शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

बंद, उपोषण हा फक्त राजकीय स्टंट!--प्रशासनाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:17 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : २०१४-१५ च्या मालमत्ता करवाढीविरोधात शहरातील १३१३ मालमत्ताधारकांची नगरपालिका अधिनियम १९६५ मालमत्ता कर समिती नियम १९९५ अन्वये अपिले फेटाळण्यात आली आहेत. तरीही सत्ताधारी विकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने बंद, उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. हे आंदोलन कायद्याविरोधात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे हा केवळ ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : २०१४-१५ च्या मालमत्ता करवाढीविरोधात शहरातील १३१३ मालमत्ताधारकांची नगरपालिका अधिनियम १९६५ मालमत्ता कर समिती नियम १९९५ अन्वये अपिले फेटाळण्यात आली आहेत. तरीही सत्ताधारी विकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने बंद, उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. हे आंदोलन कायद्याविरोधात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे हा केवळ राजकीय स्टंट असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

२०१४-१५ मध्ये पालिका प्रशासनाने ४ हजार ६२२ नवीन मालमत्ताधारकांवर मोठ्या प्रमाणात करआकारणी केली होती. ही आकारणी कमी होण्यासाठी समितीही नेमण्यात आली.या समितीपुढे २०/१२/२०१६ पर्यंत अपील करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या माध्यमातून ३५५७ अपिले दाखल करण्यात आली. त्यातील २४८ मालमत्ताधारकांनी मुदतबाह्य अपील दाखल केल्यामुळे ते समितीने फेटाळले. त्यामुळे ३ हजार ३०९ मालमत्ताधारकांची कर आकारणी कमी करण्यात आली होती.

ही प्रक्रिया सुरू असतानाच भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनी कोणताही कर भरू नका, असे आवाहन करून इस्लामपूर बंदचा नारा दिला होता. त्यामुळे उर्वरीत १०६५ मालमत्ताधारकांनी अपील दाखल केलीच नाहीत; तर २४८ मालमत्ताधारकांनी केलेले अपील मुदतबाह्य ठरल्याने ती फेटाळण्यात आली. त्यामुळे एकूण १३१३ मालमत्ताधारकांना न्याय मिळाला नाही.हाच मुद्दा घेऊन विरोधी गटनेते विक्रम पाटील आणि शिवसेना कायदेशीररित्या भांडत आहेत. परंतु नगरपालिका अधिनियम १९६५ मालमत्ता कर समिती नियम १९९५ अन्वये महसूल विभागाने ही अपिले फेटाळली आहेत.

याविरोधात न्यायालयीन लढा लढण्याऐवजी न्याय संस्थेवरच दबाव आणत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे नगरसेवक शकील सय्यद यांचे आंदोलन म्हणजे सत्ताधारी विकास आघाडीला घरचा आहेरच आहे. या कायद्याच्या लढाईत आंदोलनाचा मात्र फज्जा उडाला आहे.कोण काय म्हणाले? 

१३१३ मालमत्ताधारकांपैकी बहुतांशी नागरिकांनी कराचे पैसे भरले आहेत. तरीसुध्दा अन्यायी मालमत्ताधारकांच्यावतीने कायद्याची लढाई सुरू आहे. शकील सय्यद यांचे आंदोलन हे बेकायदेशीरपणे सुरू आहे.- दीपक झिंजाड, मुख्याधिकारी, इस्लामपूर नगरपालिकामुदतबाह्य अपील कायद्याच्या तरतुदीप्रमाणे फेटाळले आहे. तरीसुध्दा या प्रकरणाचा फेरअहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठवला आहे. याबाबतचा निर्णय वरिष्ठ अधिकारीच घेतील. यासंदर्भात दिवाणी न्यायालयात जाणे हा एकमेव मार्ग आहे.- राजेंद्र जाधव, प्रांताधिकारी, वाळवा२0१४-१५ च्या नवीन मालमत्ताधारकांवर जादा कर आकारणी केली. ११९ कलमानुसार नोटीस देणे गरजेचे होते. परंतु नियमबाह्यपणे कलम ११९ व २१ अन्वये एकच नोटीस दिली. त्याचवेळी सत्ताधारी कर भरण्यास भाग पाडत होते. या चुकीच्या धोरणाला विरोध होता. त्यानुसारच आम्ही न्यायालयात दाद मागत आहोत. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या चुकीच्या धोरणामुळे नागरिकांवर कोट्यवधी रुपयांचा बोजा पडला आहे.- विक्रम पाटील, पक्षप्रतोद, विकास आघाडी