शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

राज्याच्या सत्ताकारणाने बदलले सांगली जिल्ह्याचे रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 00:54 IST

सांगली : राज्याच्या बदललेल्या सत्ताकारणाचा मोठा परिणाम सांगली जिल्ह्यातील राजकारणावर मंगळवारी दिसून आला. आनंदोत्सवात असणाऱ्या भाजपच्या गोटात सत्ता गेल्यानंतर ...

सांगली : राज्याच्या बदललेल्या सत्ताकारणाचा मोठा परिणाम सांगली जिल्ह्यातील राजकारणावर मंगळवारी दिसून आला. आनंदोत्सवात असणाऱ्या भाजपच्या गोटात सत्ता गेल्यानंतर अस्वस्थता पसरली, तर अस्वस्थ असलेल्या कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेनेच्या गोटात आनंदोत्सवाला उधाण आले. दुसरीकडे मंत्रिपदाच्या शर्यतीतही अनेक चेहरे चर्चेत आल्याने जिल्ह्याचे लक्ष आता नव्या सरकार स्थापनेकडे लागले आहे.तीन दिवसांपूर्वी भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात जल्लोष केला होता. गेल्या तीन दिवसांपासून भाजपच्या कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. पण मंगळवारी सत्तेवरून भाजपला पायउतार व्हावे लागल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय रंग बदलले. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्येची लाट पसरली. भाजपच्या काही आमदारांनी मंत्रिपदासाठी फिल्डिंगही लावली होती. त्यामुळे त्यांनी मुंबईत ठाण मांडले होते. त्यांच्या मनसुब्यांवर पाणी पडले. त्यामुळे भाजपचे आमदार व प्रमुख पदाधिकारी मंगळवारी रात्रीच सांगलीला परतले. गेली पाच वर्षे सत्तास्थानी असलेल्या येथील आमदार व पदाधिकाऱ्यांच्या निकटवर्तीयांनाही राज्यातील घडामोडींनी अस्वस्थ केल्याचे दिसत होते.दुसरीकडे राष्टÑवादी, कॉँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत ठाण मांडले होते. तिन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील या तिन्ही पक्षांच्या कार्यालयातील वर्दळ वाढली असून, आनंदोत्सवाला उधाण आले आहे.अचानक काही तासातच जिल्ह्याचे राजकीय रंग बदलले. येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तसेच विविध संस्थांमधील समीकरणेही बदलणार आहेत. जिल्ह्यात गेली पाच वर्षे युती म्हणून कार्यरत असलेल्या या दोन्ही पक्षांमध्ये आता उघड संघर्ष होणार आहे. राज्यात सत्ताबदल होत असताना जिल्ह्यातील बदलणाºया समीकरणांनी सध्या वातावरण ढवळून निघाले आहे.जिल्ह्याचे वजन : वाढणारकित्येक वर्षे राज्याच्या राजकारणाचे जिल्ह्याने नेतृत्व केले. महत्त्वाची मंत्रिपदे जिल्ह्याच्या वाट्याला आली होती. कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या येथील नेत्यांना नेहमीच सत्तेत मोठा वाटा मिळत राहिला होता. भाजपच्या गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात जिल्ह्याला मंत्रिपदासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली होती. सुरुवातीला सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून कृषी राज्यमंत्रिपद आणि नंतर निवडणुकीपूर्वी अवघ्या काही दिवसांपूर्वी सुरेश खाडे यांना समाजकल्याण मंत्रिपद मिळाले होते. आता नव्या सरकारच्या काळात उपमुख्यमंत्रिपदासह काही महत्त्वाची खाते जिल्ह्याच्या वाट्याला येण्याची चिन्हे आहेत.जिल्हा केंद्रस्थानीराज्याच्या सत्ताकारणात राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ नेते जयंत पाटील यांच्या माध्यमातून सांगली जिल्हा केंद्रस्थानी राहिला. आता उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतही जयंत पाटील असल्याने त्यानिमित्तानेही नव्या सरकारमध्ये सांगली जिल्हा महत्त्वाच्या स्थानी राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादी व कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.महामंडळही जाणारजिल्ह्यात खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे असलेले कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदही जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या पदरी निराशा येणार आहे. विविध महामंडळांवर येथील नेत्यांच्या केलेल्या नियुक्त्याही रद्द होणार असून, त्याजागी जिल्ह्यातील राष्टÑवादी, कॉँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत.दोन्ही भावी उपमुख्यमंत्री जिल्ह्याशी संबंधितराज्यातील नव्या सरकारमध्ये राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. हे दोन्ही नेते जिल्ह्याशी व विशेषत: वाळवा तालुक्याशी संबंधित आहेत. जयंत पाटील यांचा मतदारसंघ इस्लामपूर आहे, तर बाळासाहेब थोरात हे तालुक्यातील तांबवे या गावचे जावई आहेत. राजारामबापू दूध संघाचे माजी संचालक नेताजी पाटील हे त्यांचे मेहुणे आहेत. त्यामुळे जिल्ह्याला व वाळव्याला दोन उपमुख्यमंत्रीपदे मिळाल्याचा आनंद येथील राष्टÑवादीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.