शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कासेगावला अखेर स्वच्छ पाणी पुरवठा

By admin | Updated: December 10, 2014 23:46 IST

‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश : पाच दिवसांपासून दूषित पाण्यामुळे नागरिक हैराण

प्रताप बडेकर - कासेगाव येथील मातंग समाजातील ग्रामस्थांना गेल्या पाच दिवसांपासून अळीमिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. याबाबात ‘लोकमत’ने शेवटपर्यंत पाठपुरावा करून ग्रामपंचायत प्रशासनाला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यास भाग पाडले. याबद्दल ग्रामस्थांतून ‘लोकमत’चे अभिनंदन होत असून, अभिनंदनाचे फलक गावातून फिरवले जात आहेत.कासेगाव येथील मातंग समाजात गेल्या आठवड्यापासून दूषित व अळीमिश्रित पाणी पुरवठा सुरू होता. याबाबतची तक्रार ग्रामपंचायतीकडे देऊनही याकडे दुर्लक्ष केले होते. हे दूषित पाणी पिण्यात आल्याने ग्रामस्थांना जुलाब, उलट्या व ताप येणे असा त्रास सुरू झाला. याबाबत ‘लोकमत’ने ६ डिसेंबर रोजी वृत्त प्रसिध्द केले. याची दखल घेत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भारती दळवी यांच्या पथकाने कासेगावला भेट दिली. जि. प. चे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांनी ‘लोकमत’मध्ये या वृत्ताची शहानिशा करा, असे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा आरोग्य पथकाने पाहणी केली. संबंधित रुग्णांशी चर्चा केली असता, गेल्या काही दिवसापांसून उलट्या, जुलाब, ताप, सर्दीचा त्रास होत असल्याचे स्पष्ट केले.यावर डॉ. दळवी यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय घोलप, आर. पी. जाधव, परिचारिका व आशा वर्कर्सना सूचना देऊन रुग्णांवर तातडीने उपचार करण्यास सांगितले. यानंतर स्वत: दळवी यांनी दूषित पाणी पुरवठा होत असलेल्या नळ कनेक्शनचा सर्व्हे केला.ग्रामपंचायतीनेही जेथे जेथे गळती आहे ती काढण्याचे काम युध्दपातळीवर केले. तसेच विविध ठिकाणी वॉशआऊटही करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू झाल्याने मातंग समाजातील ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. ग्रामसेवक नॉटरिचेबल..!येथील ग्रामसेवक अनिल पाटील गेल्या काही दिवसांपासून नॉटरिचेबल आहेत. या प्रभागातील ग्रामस्थांनी त्यांच्याशी दूषित पाण्याबाबत बोलण्यासाठी भ्रमणध्वनी लावला, परंतु त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. गेल्या काही दिवसांपासून ते नॉटरिचेबल असल्यान कामे खोळंबून आहेत.गेल्या पाच दिवसांपासून दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे प्रभाग क्र. ५ चांगलाच चर्चेत राहिला आहे. शुध्द पाण्याचा पुरवठा सुरू झाल्यानंतर आज सकाळपासून येथील सदस्य हणमंत मिसाळ व शुभांगी पाटसुते यांनी प्रभागातील गटारी स्वच्छतेचे काम हाती घेतले होते. खांबावरील नवीन दिवे बसवण्यात आले.