शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

बंद, उपोषण हा फक्त राजकीय स्टंट!--प्रशासनाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:17 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : २०१४-१५ च्या मालमत्ता करवाढीविरोधात शहरातील १३१३ मालमत्ताधारकांची नगरपालिका अधिनियम १९६५ मालमत्ता कर समिती नियम १९९५ अन्वये अपिले फेटाळण्यात आली आहेत. तरीही सत्ताधारी विकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने बंद, उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. हे आंदोलन कायद्याविरोधात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे हा केवळ ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : २०१४-१५ च्या मालमत्ता करवाढीविरोधात शहरातील १३१३ मालमत्ताधारकांची नगरपालिका अधिनियम १९६५ मालमत्ता कर समिती नियम १९९५ अन्वये अपिले फेटाळण्यात आली आहेत. तरीही सत्ताधारी विकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने बंद, उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. हे आंदोलन कायद्याविरोधात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे हा केवळ राजकीय स्टंट असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

२०१४-१५ मध्ये पालिका प्रशासनाने ४ हजार ६२२ नवीन मालमत्ताधारकांवर मोठ्या प्रमाणात करआकारणी केली होती. ही आकारणी कमी होण्यासाठी समितीही नेमण्यात आली.या समितीपुढे २०/१२/२०१६ पर्यंत अपील करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या माध्यमातून ३५५७ अपिले दाखल करण्यात आली. त्यातील २४८ मालमत्ताधारकांनी मुदतबाह्य अपील दाखल केल्यामुळे ते समितीने फेटाळले. त्यामुळे ३ हजार ३०९ मालमत्ताधारकांची कर आकारणी कमी करण्यात आली होती.

ही प्रक्रिया सुरू असतानाच भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनी कोणताही कर भरू नका, असे आवाहन करून इस्लामपूर बंदचा नारा दिला होता. त्यामुळे उर्वरीत १०६५ मालमत्ताधारकांनी अपील दाखल केलीच नाहीत; तर २४८ मालमत्ताधारकांनी केलेले अपील मुदतबाह्य ठरल्याने ती फेटाळण्यात आली. त्यामुळे एकूण १३१३ मालमत्ताधारकांना न्याय मिळाला नाही.हाच मुद्दा घेऊन विरोधी गटनेते विक्रम पाटील आणि शिवसेना कायदेशीररित्या भांडत आहेत. परंतु नगरपालिका अधिनियम १९६५ मालमत्ता कर समिती नियम १९९५ अन्वये महसूल विभागाने ही अपिले फेटाळली आहेत.

याविरोधात न्यायालयीन लढा लढण्याऐवजी न्याय संस्थेवरच दबाव आणत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे नगरसेवक शकील सय्यद यांचे आंदोलन म्हणजे सत्ताधारी विकास आघाडीला घरचा आहेरच आहे. या कायद्याच्या लढाईत आंदोलनाचा मात्र फज्जा उडाला आहे.कोण काय म्हणाले? 

१३१३ मालमत्ताधारकांपैकी बहुतांशी नागरिकांनी कराचे पैसे भरले आहेत. तरीसुध्दा अन्यायी मालमत्ताधारकांच्यावतीने कायद्याची लढाई सुरू आहे. शकील सय्यद यांचे आंदोलन हे बेकायदेशीरपणे सुरू आहे.- दीपक झिंजाड, मुख्याधिकारी, इस्लामपूर नगरपालिकामुदतबाह्य अपील कायद्याच्या तरतुदीप्रमाणे फेटाळले आहे. तरीसुध्दा या प्रकरणाचा फेरअहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठवला आहे. याबाबतचा निर्णय वरिष्ठ अधिकारीच घेतील. यासंदर्भात दिवाणी न्यायालयात जाणे हा एकमेव मार्ग आहे.- राजेंद्र जाधव, प्रांताधिकारी, वाळवा२0१४-१५ च्या नवीन मालमत्ताधारकांवर जादा कर आकारणी केली. ११९ कलमानुसार नोटीस देणे गरजेचे होते. परंतु नियमबाह्यपणे कलम ११९ व २१ अन्वये एकच नोटीस दिली. त्याचवेळी सत्ताधारी कर भरण्यास भाग पाडत होते. या चुकीच्या धोरणाला विरोध होता. त्यानुसारच आम्ही न्यायालयात दाद मागत आहोत. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या चुकीच्या धोरणामुळे नागरिकांवर कोट्यवधी रुपयांचा बोजा पडला आहे.- विक्रम पाटील, पक्षप्रतोद, विकास आघाडी