शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

कासेगावला अखेर स्वच्छ पाणी पुरवठा

By admin | Updated: December 10, 2014 23:46 IST

‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश : पाच दिवसांपासून दूषित पाण्यामुळे नागरिक हैराण

प्रताप बडेकर - कासेगाव येथील मातंग समाजातील ग्रामस्थांना गेल्या पाच दिवसांपासून अळीमिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. याबाबात ‘लोकमत’ने शेवटपर्यंत पाठपुरावा करून ग्रामपंचायत प्रशासनाला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यास भाग पाडले. याबद्दल ग्रामस्थांतून ‘लोकमत’चे अभिनंदन होत असून, अभिनंदनाचे फलक गावातून फिरवले जात आहेत.कासेगाव येथील मातंग समाजात गेल्या आठवड्यापासून दूषित व अळीमिश्रित पाणी पुरवठा सुरू होता. याबाबतची तक्रार ग्रामपंचायतीकडे देऊनही याकडे दुर्लक्ष केले होते. हे दूषित पाणी पिण्यात आल्याने ग्रामस्थांना जुलाब, उलट्या व ताप येणे असा त्रास सुरू झाला. याबाबत ‘लोकमत’ने ६ डिसेंबर रोजी वृत्त प्रसिध्द केले. याची दखल घेत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भारती दळवी यांच्या पथकाने कासेगावला भेट दिली. जि. प. चे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांनी ‘लोकमत’मध्ये या वृत्ताची शहानिशा करा, असे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा आरोग्य पथकाने पाहणी केली. संबंधित रुग्णांशी चर्चा केली असता, गेल्या काही दिवसापांसून उलट्या, जुलाब, ताप, सर्दीचा त्रास होत असल्याचे स्पष्ट केले.यावर डॉ. दळवी यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय घोलप, आर. पी. जाधव, परिचारिका व आशा वर्कर्सना सूचना देऊन रुग्णांवर तातडीने उपचार करण्यास सांगितले. यानंतर स्वत: दळवी यांनी दूषित पाणी पुरवठा होत असलेल्या नळ कनेक्शनचा सर्व्हे केला.ग्रामपंचायतीनेही जेथे जेथे गळती आहे ती काढण्याचे काम युध्दपातळीवर केले. तसेच विविध ठिकाणी वॉशआऊटही करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू झाल्याने मातंग समाजातील ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. ग्रामसेवक नॉटरिचेबल..!येथील ग्रामसेवक अनिल पाटील गेल्या काही दिवसांपासून नॉटरिचेबल आहेत. या प्रभागातील ग्रामस्थांनी त्यांच्याशी दूषित पाण्याबाबत बोलण्यासाठी भ्रमणध्वनी लावला, परंतु त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. गेल्या काही दिवसांपासून ते नॉटरिचेबल असल्यान कामे खोळंबून आहेत.गेल्या पाच दिवसांपासून दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे प्रभाग क्र. ५ चांगलाच चर्चेत राहिला आहे. शुध्द पाण्याचा पुरवठा सुरू झाल्यानंतर आज सकाळपासून येथील सदस्य हणमंत मिसाळ व शुभांगी पाटसुते यांनी प्रभागातील गटारी स्वच्छतेचे काम हाती घेतले होते. खांबावरील नवीन दिवे बसवण्यात आले.