शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

लोकसहभागाच्या योजनेला कोलदांडा

By admin | Updated: May 5, 2015 00:50 IST

जलयुक्त शिवारचा फज्जा : ग्रामसभा कागदोपत्रीच, लोकप्रतिनिधींची उदासीनता

तासगाव : जलयुक्त शिवार योजना हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेबाबत एक मे रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश शासन स्तरावरून देण्यात आले होते. मात्र, या योजनेला ग्रामपंचायतीतील लोकप्रतिनिधी आणि लोकांनीच कोलदांडा दाखविल्याचे चित्र आहे. अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी ग्रामसभा झाल्या नसून, बहुतांश ठिकाणी केवळ कागदोपत्रीच ग्रामसभा झालेल्या आहेत. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून एक मे रोजी ग्रामपंचायतींमार्फत विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याचे आदेश शासन पातळीवरून देण्यात आले होते. या ग्रामसभेत शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेची माहिती ग्रामस्थांना समजावून सांगण्यात येणार होती. ही योजना अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी, लोकांचा सहभाग वाढावा, सातत्याने भेडसावणारा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, पाण्याच्या बचतीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे, याबाबत सविस्तर महत्त्व पटवून देण्यासाठी आणि योजनेची प्रभावीपणे यशस्वी अंमलबजावणी व्हावी, या हेतूने विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या पातळीवर लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि शासकीय योजनेच्याबाबतीत लोकांचा निरूत्साह यामुळे एक मे रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभांना लोकांनीच खो घातल्याचे दिसून आले. काही क्रियाशील गावांचा अपवाद वगळता, बहुतांश ग्रामपंचायतीत ग्रामसभा झाल्याचे कागदी घोडे नाचविण्यात आले. अनेक ग्रामपंचायतीत सदस्यांनीच दांडी मारल्याचे दिसून येत होते, तर बहुतांश ठिकाणी नागरिकांची पुरेशी उपस्थिती नसल्यामुळे ग्रामसभांचा केवळ प्रशासकीय सोपस्कार उरकण्यात आला. (वार्ताहर)