शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

मुख्यमंत्र्यांचा पक्ष जिल्हा कार्यालयाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:25 IST

सांगली : जिल्ह्यातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपला अखेर कित्येक वर्षांनंतर जिल्हा कार्यालय मिळाले, मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे ...

सांगली : जिल्ह्यातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपला अखेर कित्येक वर्षांनंतर जिल्हा कार्यालय मिळाले, मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे जिल्ह्याच्या ठिकाणी अद्याप कार्यालय झालेले नाही. पदाधिकारी, शिवसैनिकांना एकत्रित येण्यासाठी विश्रामगृह किंवा मंगल कार्यालयांचा आधार घ्यावा लागत आहे.

पक्षाच्या जिल्हा कार्यालयामुळे पक्षीय नियोजनाला हातभार लागत असतो. निवडणुकांमध्ये कार्यालयांची निकड अधिक भासते. तरीही गटातटांच्या राजकारणात जिल्ह्यात विविध पक्षांची कार्यालये नेहमीच चर्चेत राहिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्थापनेपासून कार्यालये मिळाली आहेत, तरीही गटबाजीमुळे तेथील राजकारणही सतत चर्चेत असते. जिल्हा कार्यालये असतानाही अनेक नेत्यांची स्वतंत्र कार्यालयेसुद्धा आहेत. त्यामुळे गटांच्या वेगळ्या चुलीही दिसत आहेत.

शिवसेनेला मात्र इतक्या वर्षात सांगली जिल्ह्याचे कार्यालय उभारता आलेले नाही. पक्षाचे जिल्ह्यातील बळ वाढत आहे. पक्षाचा एक आमदार आहे. नगरसेवक आहेत. शिवाय पंचायत समिती, ग्रामपंचायतीत सत्ता मिळविल्यानंतरही शिवसैनिक कार्यालयापासून वंचित आहेत. भाजपलाही स्टेशन रस्त्यावरील जिल्हा कार्यालय बंद झाल्यानंतर जवळपास एक तप कार्यालयासाठी प्रतीक्षा करावी लागली. दरम्यानच्या काळात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयाचा उपयोग भाजपला झाला. आता भाजपने जिल्हा कार्यालयाची उभारणी केली आहे. मात्र मोठ्या चार पक्षांमध्ये शिवसेनेलाच जिल्हा कार्यालयाविना रहावे लागले आहे.

चाैकट

सेंटर पॉईंटची लढाई

पक्षांची जिल्हा कार्यालये असतानाही प्रत्येक पक्षातील नेत्यांनी स्वतंत्र कार्यालये उभारली आहेत. काहींची निवासस्थानेही पक्षीय राजकारणाचा केंद्रबिंदू होऊ पाहात आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना, मंत्र्यांना जिल्हा कार्यालयापेक्षा नेत्यांच्या निवासस्थानी, संपर्क कार्यालयांमध्ये बोलावण्यात येते. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप या पक्षांमध्ये सेंटर पॉईंटची ही लढाई अधिक आहे.

चौकट

शिवसेनेची तर सर्वबाजूंनी अडचण

शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी संपर्क कार्यालये काढली असली, तरी ती आकाराने लहान आहेत. एखादी बैठकसुद्धा तिथे होऊ शकत नाही. पदाधिकारी, नेत्यांची निवासस्थाने छाेटी आहेत. त्यामुळे नेत्यांना विश्रामगृह किंवा मंगल कार्यालयांमध्ये बैठका घ्यावा लागतात.