शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

राज्याच्या सत्ताकारणाने बदलले सांगली जिल्ह्याचे रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 00:54 IST

सांगली : राज्याच्या बदललेल्या सत्ताकारणाचा मोठा परिणाम सांगली जिल्ह्यातील राजकारणावर मंगळवारी दिसून आला. आनंदोत्सवात असणाऱ्या भाजपच्या गोटात सत्ता गेल्यानंतर ...

सांगली : राज्याच्या बदललेल्या सत्ताकारणाचा मोठा परिणाम सांगली जिल्ह्यातील राजकारणावर मंगळवारी दिसून आला. आनंदोत्सवात असणाऱ्या भाजपच्या गोटात सत्ता गेल्यानंतर अस्वस्थता पसरली, तर अस्वस्थ असलेल्या कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेनेच्या गोटात आनंदोत्सवाला उधाण आले. दुसरीकडे मंत्रिपदाच्या शर्यतीतही अनेक चेहरे चर्चेत आल्याने जिल्ह्याचे लक्ष आता नव्या सरकार स्थापनेकडे लागले आहे.तीन दिवसांपूर्वी भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात जल्लोष केला होता. गेल्या तीन दिवसांपासून भाजपच्या कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. पण मंगळवारी सत्तेवरून भाजपला पायउतार व्हावे लागल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय रंग बदलले. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्येची लाट पसरली. भाजपच्या काही आमदारांनी मंत्रिपदासाठी फिल्डिंगही लावली होती. त्यामुळे त्यांनी मुंबईत ठाण मांडले होते. त्यांच्या मनसुब्यांवर पाणी पडले. त्यामुळे भाजपचे आमदार व प्रमुख पदाधिकारी मंगळवारी रात्रीच सांगलीला परतले. गेली पाच वर्षे सत्तास्थानी असलेल्या येथील आमदार व पदाधिकाऱ्यांच्या निकटवर्तीयांनाही राज्यातील घडामोडींनी अस्वस्थ केल्याचे दिसत होते.दुसरीकडे राष्टÑवादी, कॉँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत ठाण मांडले होते. तिन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील या तिन्ही पक्षांच्या कार्यालयातील वर्दळ वाढली असून, आनंदोत्सवाला उधाण आले आहे.अचानक काही तासातच जिल्ह्याचे राजकीय रंग बदलले. येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तसेच विविध संस्थांमधील समीकरणेही बदलणार आहेत. जिल्ह्यात गेली पाच वर्षे युती म्हणून कार्यरत असलेल्या या दोन्ही पक्षांमध्ये आता उघड संघर्ष होणार आहे. राज्यात सत्ताबदल होत असताना जिल्ह्यातील बदलणाºया समीकरणांनी सध्या वातावरण ढवळून निघाले आहे.जिल्ह्याचे वजन : वाढणारकित्येक वर्षे राज्याच्या राजकारणाचे जिल्ह्याने नेतृत्व केले. महत्त्वाची मंत्रिपदे जिल्ह्याच्या वाट्याला आली होती. कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या येथील नेत्यांना नेहमीच सत्तेत मोठा वाटा मिळत राहिला होता. भाजपच्या गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात जिल्ह्याला मंत्रिपदासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली होती. सुरुवातीला सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून कृषी राज्यमंत्रिपद आणि नंतर निवडणुकीपूर्वी अवघ्या काही दिवसांपूर्वी सुरेश खाडे यांना समाजकल्याण मंत्रिपद मिळाले होते. आता नव्या सरकारच्या काळात उपमुख्यमंत्रिपदासह काही महत्त्वाची खाते जिल्ह्याच्या वाट्याला येण्याची चिन्हे आहेत.जिल्हा केंद्रस्थानीराज्याच्या सत्ताकारणात राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ नेते जयंत पाटील यांच्या माध्यमातून सांगली जिल्हा केंद्रस्थानी राहिला. आता उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतही जयंत पाटील असल्याने त्यानिमित्तानेही नव्या सरकारमध्ये सांगली जिल्हा महत्त्वाच्या स्थानी राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादी व कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.महामंडळही जाणारजिल्ह्यात खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे असलेले कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदही जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या पदरी निराशा येणार आहे. विविध महामंडळांवर येथील नेत्यांच्या केलेल्या नियुक्त्याही रद्द होणार असून, त्याजागी जिल्ह्यातील राष्टÑवादी, कॉँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत.दोन्ही भावी उपमुख्यमंत्री जिल्ह्याशी संबंधितराज्यातील नव्या सरकारमध्ये राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. हे दोन्ही नेते जिल्ह्याशी व विशेषत: वाळवा तालुक्याशी संबंधित आहेत. जयंत पाटील यांचा मतदारसंघ इस्लामपूर आहे, तर बाळासाहेब थोरात हे तालुक्यातील तांबवे या गावचे जावई आहेत. राजारामबापू दूध संघाचे माजी संचालक नेताजी पाटील हे त्यांचे मेहुणे आहेत. त्यामुळे जिल्ह्याला व वाळव्याला दोन उपमुख्यमंत्रीपदे मिळाल्याचा आनंद येथील राष्टÑवादीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.