शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

पदाधिकारी-व्यापाºयांत एलबीटीवरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 23:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : थकीत एलबीटीप्रश्नी गुरुवारी झालेल्या महापालिकेतील बैठकीत पुन्हा एकदा व्यापारी आणि महापालिका पदाधिकाºयांमध्ये असेसमेंट प्रक्रियेवरून वाद झाला. अभय योजनेतील व्यापाºयांचेही असेसमेंट करण्यावर पदाधिकारी ठाम राहिले, तर व्यापाºयांनी या गोष्टीस ठाम विरोध दर्शविला. त्यामुळे कोणत्याही तोडग्याविना ही बैठक संपुष्टात आली.थकीत एलबीटीवर तोडगा काढण्यासाठी व्यापारी एकता असोसिएशनसोबत गुरुवारी महापालिका ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : थकीत एलबीटीप्रश्नी गुरुवारी झालेल्या महापालिकेतील बैठकीत पुन्हा एकदा व्यापारी आणि महापालिका पदाधिकाºयांमध्ये असेसमेंट प्रक्रियेवरून वाद झाला. अभय योजनेतील व्यापाºयांचेही असेसमेंट करण्यावर पदाधिकारी ठाम राहिले, तर व्यापाºयांनी या गोष्टीस ठाम विरोध दर्शविला. त्यामुळे कोणत्याही तोडग्याविना ही बैठक संपुष्टात आली.थकीत एलबीटीवर तोडगा काढण्यासाठी व्यापारी एकता असोसिएशनसोबत गुरुवारी महापालिका पदाधिकाºयांची बैठक पार पडली. या बैठकीला उपमहापौर विजय घाडगे, गटनेते किशोर जामदार, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, नगरसेवक शेखर माने, गौतम पवार, संजय बजाज, प्रशांत मजलेकर, बाळासाहेब गोंधळे, किशोर लाटणे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा, मुकेश चावला, धीरेन शहा, सुदर्शन माने आदींसह व्यापारी, आॅटोमोबाईल असोसिएशनचे पदाधिकारी, एलबीटी अधीक्षक अमर छाजवाले, निरीक्षक नितीन शिंदे आदी उपस्थित होते.स्थानिक संस्था कराचे अस्तित्व संपून दोन वर्षे उलटली तरी, अद्याप महापालिका क्षेत्रातील व्यापाºयांकडील एलबीटी थकबाकीचा वाद कायम आहे. व्यापाºयांचे असेसमेंट करण्यासाठी प्रशासनाने सीए पॅनेलही नेमले होते. परंतु त्यांच्याकडून चुकीची कारवाई होत असल्याचे आरोप झाल्याने, ते रद्द करण्यात आले आहे. अभय योजनेंतर्गत सहभागी व्यापाºयांचे असेसमेंट करण्याची मुदत मार्च २0१८ पर्यंत आहे. तसेच नोंदणी न केलेल्या व्यापाºयांकडील थकबाकीसाठी २0२१ अखेर मुदत आहे. परंतु वारंवार नोटिसा देऊनही व्यापाºयांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता प्रशासनाने फौजदारी नोटिसा पाठविल्याने वाद निर्माण झाला आहे.यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती. यावेळी शिकलगार म्हणाले, एलबीटीचे व्यापारी आणि एमआयडीसीतील उद्योजकांकडे सुमारे ३८ कोटी रुपये थकीत आहेत. प्रशासनाने हा आकडा निश्चित करण्यासाठीच व्यापाºयांना असेसमेंटच्या नोटिसा बजावल्या. त्यासाठी बैठकाही झाल्या. परंतु व्यापाºयांनी प्रतिसाद दिलेला नाही. अभय योजनेंतर्गत ४ हजार व्यापाºयांनी सेल्फ असेसमेंटनुसार करभरणा केला आहे. पण उर्वरित सुमारे साडेपाच हजारावर व्यापाºयांनी नोंंदणी केलेली नाही. वास्तविक आमचा व्यापाºयांना त्रास देण्याचा हेतू नाही. परंतु जनतेकडून वसूल केलेला महापालिकेचा कर भरलाच पाहिजे. यासाठी आम्ही संयमाने घेतले आहे. आता २0१८ अखेर मुदत असल्याने प्रशासन कारवाईच्या पवित्र्यात आहे. व्यापारी संघटनेचे प्रमुख समीर शहा व अन्य व्यापाºयांनी, अभय योजनेतील व्यापाºयांना असेसमेंटच्या प्रक्रियेतून वगळण्याची मागणी केली. कोणत्याही परिस्थितीत असेसमेंट होऊ न देण्याची भूमिका त्यांनी मांडली. बैठकीबाबत माहिती देताना गौतम पवार म्हणाले, चर्चा झाली, पण एकाही बैठकीत तोडगा निघणार नाही. त्यासाठी आणखी तीन-चार बैठका व्हाव्या लागतील. व्यापाºयांना कोणताही त्रास न होता ही करवसुली होईल.असेसमेंट होणारच : हारुण शिकलगारमहापौर हारुण शिकलगार म्हणाले, व्यापाºयांनी, अभय योजनेंतर्गत असेसमेंट रद्द करा, ज्या व्यापाºयांनी नोंदणी केली नाही, कर भरणा केला नाही, त्यांची यादी द्या, आम्ही करवसुलीला मदत करू, असा पवित्रा घेतला. याबाबत आयुक्तांमार्फत शासनाला कळवून निर्णय घेऊ, असा निर्णय घेण्यात आला. उद्योजकांनीही जकातीप्रमाणे एक टक्का एलबीटी भरला आहे. त्यांच्याकडून उर्वरित एलबीटीबाबतही सोमवारी बैठक घेऊ. शिवाय आॅटोमोबाईल व्यावसायिकांच्या एलबीटीबाबतही बैठक घेऊ.