शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

विवेकस्पर्शी चळवळीचा निर्मळ कार्यकर्ता

By admin | Updated: April 29, 2016 00:22 IST

निळूभाऊ फुल्यांनी सामाजिक कृतज्ञता निधीतून राहुलला वेतन मिळावं यासाठी स्वत: पत्र लिहिलं. डॉ. श्रीराम लागू यांच्या संकल्पनेतून सामाजिक कृतज्ञता निधीची कल्पना पुढे आली आणि

दाभोलकरांच्या विवेकवादी विचारस्पर्शाने प्रेरित झालेला राहुल तासगाव तालुक्यातील बलगवडेचा. आई-वडील शेतमजूर. घरात आंबेडकरी विचारांचा पुरोगामी वारसा होता. राहुल दहावीत असताना विधानसभेची निवडणूक होती. त्यात राहुल सवंगड्यांसोबत आर. आर. पाटील आबांच्या प्रचारात सहभागी झाला होता. एक दिवस सभा संपल्यावर आबांनी झाडाखाली जेवण मागवले. तिथेच त्यांनी भास्कर सदाकळे यांना, ‘तुमचं ते अंधश्रध्दा निर्मूलनाचं आख्यान लावा’, असं सांगितले. मग सदाकळेंनी लोकांचं प्रबोधन आणि मनोरंजन केलं. राहुलनं तिथंच अंधश्रध्दा निर्मूलनासाठीच काम करायचं निश्चित केलं.दहावीनंतर आयटीआयला तासगावात प्रवेश घेतला. तिथं प्रा. बाबूराव गुरव, विजय कराडे, प्रताप घाडगे यांचा चळवळीच्या माध्यमातून संबंध आला. आयटीआयला तो जिल्ह्यात पहिला आला. मुलाखतीशिवायच किर्लोस्कर कंपनीत नोकरी मिळाली. पहिला पगार त्यानं अंधश्रध्दा निर्मूलन समितीला देणगी म्हणून देऊ केला. सगळ्यांनाच अप्रूप वाटलं. १९९९ मध्ये त्यानं ‘लोकमत’चा प्रतिनिधी म्हणून पत्रकारितेला सुरुवात केली. यातून शोधपत्रकारिता सुरू झाली. त्याची गती बघून डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्राची जबाबदारी घेण्याविषयी सुचवलं. दाभोलकरांचा साधेपणा आणि विचारांनी प्रभावित झालेल्या राहुलसाठी ही जबाबदारी म्हणजे समस्त चळवळीने दाखविलेला गाढा विश्वास होता. गेली २० वर्षे वार्तापत्राचा प्रकाशक, व्यवस्थापकीय संपादक आणि शोधपत्रकारिता करणारा परखड लेखक अशा विविध भूमिकांतून त्याने हा विश्वास सार्थ ठरवला आहे. त्याची तळमळ, कामाची पध्दत बघून कुणासाठीही शिफारस न करणाऱ्या निळूभाऊ फुल्यांनी सामाजिक कृतज्ञता निधीतून राहुलला वेतन मिळावं यासाठी स्वत: पत्र लिहिलं. डॉ. श्रीराम लागू यांच्या संकल्पनेतून सामाजिक कृतज्ञता निधीची कल्पना पुढे आली आणि त्यासाठी डॉ. बाबा आढाव, डॉ. नरेंद्र दाभोलकर, निळूभाऊंनी एक कोटीचा निधी उभा केला. राहुल ‘अंनिस’चा फुलटाईम कार्यकर्ता झाला, तेव्हा त्याच्या आईला शेतात भांगलण्यासाठी ३० रूपये मजुरी मिळत होती, पण आई-वडिलांनी व भावाने त्याच्या भूमिकेला व कार्याला नेहमीच पाठिंबा दिला. ‘अंनिस’च्या कायदेशीर सल्ल्याचं काम दिवंगत अ‍ॅड. दत्ताजीराव माने स्वखर्चानं करायचे. दत्ताजीरावांचे जीवनचरित्र लिहिण्याची जबाबदारी राहुलवर आली. ‘अंनिस’चे संपादक प्रा. प. रा. आर्डे, कुमार मंडपे यांच्या जीवनकार्याच्या पुस्तिकाही त्याने लिहिल्या. ‘जोडीदाराची निवड व आंतरजातीय विवाह’ या पुस्तकाचे संपादन त्याने केले आहे. धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या बुवाबाजीवर सडेतोड लिखाण केले आहे. आसाममधील चेटकिणी समजून महिलांवर केल्या जाणाऱ्या अत्याचारांवर त्याने तेथे जाऊन शोधक वृत्तीने लिहिले आहे. जातपंचायती आणि त्यातून घडणाऱ्या अन्यायाविरोधात संशोधनपर लेखन केले आहे. नागनाथअण्णांच्या पाणी चळवळीतही कार्यकर्ता म्हणून तो कार्यरत राहिला. कॉ. गोविंद पानसरेंच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या राजर्षी शाहू आंतरजातीय विवाह सहाय्यता केंद्राचा सचिव म्हणून तो कार्यरत आहे. ‘अंनिस’ने गतवर्षी नाशिक येथे ‘उत्कृष्ट युवा कार्यकर्ता पुरस्कार’ देऊन राहुलचा गौरव केला. - महेश कराडकर चमत्कार-जादुटोणा करणाऱ्यांचे, गंडेदोरे-अंगारे-धुपारे देऊन लोकांना फसवणाऱ्यांचे पितळ विज्ञानाच्या कसोटीवर उघडे पाडण्याची विवेकवादी चळवळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून राबवली जात आहे. एकीकडे याला विरोध होत असताना, अंनिसचे कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. या चळवळीच्या ‘अंधश्रध्दा निर्मूलन वार्ता’ या मुखपत्राला आता २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त दुसरे अंधश्रध्दा निर्मूलन साहित्य संमेलन १४ व १५ मेरोजी सांगलीत होणार आहे. या संमेलन समितीचा सचिव आणि गेली वीस वर्षे ‘अंनिवा’चा व्यवस्थापकीय संपादक व प्रकाशक म्हणून काम करणाऱ्या राहुल थोरात या कार्यकर्त्याचा जीवनपट संघर्षाने भरला आहे.