शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आयुक्तांविरुद्ध फौजदारी

By admin | Updated: November 27, 2014 23:53 IST

गॅस्ट्रो प्रकरण : जिल्हा सुधार समितीची न्यायालयात धाव

मिरज : मिरजेत गॅस्ट्रोच्या साथीने नऊजणांचा बळी गेल्याबद्दल महापालिका आयुक्तांवर जिल्हा सुधार समितीने न्यायालयात फौजदारी दाखल केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांनी याप्रकरणी दि. ९ रोजी आयुक्तांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मिरज शहरात गेल्या आठ दिवसांपासून दूषित पाणीपुरवठ्यामुळे गॅस्ट्रोच्या साथीचे थैमान सुरु आहे. अतिसारामुळे नऊ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या प्रकाराला केवळ महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करून जिल्हा सुधार समितीचे प्रा. आर. बी. शिंदे व धनंजय भिसे यांनी अ‍ॅड. अमित शिंदे, अ‍ॅड. बशीर मुलाणी, अ‍ॅड. मंजुनाथ पाटील यांच्यामार्फत आयुक्त अजिज कारचे यांच्याविरूध्द मिरज न्यायालयात फौजदारी दाखल करून, आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महापालिका प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. मात्र महापालिका क्षेत्रात अस्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने गॅस्ट्रोची साथ पसरलेली आहे. मिरजेतील जलवाहिनी १९५० मध्ये बसवली आहे. या जलवाहिन्यांची मुदत १९९० मध्ये संपली आहे. मात्र त्यानंतरही या जीर्ण झालेल्या जलवाहिन्या पाणीपुरवठ्यासाठी वापरात आहेत. सांडपाणी वाहिन्यांची मुदत १९९९ मध्ये संपली आहे. यामुळे आरोग्यास धोकादायक असलेले सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळून शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या दाव्याप्रकरणी ९ डिसेंबर रोेजी आयुक्तांनी हजर राहून म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (वार्ताहर)नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूतमहापालिकेच्या या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांच्या झालेल्या मृत्यूला महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप सुधार समितीने केला आहे. महापालिकेच्या कारभारास आयुक्त अजिज कारचे हे जबाबदार असल्याने त्यांच्यावर फौजदारी दाखल करून, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.