शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

शहरातील पाणीप्रश्नी नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST

सांगली : सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरांतील पिण्याच्या पाण्यावरून मंगळवारी पालकमंत्र्यांकडे नगरसेवकांनी गाऱ्हाणे मांडले. वाॅर्डात तासभरही पाणी ...

सांगली : सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरांतील पिण्याच्या पाण्यावरून मंगळवारी पालकमंत्र्यांकडे नगरसेवकांनी गाऱ्हाणे मांडले. वाॅर्डात तासभरही पाणी येत नाही, त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यावर तोडगा काढावा, अशी मागणीही नगरसेवकांनी केली.

कुपवाडच्या नगरसेवकांनी तर सांगलीलाच पाणी पळविले जात असल्याचा आरोप केला. दरम्यान, रस्ता रुंदीकरणासाठी वाॅर्डातील लहान-मोठ्या कामांसाठी स्वतंत्र निधीची मागणी काहींनी केली.

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत महापालिकेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पाण्याच्या प्रश्नांवरून नगरसेवक आक्रमक झाले होते. विजय घाडगे म्हणाले की, दिवसभरात पाऊण ते सव्वा तास पाणीपुरवठा होतो. माळ बंगला येथे ७० एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र आहे; पण ५० एमएलडी पाणी उपसा होत आहे. हे सारे पाणी सांगलीला जाते. कुपवाडमध्ये ११ टाक्या उभारल्या आहेत. तरीही एमआयडीसीकडून पाणी घ्यावे लागते. टाक्याच्या खाली असणाऱ्या उपनगरातही पाणी मिळत नाही. पाणीपुरवठा विभागाकडे कार्यकारी अभियंता नाही. या पदावर सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.

संजय मेंढे, संगीता हारगे, वहिदा नायकवडी यांनीही मिरजेत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची तक्रार केली. शेडजी मोहिते यांनी, कुपवाड शहराला निधी वाटपात सतत अन्याय होतो. त्यामुळे ग्रामपंचायतीसारखी स्थिती आजही कायम आहे. कुपवाडच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी देण्याची मागणी केली. विष्णू माने यांनी पाणीपट्टीची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. घरपट्टीप्रमाणे पाणीपट्टीची शास्ती व दंडमाफीबाबत शासनस्तरावरून आदेश व्हावे, अशी मागणी केली. याबाबत शासनाला पत्र देण्याची सूचना मंत्री पाटील यांनी केली.

चौकट

वारणा योजना पूर्ण करा : जयश्री पाटील

वारणा नदीतून सांगली व कुपवाड शहराला पाणी देण्यासाठी योजना आखली होती. ही योजना मदनभाऊंचे स्वप्न होते. त्यातील पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्यांची कामे झाली आहेत. आता वारणा नदीतून पाणी उचलण्याचे नियोजन करून हे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी केली.