शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

पत्रिकेतून स्वच्छ भारताचा संदेश; विवाहापूर्वी केले वृक्षारोपण

By admin | Updated: May 23, 2017 23:35 IST

पत्रिकेतून स्वच्छ भारताचा संदेश; विवाहापूर्वी केले वृक्षारोपण

लोकमत न्यूज नेटवर्ककोकरुड : सावंतवाडी (ता. शिराळा) येथील विकास शेळके याने आपल्या लग्नपत्रिकेतून ‘स्वच्छ भारत’ व ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश दिला आहे. पत्रिकेत केवळ संदेश न देता या युवकाने स्वत:च्या लग्नकार्याची सुरुवातच वृक्षारोपणाने केली.लग्नपत्रिकेतून लग्नाच्या माहितीव्यतिरिक्त समाजाला त्यातून संदेशही मिळावा, यासाठी विकास शेळके यांचे निसर्गमित्र मेहुणे अरुण कडवेकर यांनी, लग्नपत्रिका कमी किमतीची असली तरी चालेल, पण त्यात शुभसंदेश असावेत, असा विचार मांडला. शेळके कुटुंबियांनीही त्याला दुजोरा दिला. लग्नपत्रिकेवर वरच्या बाजूला ‘स्वच्छ भारत’ आणि त्याखाली ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश देण्यात आला आहे. सावंतवाडीसारख्या छोट्या, दुर्गम गावातील या लग्नपत्रिकेचे कौतुक होत आहे. या पत्रिकेची चर्चा चांगलीच होत आहे.लग्नादिवशी विकास शेवाळे यांनी लग्न लागण्यापूर्वी मंडपाच्या शेजारीच एक झाड लावून, ‘फक्त सांगत नाही, तर ते कृतीतही आणतो’, हे दाखवून दिले आहे. या विवाहाची व पत्रिकेची चर्चा मात्र रंगली आहे.