शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

सामान्य माणूस हाच नागनाथअण्णांचे बलस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST

फोटो ओळी : क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णांच्या शतकमहोत्सवी जयंती कार्यक्रमाच्या प्रारंभदिनी ऑनलाईन सभेत प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी मार्गदर्शन केले. ...

फोटो ओळी : क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णांच्या शतकमहोत्सवी जयंती कार्यक्रमाच्या प्रारंभदिनी ऑनलाईन सभेत प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वैभव नायकवडी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाळवा : आकाशाला गवसणी घालणाऱ्या नागनाथअण्णांचे बलस्थान हे सामान्य माणूस होते. हे महान व्यक्तिमत्त्व वाळव्यासारख्या भूमीत जन्मले, हे इथल्या जनतेचे भाग्यच होय, असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे उपसभापती प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी शुक्रवारी केले.

क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या शतकमहोत्सवी जयंती कार्यक्रमाचा प्रारंभ ऑनलाईन सभेने झाला. यावेळी ते बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी वैभव नायकवडी होते. यावेळी प्रा. राजा माळगी, प्रा. आनंदराव शिंदे, मुख्याध्यापक एस. एस. खणदाळे, मुख्याध्यापिका विद्या चेंडके, मधुकर वायदंडे, प्रा. एस. आर. पाटील प्रमुख उपस्थित होते.

बाळासाहेब नायकवडी म्हणाले, १३ तालुक्यांतील फाटक्या लोकांना संघटित करून नागनाथअण्णांनी दुष्काळी तालुक्यातील गावांना कृष्णा नदीचे पाणी मिळवून दिले.

वैभव नायकवडी म्हणाले, नागनाथअण्णा हे एक व्यक्ती नसून विचार होते. त्यांनी सत्तेचे राजकारण करण्यापेक्षा गोरगरिबांचे समाजकारण करणे स्वीकारले. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. पुढच्या पिढीला नागनाथअण्णा हे काय रसायन होते हे समजावून देणे महत्त्वाचे आहे. प्रा. एस. आर. पाटील यांचे भाषण झाले. प्रा. राजा माळगी यांनी स्वागत केले. प्रा. के. बी. पाटील व श्रीधर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.