकवेलची (विहिरीची) स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी विठ्ठल शेरेकर यांनी झाकण उघडले, त्यावेळी आतून विषारी वायू बाहेर पडल्याने शेरेकर बेशुद्ध होऊन विहिरीत पडले. हा प्रकार पाहून उमाकांत देशपांडे त्यांना वाचविण्यासाठी विहिरीत उतरले. पण एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही गुदमरुन मृत्यू झाला, तर दोन कर्मचाऱ्यांना वाचविण्यात यश आले होते. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी, याप्रकरणी चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार पालिका प्रशासनातर्फे पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी रविवारी शहर पोलिसांत ठाण्याच्या एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे ठेकेदार श्रीकांत बुटालासह महाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध तक्रार दिली आहे.तक्रारीत म्हटले आहे की, महापालिका क्षेत्रात सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत भुयारी गटारीसह अन्य कामे करण्याचा ठेका एसएमसी कंपनीला दिला आहे. यासंदर्भात पालिकेने या कंपनीशी करारही केला आहे. त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी तांत्रिक सेवा सल्लागार म्हणून महाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती केली आहे. मलनिस्सारण केंद्रात कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्याकडून कामावर देखरेख न झाल्याने उमाकांत देशपांडे व विठ्ठल शेरेकर यांचा बळी गेला आहे. त्यामुळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करावा.गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ !मलनिस्सारण केंद्रात दोघांचा बळी गेला. पालिकेने फिर्याद देऊनही शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रविवारी दिवसभरात पूर्ण केली नाही. पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता ठाणे अंमलदारांनी, अजून गुन्हा दाखल नाही, असे सांगितले. तसेच अधिकाºयांनी कोणते कलम लावायचे, हे पाहून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले.