शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

सांगलीत तूर खरेदी केंद्र बंदच

By admin | Updated: April 26, 2017 23:50 IST

बारदानांचा तुटवडा : जतचे केंद्र अडकले लाल फितीत; शेतकऱ्यांमधून तीव्र संताप

गजानन पाटील ल्ल संखतूर उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून होत असलेली लूट रोखण्याकरिता शासनाने तूर खरेदी केंद्र सुरू केले. मात्र सांगलीतील तूर खरेदी केंद्र बारदानाअभावी १० मार्चपासून बंद अवस्थेत आहे, तर जत तालुक्यातील खरेदी केंद्र अद्याप सुरूच झालेले नाही. १५ एप्रिल ही खरेदी केंद्राची मुदत संपली आहे. जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी तुरीचा साठा करून ठेवला आहे. केंद्र बंद झाल्याने व्यापाऱ्यांनी दर पाडला आहे. कृषी राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यांना तूर खरेदीसाठी टाहो फोडावा लागत आहे. खरीप हंगामात कडधान्य पीक म्हणून तूर पीक घेतले जाते. कमी खर्चात, पावसावर, कमी भांडवलात व माळरानावर तूर पीक येत असल्याने शेतकऱ्यांचा हे पीक घेण्याकडे कल वाढला आहे. गेल्यावर्षी दोन हजार हेक्टर क्षेत्रावर हे पीक घेतले होते. यावर्षी ३४०० हेक्टर क्षेत्रावर तूर पीक घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभाव मिळावा, याकरिता शासकीय यंत्रणा म्हणून नाफेड आणि भारतीय खाद्य निगमची निवड झाली. शासनाने नाफेड व विष्णुअण्णा पाटील खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सांगलीतील शासकीय गोदाम (सेंट्रल वेअर हाऊस) येथे तूर खरेदी केंद्र सुरू केले. दि. १३ जानेवारीपासून तूर खरेदी केंद्र सुरू झाले. मात्र १० मार्चपासून ते बंद झाले. तूर भरून ठेवण्यासाठी शासनाकडून बारदान न आल्याने खरेदी बंद झाली. त्यानंतर तूर खरेदी झाली नाही. दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आदी भागात तूर लागवडीला विशेष महत्त्व नव्हते. परंतु शेतकऱ्यांनी पाणी टंचाईसह अन्य समस्यांशी मुकाबला करत मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली आहे. अनुकूल हवामानामुळे तुरीचे उत्पादन चांगले आले आहे. कधी नव्हे ते तुरीचे उत्पादन वाढले आहे. शेकडो टन तुरीचे उत्पादन झाले आहे. तुरीची आधारभूत किंमत क्विंटलला ५०५० रूपये आहे. खरेदी केंद्र १५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार होते. मात्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे आधीच बंद झाले. शासनाची तूर केंद्रे बंद झाल्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये तुरीचा दर कोसळला आहे. तो तीन हजार रूपयापर्यंत आला आहे. तूर बराच वेळ साठवल्यास ती खराब होऊन नुकसान होणार आहे. त्याला कीड लागते. सध्या ही तूर काढून चार महिने लोटले आहेत. दर कमी झालेले आहेत. जिल्ह्यात फक्त ५७ दिवस तूर खरेदी केंद्र सुरू होते. बारदानाअभावी जवळजवळ ३५ दिवस ते बंद होते. मार्केट यार्डातील खरेदी केंद्रात ४२७६ क्विंटल तूर खरेदी झालेली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेऊन, ३५ दिवस बंद असलेले खरेदी केंद्र पुन्हा सुरू करून त्याला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे. कर्नाटकात सेवा सोसायटीला अधिकारकर्नाटकमध्ये शासनाने सेवा सोसायटीमध्ये खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. शेतकऱ्याची २० क्विंटल तूर आधारभूत भावाने ५५०० रूपयाने खरेदी केली जाते. ५१०० रूपये दर व राज्य शासनाचे ४५० रूपये अनुदान आहे. मात्र शेतकऱ्यांचा सात-बारा, खाते उतारा, आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. तेथेसुध्दा १० एप्रिल ही खरेदीची ‘डेडलाईन’ होती. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीनुसार २० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिलेली होती. जत येथील खरेदी केंद्र दफ्तरदिरंगाईततूर खरेदी केंद्र जत येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केंद्र सुरू होणार होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना तुरीची विक्री करणे सुलभ होणार होते. गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यातील शेतकरी खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेतच राहिले. हा शासनाच्या दफ्तरदिरंगाईचा फटका बसला आहे.