शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘सिव्हिल’चे अधिकारी कोरोनात व्यस्त, दाखल्यांसाठी नोकरदार, नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST

सांगली : सिव्हिल रुग्णालयातील अधिकारी सध्या कोरोना कामात व्यस्त असल्याने फिटनेस प्रमाणपत्रासाठी शासकीय कर्मचाऱ्यांसह त्यांच्या नातेवाईकांचे हाल सुरू आहेत. ...

सांगली : सिव्हिल रुग्णालयातील अधिकारी सध्या कोरोना कामात व्यस्त असल्याने फिटनेस प्रमाणपत्रासाठी शासकीय कर्मचाऱ्यांसह त्यांच्या नातेवाईकांचे हाल सुरू आहेत. दाखल्यांची तातडीची निकड हेरुन याठिकाणी चिरीमिरीचा उद्योग करणाऱ्यांचेही फावले आहे.

सध्या कोरोनाची दुसरी लाट आहे. यातून शासकीय कर्मचारीही सुटलेले नाहीत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात काम करणाऱ्या अनेक महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना त्यामुळे आजारी रजा घ्यावी लागते. कामावर पुन्हा हजर होण्यासाठी त्यांना शासकीय रुग्णालयाचे म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सहीचे फिटनेस प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यामुळे सध्या जिल्ह्यातून दररोज अनेक कर्मचारी या दाखल्यासाठी शासकीय रुग्णालयात येत असतात. याशिवाय अपंगत्वाचे प्रमाणपत्रही शासकीय रुग्णालयातून देण्यात येते. अशा लोकांना सध्या दाखल्यांसाठी ताटकळत बसावे लागत आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांसह महत्त्वाचे अधिकारी सध्या कोरोना कामात व्यस्त असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्या स्वाक्षरीसाठी दिवसभर थांबून राहण्याची वेळ अशा कर्मचाऱ्यांवर, नातेवाईकांवर आली आहे. एका दाखल्यासाठी तीन दिवस हेलपाटे मारणे दूरच्या तालुक्यातील लोकांना यातना देणारे आहे. तरीही कोणती व्यक्ती कोठून आली आहे, याच्याशी शासकीय रुग्णालयाचे काहीही देणे-घेणे नसते.

शासकीय रुग्णालयातील दाखल्यांसाठीची ही धावपळ लक्षात आल्यानंतर चिरीमिरीचा उद्योग करणाऱ्यांचे फावले आहे. त्यांनी पैसे घेऊन दाखले तातडीने देण्याचे आमिष अशा गरजूंना दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तातडीने हे दाखले देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली, तर अशा लाेकांना आळा बसू शकतो.

चौकट

बस मिळणार कशी?

बऱ्याचवेळा सायंकाळी ५ वाजल्यानंतर प्रमाणपत्रे दिली जातात. तपासणी मात्र दुपारीच केली जाते. यासाठी विनाकारण चार ते पाच तास ताटकळत ठेवले जाते. प्रमाणपत्र उशिरा मिळाल्याने सायंकाळच्यावेळी बसस्थानक गाठून घर गाठण्यासाठी अशा लोकांची धावपळ सुरू होते. उशीर झाल्याने बऱ्याचजणांना गाडीही मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होते. एखाद्या महिलेस बाळ असेल, तर ती बाळाला घेऊन प्रमाणपत्र आणण्यासाठी येते, मात्र त्याचाही विचार केला जात नाही.