शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक घरात, लॉकडाऊन जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ओस पडलेले रस्ते, निर्मनुष्य चौक, कुलूपबंद भाजी मंडई, शटर डाऊन बाजारपेठा अशा वातावरणात वीकेंड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ओस पडलेले रस्ते, निर्मनुष्य चौक, कुलूपबंद भाजी मंडई, शटर डाऊन बाजारपेठा अशा वातावरणात वीकेंड लाॅकडाऊनला सांगली शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. नागरिकच नव्हे तर वाहनेसुद्धा बाहेर पडली नाहीत. त्यामुळे पोलिसांवर लॉकडाऊन काळात कोणताही ताण पडला नाही.

सांगली शहरात शुक्रवारी रात्री आठपासून सुरू झालेली शांतता शनिवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीही कायम राहिली. सांगलीतील स्टेशन चौक, राजवाडा चौक, हरभट रोड, मारुती रोड, गणपती पेठ, कापड पेठ, स्टँड परिसर, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, विश्रामबाग, शंभर फुटी रस्ता, कोल्हापूर रोड अशा सर्व ठिकाणी नेहमी नागरिकांची गर्दी असते. शनिवारी या परिसरात शुकशुकाट होता. रस्ते, चौक, भाजी मंडई सर्व ओस पडले होते.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकच बाहेर न पडल्यामुळे पोलिसांनी बसून राहणे पसंत केले. दुपारी काही वेळ पोलिसांनाही विश्रांती मिळाली. त्यामुळे शहर ओस पडले होते. वाहनेही रस्त्यावर फारशी दिसली नाहीत. रिक्षा, बस वाहतूक, खासगी प्रवासी वाहतून सर्व बंद होते. नागरिकही घरात राहिल्यामुळे अपवादाने रस्त्यावर वाहने दिसत होती.

चौकट

भाजी मंडईला कुलूप

सांगलीच्या जुन्या भाजी मंडईला कुलूप लावण्यात आले होते. याच परिसरातील फळविक्रेत्यांची दुकानेही बंद होती. फळांच्या विक्रीस लॉकडाऊनमध्ये परवानगी होती. मात्र, तरीही सर्वांनी बंदमध्ये सहभाग घेतला. शिवाजी मंडईतील दुकानेही कुलूपबंद झाली आहेत.

चौकट

दूध वितरणावर २० टक्के परिणाम

शहरातील दूध वितरणावर लाॅकडाऊनमुळे विपरीत परिणाम झाला. उपनगरांमध्ये होणाऱ्या दूध वितरणात २० टक्के घट झाली. दूध वितरकांनी सांगितले की, डेअऱ्यांकडून शहरात माल आला; पण शहरांतर्गत वितरणावर थोडासा परिणाम झाला. रविवारी तो सुरळीत होण्याची शक्यता आहे.

चौकट

ना दंड, ना वाद

दररोज विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिका व वाहतूक पोलिसांमार्फत दंड केला जातो. यावेळी अनेकदा वादावादीही होत असते. शनिवारी लॉकडाऊन काळात नागरिकच फारसे घराबाहेर न पडल्यामुळे ना कोणावर दंड करण्याची वेळ आली ना वादावादी झाली.

चौकट

पोलिसांवरील ताण कमी

नागरिकांनी घरातच बसणे पसंत केल्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले. त्यामुळे रस्त्यावर बंदोस्तासाठी आलेल्या पोलिसांना फार काही करावे लागले नाही. त्यांच्यावरील ताण कमी झाला. तरीही दिवसभर ओस पडलेले चौक व रस्ते पाहत त्यांना बंदोबस्त पार पाडावा लागला.