शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

सीएम टू पीएम’ आसूड यात्रा ११ एप्रिलपासून

By admin | Updated: March 24, 2017 00:25 IST

शेतकरी संघटनेचा निर्धार : इस्लामपुरात शहीद अभिवादन मेळावा; देशभरात संघटित लढा उभारणार

‘इस्लामपूर : स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि पूर्ण कर्जमुक्ती या दोन प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या मान्य करुन घेण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांचा संघटित लढा उभारण्याचा एल्गार विविध राज्यांतील शेतकऱ्यांनी, नेत्यांनी येथे पुकारला. ११ ते २१ एप्रिलदरम्यान ‘सीएम टू पीएम’ अशी आसूड यात्रा नागपूर ते दिल्लीपर्यंत काढण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सबका विकास आणि शेतकऱ्यांचा सत्यानाश’ असे धोरण असल्याची टीका यावेळी वक्त्यांनी केली.येथील राजारामबापू नाट्यगृहात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या पुढाकाराने हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू व रामचंद्र ऊर्फ आप्पा पाटील यांच्या स्मृतिदिनी शहीद अभिवादन मेळावा झाला. यापूर्वी शेतकरी नेत्यांची मिरवणूक काढण्यात आली. या मेळाव्यासाठी ‘प्रहार’चे संस्थापक आमदार बच्चू कडू, भारतीय किसान मंचचे अध्यक्ष सतनामसिंग बेरु (पंजाब), राजकुमार (तामिळनाडू), रवी दत्त, भागवत पांडे (मध्य प्रदेश), शांताकुमार (कर्नाटक), नितीन चौधरी (नागपूर), कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, महिला आघाडीच्या वंदनाताई माळी, शबाना मुल्ला, दिनकर दाभाडे उपस्थित होते.यावेळी आ. बच्चू कडू म्हणाले की, देशात सध्या जातीधर्माच्या नावाखाली राजकारण करुन बहुजनांची डोकी भडकवली जात आहेत. शेतकऱ्यांच्या ३0 हजार कोटींच्या कर्जमाफीसाठी राज्यकर्ते दिल्लीवाऱ्या करतात, यातच शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांनी ताकदीने संघटित होऊन संघर्ष करायला हवा. ११ ते २१ एप्रिलदरम्यान आसूड यात्रा काढून पंतप्रधान मोदींना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची जाणीव करुन देणार आहोत.रघुनाथदादा पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जिवावर उठणाऱ्या या राज्यकर्त्यांबरोबर कधीही जाणार नाही. स्वाभिमानी, बळीराजा, महाप्रतापी बळीराजा या संघटना चळवळीत काम करायच्या लायकीच्या नाहीत. ज्यांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, त्यांच्या जवळ बसत या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीत खंजिर खुपसला आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि कर्जमुक्ती या दोन मागण्या पूर्ण करून घेऊच.मध्य प्रदेशचे रवीदत्त म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सन्मानाची लढाई पूर्ण देशभरात ताकदीने लढणार आहोत. शांताकुमार म्हणाले की, सरकार चार टक्के कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगापोटी १ लाख ४ हजार कोटी रुपये दर महिन्याला देते. मात्र ७0 टक्के शेतकऱ्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. कन्हैयालाल सिन्हा म्हणाले की, देशातील शहिदांच्या परिवाराप्रती आजही न्याय केला जात नाही. सीमेवर शहीद होणारी शेतकऱ्यांचीच मुले आहेत. मोदी किसानविरोधी आहेत. कालिदास आपेट यांनी प्रास्ताविक केले. हणमंत पाटील यांनी आभार मानले. रामजीवन बोंदूर, बाळासाहेब पठारे, शंकर गायकवाड, आनंद भालेकर, इकबाल जमादार, एल. के. पाटील, शंकर मोहिते, जगन्नाथ चिप्रीकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)