शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

कळंबी कालवा सुरु होण्याआधीच बंद

By admin | Updated: March 29, 2016 00:29 IST

पाणीपट्टी भरूनही पाण्यापासून वंचित : प्रशासनाला लोकप्रतिनिधींची साथ

अमोल शिंदे --एरंडोलीपाणीपट्टी भरूनही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येत नाही. बेडगमधील शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. कळंबी कालव्यास आवर्तन सुरू होऊनही महिना झाला तरी, पाणी सोडले नाही. थोडे पाणी आले तेही अत्यंत कमी दाबाने येत असल्याने ते एक दोनवेळा एरंडोलीपर्यंत तोंड दाखवून लगेच परतले. मालगावला पाणी गेलेच नाही. तर मल्लेवाडी व एरंडोलीचा नुसता कालवाच भिजला असून, शेतात पाणी गेलेच नाही. शेतकरी अडथळा आणतात, असे कारण सांगत, कळंबी कालव्याचे पाणी सुरू होण्याआधीच बंद करून अधिकाऱ्यांनी काय साध्य केले, असा सवाल येथील शेतकरी करीत आहेत. या योजनेचे कारभारी असणारे अधिकारी स्वत:ला योजनेचे मालक समजू लागले आहेत व त्यांना लोकांतून निवडून गेलेले प्रतिनिधी साथ देत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.कळंबी कालवा पाणी वाटप नियोजन करण्यासठी नुकतीच वारणाली कार्यालयात खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पण या बैठकीला बेडग, मल्लेवाडी, एरंडोली, मालगाव या गावातील सरपंच उपस्थित नव्हते. तसेच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यही उपस्थित नव्हते. बैठका व समिती निर्माण करण्याची गरज गेल्या दहा वर्षांत पडली नाही, पण यावर्षीच ही परिस्थिती का निर्माण झाली, असा सवालही येथे उपस्थित केला जात आहे.यावर्षीचे म्हैसाळचे आवर्तन ऐतिहासिक ठरत आहे. पहिल्यांदा शेतकरी पाणीपट्टी भरत नाहीत, तोवर पाणी नाही, या भूमिकेने ज्वारी, गहू, उसाचा खोडवा ही पिके शेतात करपून गेली. आता पाणी वाटपातील गोंधळात द्राक्षबागांचा बळी जाणार, असे चित्र आहे. सरकार व प्रशासन यांची गट्टी जमली आहे. शेवटी राजकारणात सरशी करण्याच्या हेतूने का होईना काही कारखान्यांचे अध्यक्ष पुढे आले आहेत. शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून साडेतीन कोटी रक्कम म्हैसाळच्या पाणीपट्टीसाठी जमा झाले. व्यापारी व शहरी लोकांचा पक्ष म्हणून आपली ओळख अधिक दृढ करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना पुन्हा एक गड सर केल्याचा आनंद झाला. पण ज्या पोटतिडकीने हे नेते पाणीपट्टी भरावी म्हणून आवाहन करत आहेत, ते पाणी शेतकऱ्यांना पोहोचवण्याची जबाबदारी मात्र का घेत नाहीत? असा सवाल मल्लेवाडी, एरंडोली परिसरातील शेतकरी विचारत आहेत.सहा कोटी रुपये पाणीपट्टी भरून पाणीपट्टीसाठी नडवणाऱ्यांना चोख उत्तर शेतकऱ्यांनी दिले आहे. पण पाणी मिळण्याची अनिश्चितता, पैसे भरूनही शेतकऱ्यांना रात्र रात्र कालव्यावर पहारा द्यावा लागत आहे. आठ दिवस हेलपाटे मारूनही अर्धा एकर शेत भिजत नसल्याने शेवटी शेतकरी अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. यापूर्वी या कालव्यावर अशी परिस्थिती कधीच उद्भवली नाही. मग यंदा असे होण्यास म्हैसाळचे अधिकारी कारणीभूत आहेत की राजकीय कारणे आहेत? असा प्रश्न आहे.