शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

सोयाबीन उत्पादकांवर दाटले चिंतेचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्र शासनाने बारा लाख मेट्रिक टन सोयाबीन पशुखाद्य आयातीस परवानगी दिल्यानंतर देशातील सोयाबीन दरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : केंद्र शासनाने बारा लाख मेट्रिक टन सोयाबीन पशुखाद्य आयातीस परवानगी दिल्यानंतर देशातील सोयाबीन दरात घसरण सुरू झाली आहे. १० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल असलेला दर आता आठ हजारांवर घसरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढली आहे.

सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर ऑल इंडिया पोल्ट्री ब्रिडर्स असोसिएशनने केंद्र सरकारकडे शून्य आयात शुल्कावर सोया पशुखाद्य आयातीस परवानगीची मागणी केली होती. त्यास परवानगी देताना वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने अधिसूचनेद्वारे बारा लाख मेट्रिक टन पशुखाद्य आयातीस परवानगी दिली. आयातीच्या या निर्णयानंतर लगेच बाजारात सोयाबीन दरामध्ये घसरण सुरू झाली आहे. बारा हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचलेला दर ८ हजारापर्यंत खाली आला आहे. नवा माल बाजारात येण्यापूर्वी उत्पादकांच्या डोईवर चिंतेचे ढग दाटले आहेत.

देशात दरवर्षी १० ते ११ मिलियन टन सोयाबीन उत्पादन होते. सोया पशुखाद्याची मोठी उलाढालही देशात होते. देशात २०२०-२१ मध्ये ७७ लाख ६० हजार टन सोया पशुखाद्यनिर्मिती झाली. सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश अव्वल असून, त्याखालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ३५ टक्क्यांवर आहे. त्यामुळे सोयाबीनच्या धोरणांचा महाराष्ट्रावर मोठा परिणाम होत असतो. आता दरातील घसरणीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. अनेक वर्षांनंतर बाजारात सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी सुखावला होता, मात्र त्यांचा हा आनंद केंद्र शासनाच्या धोरणाने लगेच मावळला आहे.

चौकट

हमीभावापेक्षा सध्या दर जास्त

केंद्र शासनाने २०२१-२२ करिता सोयाबीनचा हमीभाव मागील वर्षाच्या तुलनेत ७० रुपयांनी वाढवून तीन हजार ९५० रुपये इतका जाहीर केला आहे. सध्या हमीभावापेक्षा दुप्पट दर आहे. तरीही सध्याची घसरण पाहता भाव आणखी किती खाली येणार, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

कोट

शेतकऱ्याला जादा भाव मिळत असताना अचानक आयातीचे धोरण केंद्र शासनाने स्वीकारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. विदर्भ, मराठवाड्यातील हे मुख्य पीक आहे. कित्येक वर्षांनंतर दराच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांची चिंता दूर होत असताना शासनाच्या चुकीच्या धोरणाने पुन्हा त्यांना संकटाच्या खाईत ढकलले जात आहे. आम्ही यासाठी लवकरच सोयाबीन परिषद घेऊन शासनाशी संघर्ष करू.

- राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना